एक्स्प्लोर

Agriculture News : वातावरणातील बदलामुळे हळदीच्या पिकावर 'करपा रोगा'चा प्रादुर्भाव; उत्पादनात घट होण्याची शक्यता

Agriculture News : वातावरणातील बदलामुळे हळदीच्या उत्पादनात 25 ते 50 टक्केपर्यंत घट होऊ शकते अशी माहिती कृषी विभागातील सूत्रांनी  दिली आहे. 

Agriculture News : सतत होणाऱ्या वातावरणातील बदलाचा परिणाम हळदीच्या पिकावर (Turmeric Crop) मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. हिंगोली (Hingoli) जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हळदीची लागवड केली जाते. शेतकरी या हळदीच्या पिकाला वर्षभर जपत असतात. परंतु, हेच शेतकरी आता संकटात सापडले आहेत. कारण हळदीच्या पिकावर मोठ्या प्रमाणामध्ये करपा रोगाच्या प्रादुर्भाव पाहायला मिळतोय. त्यामुळे हळदीचा उत्पादनात 25 ते 50 टक्केपर्यंत घट होऊ शकते अशी माहिती कृषी विभागातील सूत्रांनी  दिली आहे. 

भारतात सर्वाधिक हळदीच्या पिकाचे उत्पन्न घेणार जिल्हा म्हणून हिंगोली जिल्ह्याची ओळख आहे. हिंगोली जिल्ह्यातील बहुतांश भागात मोठ्या प्रमाणात हळदीचे पीक घेतले जाते. मात्र हळदीचे उत्पन्न घेणारे शेतकरी संकटात सापडले आहे. त्याचं कारण म्हणजे वातावरणात होणाऱ्या बदलामुळे हळदीच्या पिकावर मोठ्या प्रमाणात करपा रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. हिंगोली जिल्ह्यातील टेंभुर्णी गावात अशीच काही परिस्थिती सर्वत्र पाहायला मिळत आहे. या गावातील अनेक शेतकऱ्यांनी लावलेल्या हळदीचे पीक अक्षरशः करपून गेले आहे. उभं हळदीचे पीक शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर करपत आहे. विशेष म्हणजे याचा परिणाम हळदीच्या पिकाच्या उत्पन्नावर देखील होणार आहे. ज्यातून 25 ते 50 टक्के उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. याचा थेट आर्थिक फटका हळदी उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. 

करपा रोगाची माहिती कृषी विभागाला देण्याचे आवाहन 

हळदीच्या पिकाची उत्पन्न घेण्यात हिंगोली जिल्ह्याची एक वेगळी ओळख आहे. या जिल्ह्यात बाराही महिने हळदीचे पीक घेण्यात येते. त्यामुळे या जिल्ह्याला हळदीच्या पिकाची एक मोठी बाजारपेठ देखील समजली जाते. मात्र, यंदा या जिल्ह्यात हळदीच्या पिकाची मोठी घट होणार आहे. बदलत्या वातावरणामुळे हळदीच्या पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. तर, हळदीच्या पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळाल्यास तत्काळ कृषी विभागाला याची माहिती देण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

वातावरणात सतत बदल...

मागील काही दिवसांत वातावरणात सतत बदल होत आहे. कारण हिवाळा सुरु असतानाच अचानक अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. त्यामुळे वातावरणात होणाऱ्या बदलाचे परिणाम पिकांवर देखील होतांना पाहायला मिळत आहे. रब्बी हंगामातील अनेक पिकांना याचा फटका बसत आहेत. सोबतच हळदीच्या पिकाला देखील याचा फटका बसतांना पाहायला मिळतोय. वातावरण बदलामुळे पिकांचे होणारे नुकसान लक्षात घेता याचा शेतकऱ्यांना थेट आर्थिक फटका देखील बसत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

यूट्यूबच्या साथीनं शेतकऱ्यानं लावलं पैशाचं झाडं, ओसाड जमिनीत फुलवलं नंदनवन

About the author माधव दिपके

माधव दिपके
Read More

महत्त्वाच्या बातम्या

नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद थेट शेतकऱ्यांच्या बांधावर, खतांच्या वाटपासह केली भाताची लावणी 
नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद थेट शेतकऱ्यांच्या बांधावर, खतांच्या वाटपासह केली भाताची लावणी 
Maharashtra kharif Sowing: महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
Maharashtra Farm Loan Waiver Pune: शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी आज जाहीर होणार, पुणे जिल्हा बँकेच्या 61 हजार 900 शेतकऱ्यांना 523 कोटींचा लाभ मिळणार
शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी आज जाहीर होणार, पुणे जिल्हा बँकेच्या 61 हजार 900 शेतकऱ्यांना 523 कोटींचा लाभ मिळणार
धक्कादायक! खते आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर काळाचा घाला, भीषण अपघातात जागीच मृत्यू, बीडच्या केजमध्ये घडली घटना
धक्कादायक! खते आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर काळाचा घाला, भीषण अपघातात जागीच मृत्यू, बीडच्या केजमध्ये घडली घटना

व्हिडीओ

Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
Prakash Ambedkar: 22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
Devendra Fadnavis and Amruta Fadnavis: देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
Embed widget