एक्स्प्लोर

Agriculture News : लातूर जिल्ह्यातील 16 कृषी केंद्रावर कारवाई, नियांमाचं पालन न केल्यानं परवाने रद्द  

रीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे आणि खते पुरवठ्यासाठी कृषी विभागाने काही सूचना केल्या होत्या. त्या सूचनांचे पालन न केल्यामुळं लातूर जिल्ह्यातील 16 कृषी केंद्रावर कारवाई करण्यात आली आहे.

Agriculture News : कृषी विभागाने (Department of Agriculture) केलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्या दोन कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरुपी रद्द केले आहेत. तर 14 केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. लातूर (Latur) जिल्ह्यात कृषी विभागानं ही कारवाई केली आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे आणि खते पुरवठ्यासाठी कृषी विभागाने काही सूचना केल्या होत्या. त्या सूचनांचे पालन न केल्यामुळं ही कारवाई करण्यात आली आहे.

कृषी सेवा केंद्र चालकांचे धाबे दणाणले

कृषी आयुक्तांच्या सूचनेनुसार लातूर जिल्ह्यातील भरारी पथकामार्फत कृषी निरीक्षकांकडून कृषी निविष्ठा विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान कृषी सेवा केंद्रात विक्री परवाना दर्शनी भागात न लावणे, साठा आणि भाव फलक सहज दिसेल अशा ठिकाणी नसणे, साठा नोंदवही अद्ययावत न ठेवणे, बिलावर शेतकऱ्यांची सही अथवा अंगठा न घेणे, विक्री बिलात बियाण्यांचा संपूर्ण माहिती न देणे अशा अनेक त्रुटी या केंद्रामध्ये आढळून आल्या होत्या. तसेच खत आणि औषधांमध्ये लिंकिंग करुन विकण्याचे प्रकार करणे, जिल्ह्यातील औसा तालुक्यात पाच, लातूर तालुक्यात तीन, अहमदपूर तालुक्यात चार, चाकूर तालुक्यातील दोन तर रेनापुर आणि निलंगा तालुक्यात प्रत्येकी एक अशा 16 केंद्रांवर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी दोन केंद्राची परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. कृषी विभागाच्या या कारवाईमुळे कृषी सेवा केंद्र चालकांचे धाबे दणाणले आहेत.

गैरप्रकार करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई 

लातूर जिल्ह्यातील 70 टक्के केंद्रांची तपासणी झाली आहे. अद्यापही काही केंद्रांच्या सतत तक्रारी येत होत्या. तपासणी केली असता यातील 16 केंद्राबाबत कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रभारी जिल्हा कृषी अधिकारी रक्षा शिंदे यांनी दिली. 14 कृषी केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तर दोन केंद्राचे परवाने हे कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. जर कुणी गैरप्रकार करत असतील तर त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल. आमची अनेक पथकं सातत्याने या सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवून असल्याची माहिती रक्षा शिंदे यांनी दिली. 

शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत

राज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत कायम आहेत. पावसामुळं शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. तर काही ठिकाणी पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळं सध्या शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याची सक्त गरज आहे. लवकर पाऊस न पडल्यास आहे ती पिकं वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी पिकं वाया गेली आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या:

Nashik Kharip Season : बोगस खत विक्री केंद्रावर कृषी विभागाची कारवाई, गुन्हे दाखल, अनेक दुकानांची खते विक्री बंद 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कापूस आयातीवरील सीमाशुल्क पूर्णपणे माफ, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
कापूस आयातीवरील सीमाशुल्क पूर्णपणे माफ, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
राज्यतील वातावरणात मोठा बदल, अमरावती जिल्ह्यात गारपीट, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका
राज्यतील वातावरणात मोठा बदल, अमरावती जिल्ह्यात गारपीट, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका
3 हजार रुपये दरासह विकलेल्या कांद्याला 1500 रुपयांचं अनुदान द्यावं, किसान सभेची सरकारकडे मागणी
3 हजार रुपये दरासह विकलेल्या कांद्याला 1500 रुपयांचं अनुदान द्यावं, किसान सभेची सरकारकडे मागणी
वातावरणात मोठा बदल! पुढील तीन ते चार दिवस महत्वाचे, राज्यातील 'या' भागात मुसळधार पावासाचा इशारा 
वातावरणात मोठा बदल! पुढील तीन ते चार दिवस महत्वाचे, राज्यातील 'या' भागात मुसळधार पावासाचा इशारा 

व्हिडीओ

Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Reelstar Rohini Paradhye Death: रीलस्टार रोहिणी पाराध्येच्या अंत्यसंस्कारात स्मशानभूमीतच नातेवाईकांमध्ये वाद; आज पती निलेशची पोस्ट; आतापर्यंत नेमकं घडलं काय?
रीलस्टार रोहिणी पाराध्येच्या अंत्यसंस्कारात स्मशानभूमीतच नातेवाईकांमध्ये वाद; आज पती निलेशची पोस्ट; आतापर्यंत नेमकं घडलं काय?
Vidhan Parishad Election 2026: काल गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाने उमेदवारी अर्ज दाखल केला, आज शिंदे गटाचा मातब्बर नेता रिंगणात; नाशिक विधान परिषदेसाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच
काल गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाने उमेदवारी अर्ज दाखल केला, आज शिंदे गटाचा मातब्बर नेता रिंगणात; नाशिक विधान परिषदेसाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच
Instagram Influencer Death: सगळंच डोळ्यासमोर उभं राहतं; तुझ्याशिवाय हे आयुष्य खूप रिकामं...; रिलस्टार रोहिणी पाराध्येच्या जाण्यानंतर निलेशची पहिलीच पोस्ट, नेमकं काय काय म्हणाला?
सगळंच डोळ्यासमोर उभं राहतं; तुझ्याशिवाय हे आयुष्य खूप रिकामं...; रिलस्टार रोहिणी पाराध्येच्या जाण्यानंतर निलेशची पहिलीच पोस्ट, नेमकं काय काय म्हणाला?
IPL 2026 RCB vs GT : आयपीएल फायनलमध्ये बंगळुरु आणि गुजरात आमने सामने,फायनल कोणं जिंकणार? शुभमन गिलनं थेट उत्तर दिलं...
आयपीएल फायनलमध्ये बंगळुरु आणि गुजरात आमने सामने, मॅच कोण जिंकणार? शुभमन गिलनं थेट उत्तर दिलं... 
Kolhapur Success Story: जिद्दीला सलाम! कोल्हापूरच्या पिता-पुत्राची एकाच वेळी मुंबई पोलिसांत दमदार एन्ट्री, आरुळ गावात जल्लोष; PHOTO
जिद्दीला सलाम! कोल्हापूरच्या पिता-पुत्राची एकाच वेळी मुंबई पोलिसांत दमदार एन्ट्री, आरुळ गावात जल्लोष; PHOTO
Vidhan Parishad Election 2026: 11-4-2...विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित; राष्ट्रवादीला यश, 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला 4 जागा
11-4-2...विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित; राष्ट्रवादीला यश, 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला 4 जागा
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत तब्बल 80 लाख महिला ठरल्या अपात्र, ई-केवायसी दुरुस्तीची मुदत संपल्यानंतर आकडेवारी समोर, मे महिन्याचे पैसे कधी मिळणार?
लाडकी बहीण योजनेत तब्बल 80 लाख महिला ठरल्या अपात्र,मे महिन्याचे पैसे कधी मिळणार?
Mumbai Rains: मुंबईत ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी; पालघरसह मुंबईला यलो अलर्ट
मुंबईत ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी; पालघरसह मुंबईला यलो अलर्ट
Embed widget