एक्स्प्लोर

Worli Vidhansabha : राज ठाकरेंकडून कौतुक, आदित्य ठाकरेंविरोधात वरळीतून संदीप देशपांडे उमेदवार?

Worli Vidhansabha :  राज ठाकरेंकडून कौतुक, आदित्य ठाकरेविरोधात वरळीतून संदीप देशपांडे उमेदवार?
रळीत आलो की लहानपणीची आठवण येते  तुम्ही मुंबईचे मालक आहाता बाहेरचे येतात आणि टगेगिरी करतात  मुंबईत प्रकल्प लादण्याचे काम सुरुय  अशा लोकांना सोयी सुविधा दिल्या जातात तु्म्हाला मात्र किमंतच नाहीए डेव्हलमेंट प्लान तयार होतो,टाऊनप्लान ानाही 10 वर्षाचं प्लॅनिंग करुन काही होत नाही  आम्ही 250, 300, 400 स्केअर फूटाच अडकलोय ठाण्यात 8 महापालिका आहेत  ठाण्यात सर्वाधिक लोकसंख्या बाहेरुन येतेय  बाहेरुन आलेल्या लोकांमुळे सुविधा अपु-या पडतायत विकासाला माझा विरोध नाहीए बदलापूरच प्रकरण आपल्या लोकांमुळे बाहेर आल, नाहीतर समोर आलं नसत मूळ मुद्द्यापासून वेगळीकडे लक्ष देण्याचे प्रयत्न सुरु आहेत पांढरा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये  साधारण वीस वर्षांपूर्वी तिथल्या अनधिकृत झोपडपट्टी धारकांना ऑफर होती की एक तर घर मिळेल किंवा एक कोटी रुपये मिळतील अशी ऑफर होती... अशी वीस वर्षांपूर्वी ऑफर होते  आणि आपल्याकडे स्क्वेअर फिट वाढवून द्यायला सांगतात  आता अजब ऐकायला आलं की दोन घरांमध्ये एक पार्किंग  म्हणजे आज मी गाडी चालवणार तर उद्या तू चालवणार असं... मुळात तुम्हाला किंमत नाही... एवढा मोठा प्रकल्प जेव्हा येतो किंवा त्याचा विचार होतो तेव्हा तुमच्याशी बोललं गेलं पाहिजे...  तुमची मतं आधी घेतली पाहिजेत...  आधी प्रकल्प आधी लाडाचा आणि मग तुम्हाला विचारायचं... आणि हे फक्त वरळीत चालू नाही   हे महाराष्ट्रातच जागोजागी सुरू आहे  तिथे तिथे हे सुरू आहे तिथे तुम्ही जाऊन बघा की बहुधांशी टक्का मराठी आहे... हे तुमच्या बाबतीत जे लोक करत आहेत जे तुम्हाला आजपर्यंत शासन म्हणून मिळाले त्यात सर्व लोकांना आजपर्यंत मतदान होत आलं...  त्यामुळे त्यांना असं वाटतं की तुम्ही कोण?  याच पद्धतीचे धोरण पुढे राबवायचा असेल तर असंच होणार...  आयत्या वेळेला तुमच्यासमोर चार तुकडे टाकले जाणार आणि तुम्ही समाधानाने गप्प बसणार... जर तुम्हाला स्वाभिमानाने उभं राहायचं असेल जगायचं असेल तर पहिला आधी स्वाभिमानी मनका तंदुरुस्त करून घ्या...  म्हणजे वाटेल ते लादत आहेत अशा गोष्टी होणार नाही... आज मुंबईची परिस्थिती बघा... कुणाचा सुद्धा जाऊन बघा... माहितीच नाही येत आहेत लोक राहत आहेत लोक कुठे जात आहेत माहितीच नाही... आज या वरील सुद्धा भाग  पाहिला  यात डेव्हलपमेंट प्लॅन नाही... एवढी मोठी टाऊनशिप उभी राहणार असेल तर त्यामध्ये शाळा हॉस्पिटल डॉक्टर आहेत का? चांगले मार्केट चांगले थेटर आहेत का  हा कसलाही विचार नाही  आणि आम्ही कुठे अडकलोय की आमचे अडीचशे 400 करा आणि 400 ते 500 करा  हे प्रश्न आपण कधी विचारतच नाही... आणि तुम्ही असे प्रश्न विचारावे असे बिल्डरांना अपेक्षा सुद्धा नसते  त्याचा मलिदा तो घेऊन जाणार तुम्ही मरा... आम्हीच प्रश्न विचारत नाही आहोत... तुमची हक्काची जमीन तुम्ही डेव्हलप करायला देत आहात आणि तुम्ही प्रश्न विचारत नाही आहात... सुरुवातीला गोड गोड बोलून जातात... बिल्डर नावाच्या या काही अवलादी आहेत त्यांना हेच हवा असतं  आणि काही राजकारणी सुद्धा त्यामध्ये असतात... तुम्ही एकत्र राहून तुम्ही एक मुखाने त्यांच्यासमोर उभे राहून बोललं पाहिजे  तर तुमच्या हाताला काही गोष्टी लागतील... आज संदीपने भीषण वरळी ठेवला आहे... दहा दहा वर्षांचा विचार करायचा नसतो  २००३०० वर्षांचा विचार करायचा असतो जेव्हा राष्ट्र उभा करायचा असतो तेव्हा... दहा वर्षात काही होत नसतं... अनेक लोकांनी 30-40 वर्षांपूर्वीची मुंबई पाहिली असेल... एक कॅरेक्टर होतं की लाल बस दिसली की मुंबई काळी पिवळी टॅक्सी दिसली ती मुंबई... प्रत्येक शहराची एक कॅरेक्टर असते... प्रत्येक शहराला कॅरेक्टर असतं पण आपल्या देशात आज कुठल्याही शहराला कॅरेक्टर उरलं नाही... आमच्याकडे ओळख असली आता तर आमच्याकडे फ्लाय ओवर होत आहेत  कशासाठी ब्रिज होत आहेत  माझा डेव्हलपमेंटला विरोध नाही पण हे कोणासाठी आणि कशासाठी होत आहे?? एक एवढीशी जागा त्यामध्ये किती माणसं राहू शकतात त्याला मर्यादा काही आहे की नाही?? आज मुंबईची लोकसंख्या पाहिली तर बाहेरून आलेला लोकांची लोकसंख्या पाहिली... आपला सर्व पैसा महाराष्ट्राला मिळत नाही आपला शेतकरी आत्महत्या करत आहे... जगाच्या पाठीवर एकमेव जिल्हा आहे ठाणे जिल्हा ज्यामध्ये आठ महानगरपालिका आहेत .. ठाणे जिल्ह्यातील लोकांनी लोकसंख्या वाढवली का?? इथला माणूस सुखी झाल्यानंतर जर बाहेरून माणूस आला तर आपण समजून घेऊ... पण इथला माणूस बेकार होत आहे आणि तरी आम्ही बाहेरच्याला कडेवर घेऊ हे कसे शक्य होईल?? आणि निवडणुका राजकारण हे सगळे घुसल्यानंतर कोणाचं याकडे लक्षच नाही... मूळ विषयाकडून तुम्हाला दुसरीकडे न्यायचं एवढाच फक्त राजकारण्यांचा उद्योग सुरू आहे... बदलापूर मध्ये प्रकरण झाले होते आपल्याच लोकांनी बाहेर काढलं नाही तर बाहेर आलं नसतं... मग सगळे लोक सुरु झाले की सरकारने काम केलं नाही पण दरवर्षी या महाराष्ट्रात तीन तीन चार चार हजार असे बलात्काराचे आकडे आहेत... शाळांच्या विश्वासावरती लहान लहान मुली पाठवायच्या आणि त्यांच्या नशिबी हे येणार?? मागे एक विषय काढला होता की अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बांधणार... तेव्हा काँग्रेसचे सरकार होते... तेव्हा हा एकमेव राज ठाकरे होता की  समुद्रात महाराजांचा पुतळा बांधू नका... आधी महाराजांचे गड किल्ले दुरुस्त करा  आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुतळा बांधला त्याचं काय झालं  आपल्याला अजून पुतळे बांधता येत नाही आणि समुद्रात पुतळा बांधायला चालले होते... छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा दोन्हींचा मोठा असेल असं कोणाचातरी वळवळला... फक्त नुसतं ओरडायचं बोंबलायचं आणि बोंबलून ही फक्त मत पाडून घ्यायचे... समुद्रात भराव टाकून मी जे स्ट्रक्चर पाहिलं तसा जर पुतळा बांधायचा म्हटला तर किमान वीस ते पंचवीस हजार कोटी रुपये लागतील... पण त्या पैशात किती गडकिल्ले सुधारतील... पण निवडणुकीच्या तोंडावर येऊन मारे माफ काहीतरी वाटेल ते बोलायचं... संदीप खरंच हिरा आहे... संदीप हा राजकीय दृष्ट्या किंवा आपल्या भागाबद्दल अत्यंत जागृत असलेला मुलगा आहे... विषयावर बोलणार आहे... घडणार असेल तर हो म्हणून सांगतो आणि नाही घडणार असेल तर नाही म्हणून सांगतो... आज त्याने वरळी व्हिजन ठेवला आहे... पण उद्या जेव्हा बाहेरून लोक येऊन वरळीचा मातेला होईल तेव्हा पश्चातापाचा हात डोक्यावर मारू नका... बाकीच्या सगळ्या निघून जातील कोणी हाताला लागणार नाही... पण आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत... जे चांगलं काम करत आहे ते त्यांच्या पाठीवर शाबासकी पडणार आहे की नाही?? आणि ज्यांनी हा सर्व राजकीय सामाजिक गोंधळ घालून ठेवला आहे त्यांच्या पुन्हा पाठीवर शाबासकीची थाप पडणार असेल तर काय बोलायचं... आमच्याकडून जेवढे प्रयत्न करायचे असतील तेवढे शंभर टक्के प्रयत्न होणार...

 

महाराष्ट्र व्हिडीओ

Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10, 25 July 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening
ABP Majha Top 10, 25 July 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening
प्रधान गेले जोशी आले! जाणून घ्या नवीन शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींची राजकीय कारकीर्द  
प्रधान गेले जोशी आले! जाणून घ्या नवीन शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींची राजकीय कारकीर्द  
Dharmendra Pradhan Resignation : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पंतप्रधानांनी स्वीकारला, 'या' मंत्र्याकडे शिक्षणखात्याचा प्रदभार, पेपर फुटी आंदोलनानंतर अखेर मोठा निर्णय
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पंतप्रधानांनी स्वीकारला, 'या' मंत्र्याकडे शिक्षणखात्याचा प्रदभार, पेपर फुटी आंदोलनानंतर अखेर मोठा निर्णय
कोण हरलं आणि कोण जिंकलं हे मी मानत नाही, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया समोर 
कोण हरलं आणि कोण जिंकलं हे मी मानत नाही, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया समोर 

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
Prakash Ambedkar: 22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
Devendra Fadnavis and Amruta Fadnavis: देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
Abhijeet Dipke: काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
Dharmendra Pradhan: राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला; धर्मेंद्र प्रधानांची राजीनाम्यावर प्रतिक्रिया
राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला : धर्मेंद्र प्रधान
NEET Exam Protest: एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
Embed widget