Abhijit Karande Center Point 9 On Andheri bypoll Election : अंधेरी पूर्वमधून भाजपनं माघार का घेतली?
महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाची तारीख.. कारण याच तारखेला महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना दुपारच्य सुमारास राजकीय संस्कृतीची आठवण झाली.. निमित्त होतं ऋतुजा लटके यांची निवडणूक बिनविरोध करण्याचं.. आधी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली.. मग राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं.. आणि संध्याकाळ होता होता शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं.. त्यामुळे निवडणूक लागल्यापासून ते अर्ज भरेपर्यंत कुणीही का बोललं नाही? आणि 16 तारखेला अचानक असं काय घडलं की राजकीय संस्कृतीची चिंता सर्वच राजकीय पक्षांना सतावू लागली.. या प्रश्नांनी महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं.. अंधेरीतील माघारीचा अर्थ सांगणारा व्हिडीओ




















