Maharashtra Voting Percentage : तिसऱ्या टप्प्यातील मतदान संपलं, सर्वात कमी मतदान बारामतीत?
मुंबई: राज्यातील सर्वाधिक लक्ष्यवेधी असणाऱ्या 11 लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत फक्त 53.40 टक्के मतदान झाल्यांच समोर आलं आहे. त्यामध्ये सर्वाधिक कोल्हापूरमध्ये 63.71 तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात 62.18 टक्के मतदान झालं. सर्वात कमी मतदान बारामतीमध्ये झालं असून 45.68 टक्के मतदान झाल्याने दोन्ही उमेदवारांची धाकधूक वाढल्याचं दिसत आहे.
तिसऱ्या टप्प्यातील एकूण 11 लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे,लातूर - 55.38 टक्केसांगली - 52.56 टक्केबारामती - 45.68 टक्केहातकणंगले - 62.18 टक्केकोल्हापूर - 63.71 टक्केमाढा - 50.00 टक्केउस्मानाबाद - 52.78 टक्केरायगड - 50.31 टक्केरत्नागिरी -सिंधुदूर्ग- 53.75 टक्केसातारा - 54.11 टक्केसोलापूर - 49.11 टक्के























