एक्स्प्लोर
Heavy Rain | Vasai-Virar मध्ये जनजीवन ठप्प, NDRF कडून रेस्क्यू
वसई-विरार आणि नालासोपारा शहरात आज पावसाचा मोठा तडाखा बसला. यामुळे संपूर्ण जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली गेला होता, तर अंतर्गत रस्तेही पूर्णपणे भरले होते. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. वसई आणि नालासोपारा दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने रेल्वे उशिराने धावत होत्या, काही ठिकाणी तर रेल्वे सेवा बंद पडली होती. वसईच्या मधुबन परिसरातील स्मार्ट सिटीमध्येही मोठ्या प्रमाणावर पाणी भरले. वाघरालपाडा येथे एनडीआरएफची टीम दाखल झाली आणि अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी बोटींचा वापर करण्यात आला. वसईच्या वाघरालपाडा आणि भोईदापाडा या ठिकाणी दोनशे जणांना रेस्क्यू करण्यात आले. कामनच्या सारजा मोरे येथेही एनडीआरएफच्या टीमने दीडशे लोकांना सुरक्षित स्थळी हलवले. वसईच्या मिठागर परिसरात शंभर कुटुंबे आणि एकूण चारशे नागरिक राहतात, तेथेही पाणी भरले होते.
मुंबई
Raj Thackeray On Yuti : जास्त ताण नका, राज ठाकरेंच्या युतीबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना
Mahayuti Full PC : मुंबई शिवसेना-भाजपचा 150 जागांवर एकमत, नवाब मलिक यांच्यासोबत जाण्यास विरोध
Sanjay Raut PC : ...तर एकनाथ शिंदे जेलमध्ये जातील, संजय राऊतांनी सगळंच काढलं
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























