एक्स्प्लोर
Uddhav Thackeray Saamana Interview | ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपचा पलटवार, 'ब्रँड संपला!'
भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सामनामधील मुलाखतीवरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उपाध्ये यांच्या मते, मुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्या विचारांमध्ये विरोधाभास आणि गोंधळ दिसून आला. दररोज ठरवून मुलाखती घेतल्या जातात आणि प्रश्न-उत्तरांचे सत्र चालते, अशी टिप्पणी उपाध्ये यांनी केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिल्याने 'ठाकरे ब्रँड' संपला, असे उपाध्ये म्हणाले. २०१९ मध्ये काँग्रेससोबत गेल्याने बाळासाहेबांच्या विचारांना धक्का लागला, असे त्यांचे म्हणणे आहे. उद्धव ठाकरे 'भिक्केचा कटोरा हातात घेऊन बाबा मला भिक दे भिक दे, माझ्यासोबत ये, माझ्यासोबत ये' असे राज ठाकरे यांना आवाहन करत असल्याचा आरोप उपाध्ये यांनी केला. मुंबईतील मराठी माणसांची संख्या कमी झाली असून, ८२ टक्के मराठी माणूस शिल्लक होता, तो आता ५० टक्के झाला आहे, असे उपाध्ये म्हणाले. नालासोपारा आणि गोवंडीपर्यंत मराठी माणूस हलवला गेला, मुंबईतून बाहेर पाडविला. हे पाप उद्धव ठाकरे यांनी केले आहे, असे उपाध्ये यांनी म्हटले. महानगरपालिका आपल्या घशात कशी घालता येईल, यावरच त्यांचे लक्ष केंद्रित आहे, असा आरोपही त्यांनी केला. मुंबईतील जनता याला भीक घालणार नाही, असे उपाध्ये यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग

एबीपी माझा वेब टीम
Opinion




















