एक्स्प्लोर

Onion : कांद्याचे दर घसरणार? शेतकऱ्यांना फटका बसणार, सरकारनं घेतला 'हा' मोठा निर्णय 

कांद्याच्या दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारनं काम सुरु केलं आहे. कांद्याचे दर कमी करण्यासाठी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. 

Onion News : सध्या कांद्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. मात्र, कांद्याचे दर वाढल्यानं, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. देश पातळीवर सरासरी कांद्याच्या दरात 57 टक्क्यांची वाढ झाल्याचा अहवाल एक दिवसापूर्वी आला होता. वर्षभरापूर्वी या काळात कांद्याचे दर 30 रुपये होता. तोच भाव आता 47 रुपये किलोवर गेला आहे. दरम्यान, या कांद्याच्या दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारनं काम सुरु केलं आहे. कांद्याचे दर कमी करण्यासाठी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. 

सरकार ही पावले उचलणार 

देश पातळीवर कांद्याच्या दरात सरासरी 57 टक्क्यांची वाढ झाली आहे. सध्या कांदा 47 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. त्यामुळं कांद्याच्या किंमती करण्यासाठी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. सरकारनं बफर स्टॉकमधून कांद्याची किरकोळ बाजारात 25 रुपये प्रति किलो या सवलतीच्या दराने विक्री करण्याचा निर्णय घेतला. यातून ग्राहकांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.  ग्राहक व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, वर्षभरापूर्वी याच कालावधीत कांद्याची सरासरी किरकोळ किंमत 30 रुपये प्रति किलो होती. त्यामध्ये सध्या वाढ झाली आहे. दरम्यान, सरकारनं घेतलेल्या या निर्णयामुळं कांद्याच्या दरात घसरण होणार आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. 

सरकार बफर स्टॉकमधून कांदा देणार

ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंह यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, आम्ही ऑगस्टच्या मध्यापासून बफर स्टॉकमधून कांदे उपलब्ध करून देत आहोत. किंमती वाढू नयेत आणि ग्राहकांना दिलासा मिळावा यासाठी आम्ही किरकोळ विक्री वाढवत आहोत. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ज्या राज्यांमध्ये किंमती झपाट्याने वाढत आहेत, तेथे घाऊक आणि किरकोळ अशा दोन्ही बाजारांमध्ये बफर स्टॉकमधून कांद्याचा पुरवठा केला जात आहे. ऑगस्टच्या मध्यापासून 22 राज्यांतील विविध ठिकाणी सुमारे 1.7 लाख टन कांद्याचा बफर स्टॉकमधून पुरवठा करण्यात आला.

किरकोळ बाजारात, नॅशनल कन्झ्युमर को-ऑपरेटिव्ह फेडरेशन ऑफ इंडिया (NCCF) आणि नॅशनल अॅग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (NCCF) या दोन सहकारी संस्थांच्या माध्यमातून बफर स्टॉकमधील कांदे 25 रुपये प्रति किलो या सवलतीच्या दराने विकले जात आहेत. दिल्लीतही बफर स्टॉकमधील कांदा त्याच सवलतीच्या दराने विकला जात आहे.

कांद्याचे भाव का वाढले?

मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हवामानाशी संबंधित कारणांमुळे खरीप कांद्याच्या पेरणीला उशीर झाल्यामुळं पीक कमी झाले. हे पीक बाजारात यायला उशीर झाला. सध्या खरीप कांद्याची आवक सुरु व्हायला हवी होती, मात्र तसे झाले नसल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. साठवलेला रब्बी कांदा संपल्याने आणि खरीप कांद्याची आवक होण्यास उशीर झाल्यामुळं पुरवठ्याची स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळं घाऊक आणि किरकोळ बाजारात भाव वाढत आहेत.

सरकारनं केला दुप्पट बफर स्टॉक

सरकारनं चालू वर्ष 2023-24 मध्ये कांद्याचा बफर स्टॉक दुप्पट केला आहे. यामुळे देशांतर्गत उपलब्धता सुधारेल आणि आगामी काळात वाढत्या किमतींना आळा बसेल. 2023-24 या आर्थिक वर्षासाठी, ग्राहक व्यवहार मंत्रालयाने NCCF आणि NAFED मार्फत पाच लाख टनांचा बफर स्टॉक ठेवला आहे. येत्या काही दिवसांत अतिरिक्त दोन लाख टन कांदा खरेदी करण्याची योजना आहे. दरम्यान, या कांद्याच्या भाववाढीचा फटका सरकारला बसू नये सर्वसामान्य नागरिक आक्रमक होऊ नये म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Onion : कांद्याला दराची 'झळाळी', शेतकरी दु:खी कारण; दर आहे पण कांदा नाही

महत्त्वाच्या बातम्या

देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर
देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर
कर्जमाफी लांबणीवर! 5 जुलैची डेडलाईन हुकणार, सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती, कृषीमंत्र्यांचा मोठं वक्तव्य  
कर्जमाफी लांबणीवर! 5 जुलैची डेडलाईन हुकणार, सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती, कृषीमंत्र्यांचा मोठं वक्तव्य  
सरकारकडून कांद्याच्या खरेदी दरात 250 रुपयांची वाढ, तर क्विंटलला तीन हजार रुपयांचा दर देण्याची शेतकऱ्यांची मागणी 
सरकारकडून कांद्याच्या खरेदी दरात 250 रुपयांची वाढ, तर क्विंटलला तीन हजार रुपयांचा दर देण्याची शेतकऱ्यांची मागणी 
पावसाच्या ढगांमध्ये आढळला 'ब्लॅक कार्बन', ढगांसंदर्भात महत्वाचं संशोधन, पावसावर परिणाम होणार का? 
पावसाच्या ढगांमध्ये आढळला 'ब्लॅक कार्बन', ढगांसंदर्भात महत्वाचं संशोधन, पावसावर परिणाम होणार का? 

व्हिडीओ

Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
Sanju Samson : वैभव सूर्यवंशीची एंट्री होताच संजू सॅमसनला घरचा रस्ता, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, श्रेयस अय्यरचा लाडका विकेटकीपर संघात दाखल
संजू सॅमसनला घरचा रस्ता, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, श्रेयस अय्यरचा लाडका विकेटकीपर संघात दाखल
ह्रदयद्रावक... भिवंडीत पावसाच्या पाण्यामुळे नाल्यात वाहून गेला चिमुकला; अहिल्यानगरमध्ये करंट लागून चिमुकली ठार
ह्रदयद्रावक... भिवंडीत पावसाच्या पाण्यामुळे नाल्यात वाहून गेला चिमुकला; अहिल्यानगरमध्ये करंट लागून चिमुकली ठार
Embed widget