Uddhav Thackeray Full PC : उद्याचा बंद विकृती विरुद्ध संस्कृतीसाठी; राजकीय कारणासाठी नाही - ठाकरे
Uddhav Thackeray Full PC : उद्याचा बंद विकृती विरुद्ध संस्कृतीसाठी; राजकीय कारणासाठी नाही - ठाकरे
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद आता सुरू झालेली आहे. आपण थेट जाऊया पत्रकार परिषदेकडे. आता आपण विचारलं की विषय काय? तर विषय कालचाच आहे, विषय उद्याचा आहे. आणि विषय एकूणच सध्या राज्यामध्ये जे एक अस्वस्थता आहे तोच विषय आहे.
आता मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेशी जे बोलत आहे आणि बोलणार आहे ते उद्याच्या बंद बद्दल आहे. काल मी स्पष्ट केलेला आहे की उद्याचा बंद हा राजकीय कारणासाठी बंद नाही आहे. उद्याचा बंद हा विकृती विरुद्ध संस्कृती या करता हा बंद आहे. अनेक जणांना असं वाटते, बहुतेक सगळ्याच महिलांना आणि पालकांना असं वाटते की आपली मुलगी शाळेमध्ये सुरक्षित राहील का? अनेक माता भगिनींना वाटते की अगदी कामाच्या ठिकाणी आपण जातो, मग ते कार्यालय असतील, रुग्णालय असतील, इथे आपण सुरक्षित राहू का? आणि त्याच एकूण खतखदीला किंवा एक अस्वस्थतेला वाचा फोडण्यासाठी उद्याचा बंद, जसं सरकार म्हणते की विरोधी पक्षानी होय, आम्ही विरोधी आहोत, पण आम्ही विरोधी या विकृतीचे आहोत. त्याच्यामुळे उद्याचा बंद हा विकृतीच्या विरोधकांने केलेला बंद आहे. परत एकदा सांगतो की विकृत सहभागी व्हावं ही माझी सर्वांना आग्रहाची एक मी विनंतीच म्हणेन कारण हा शेवटी सामाजिक प्रश्न आहे आणि या बंद मध्ये आजपर्यंत जसे बंद झालेले आहेत त्याच तसेच बंद तसच उद्याचा जो बंद आहे हा बंद राहील कडकडीत बंद असायला पाहिजे. मात्र त्या बंद मध्ये अत्यावश्यक सेवा ज्या आहेत जसं रुग्णवाहिका सेवा आहेत, वृत्तपत्र आहेत, फायर ब्रिगेड आहेत आणि ज्या ज्या काही अत्यावश्यक सेवा आहेत त्या चालू राहतील.
एकूण जर का आपण पाहिलं तर सणासुरीचे दिवस आहेत, गणपती बाप्पा येत आहेत, दही हंडीची प्रॅक्टिस सुरू आहे आणि हा सगळा विचार केल्यानंतर उद्याचा बंद हा दुपारी दोन वाजेपर्यंत सगळ्यांनी पाळावा अशी माझी विनंती आहे. कारण अनेकांना उत्सव पण करायचे, उत्साह पण आहे पण त्याच्यामध्ये अगदी उत्सवात सुद्धा आपल्या मुलीबाळी सुरक्षित राहतील की नाही हा सुद्धा प्रश्न त्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. सरकारला काही म्हणू देत, मी जनतेच्या वतीने बोलतोय आणि जनतेला सुद्धा आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. केवळ जनतेच मत हे लोकसभेमध्ये किंवा निवडणुकीमध्ये विधानसभेच्या पालिकेच्या वेळेलाच व्यक्त करता येत असं नाही तर मधल्या काळामध्ये सुद्धा जनतेने मत व्यक्त करायला पाहिजे आणि परत एकदा सांगतो की जर काही यंत्रणा वेळेमध्ये हलली असती तर हा उद्रेक झाला नसता.
ज्यांना ज्यांना म्हणायचे की हे सगळं आंदोलन हे राजकारण प्रेरित आहे, हे उस्फूर्त नव्हतं मग उच्च न्यायालयाने याची स्वतःहून जी दखल घेतलेली आहे ती सुद्धा काही राजकारणाने प्रेरित घेतलेली आहे का? काल उच्च न्यायालयाने आपल्या राज्य सरकारला थोबडवलेला आहे. हे थोबडवण सुद्धा हे राजकारणाने प्रेरित झाले म्हणून उच्च न्यायालय केले का? जर उच्च न्यायालय स्वतःची दखल घेत असेल आणि मी असं म्हणेल उत्सफूर्तपणाने सरकारला विचारत असेल तर जनतेला सुद्धा तो अधिकार आहे आणि जनतेचा न्यायालय हे वेगळ आहे. ज्यावेळेला सगळे रस्ते बंद होतात तेव्हा जनतेच्या न्यायालयाचा दरवाजा उघडतो आणि तो तसा आता दरवाजा थोडा हलाल लागलेला आहे तो उघडून नये म्हणून या यंत्रणानी आपापली जबाबदारी व्यवस्थितपणाने पार पाडली पाहिजे आणि ती पाडली जात नाही याची जाणीव करून देण्यासाठी उद्याचा हा बंद आहे.
आणि परत एकदा सांगतो की उद्याचा बंद याच यश अपयश हे राजकारणामध्ये मोजायच कारण नाहीये, उद्याचा बंद हा विकृती विरुद्ध संस्कृत अस आहे. त्याच्यामुळे बंदच यश अपयश हे संस्कृतीच आणि विकृतीच राहणार आहे. जे आपल्या राज्यातले सगळे सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक आहेत, त्या सगळ्यांना मी सांगतोय की उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत सगळ्यांनी हा बंद कडकडीत पाळून आम्ही तुमच्या कारभारावरती आणि आमच्या एकूणच माता भगिनींच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त करत आहोत हे सरकारला दाखवलं पाहिजे.
अ बातम्या तर रोज येत आहेत, काल आपल्याला भेटून आपण की तिथल्या शाळेच्या मुख्याध्यापिकांनी असा प्रश्न केलाय की या जखमा सायकल चालवल्याने झाल्या असतील म्हणजे हे किती निर्दयीपणा करायचा, किती निर्ढावलेपणा करायचा? त्याच्यानंतर पोलिसांना जबाबदारीचा विसर हे बदलापूर अत्याचार प्रकरणाच्या हाताळणीवर उच्च न्यायालयाचे ताशर आहेत. मी उच्च न्यायालयाला पण विनंती करतो की ही जी बाब आहे ही फक्त एका घटनेपुरती मर्यादित नाहीये, रोज घटना घडतायत अगदी इकडे मी वाचून दाखवतो 13 ऑगस्टला. आपण अत्यंत निर्ढावलेपणाने लाडकी बहीण या योजनेच्या आम्ही विरोधात नाही, पण आपण बहिणीची किंमत केवळ पैशामध्ये करत असाल तर कृपा करून त्या बहिणीच्या नात्याला कलंक लावू नका. बहिणीच पहिलं रक्षण करा आणि त्याच्यानंतर मग बहिणीला सुद्धा वाटलं पाहिजे की माझा भाऊ सुद्धा माझं रक्षण करत आहे. शेवटी महिलेला तिच्या रक्षणाखेरीच दुसरं काही महत्त्वाचं नसतं आणि ते रक्षण म्हणजे सुरक्षित बहीण हे फार महत्त्वाच आहे.
तर या सगळ्या घटना चाललेल्या आहेत, बाकीच्या घटना किती सांगायच्या आणि या सगळ्या बातम्या त्या वाचून अक्षरशः संतापाचा कडेलोट होतोय, संतापाचा कडेलोट होतोय. काल जे बदलापूरचे नागरिक आले होते, त्यांनी जे सांगितलं की तिथे आजही अटका सुरू आहेत, परवा आपल्याच माध्यमातून बघितलं की कसं त्यांना दोरखंड्याच्या विळख्यातून एखाद्या दरोडेखोरांच्या टोळीला आणावं, तसं बदलापूरच्या या दुष्टेच्या विरुद्ध उत्सफूर्तपणाने बदलापूरचे नागरिक उतरले होते, त्यांना... राज्यातील तमाम जनतेला मी परत विनंती करतो की आपल्या घरापर्यंत ही विकृती येऊ नये म्हणून वेळेत जागे व्हा आणि उंभ्या उंभरठ्यापर्यंत आलेले संकट त्याचा मुकाबला करायला आम्ही सगळे एक आहोत त्या एकजुटीच प्रदर्शन किंवा दर्शन एक विराट दर्शन हे उद्या घडलं पाहिजे.
बाकी तुमच्या मनात काही प्रश्न असतील ते विचारा त्याच्याबद्दल मी बोलेन. लोकल आणि बस सेवा सुद्धा बंद ठेवले जाणार आहे का? हो बंद ठेवायला पाहिजे कारण उद्याचा बंद हा कोणत्याही राजकीय हेतूने प्रेरित नाही हा जनतेच्या प्रत्येकाच्या मनातला हृदयातला आणि घरातला प्रश्न आहे म्हणून लोकल आणि बस... सरकारला सुद्धा विनंती करतोय, विनंतीच करतोय, जरी मी संताप मनात असला तरी सरकार आणि सरकारी पक्षाला विनंती करतोय की आपल्याला सुद्धा मुलीबाळी आहेत, कुटुंब आहेत, त्यांच्या रक्षणासाठी तुम्ही जरी का, तुम्ही अकार्यक्षम असलात तरी जनता सक्षम आहे, म्हणून उद्याच्या बंदच्या आड पोलिसांची दादागिरी होऊ देऊ नका, कुठेही आताईपणाने सरकारने वागू नये आणि मुद्दामून हट्टाने बंदचा फज्जा उडवण्याचा प्रयत्न करू नका. उद्याचा प्रयत्न तुम्ही जर का केलात तर दोन तीन महिन्यानंतर जनता तुमचा फज्जा उडवल्याशिवाय राहणार नाही.
म्हणून उद्या मी तमाम नागरिकांना परत परत विनंती करतोय की आपण कोणत्याही जाती पाती धर्माची असाल, आपली भाषा कोणतीही असेल, कोणत्याही राजकीय पक्षाची असाल, अगदी भारतीय जनता पक्षाचे जरी असाल तरी हा बंद हा उद्या तुमच्या कुटुंबीयांसाठी सुद्धा आहे म्हणून उद्याच्या बंदमध्ये सहभागी. हा बडून काढण्यासाठी काल रात्री पोलीस महासंचालक आहे ते... पोलिसांना आदेश दिले पाहिजेत की तुम्ही या बंदच्या मध्ये येऊ नका. बाकी मुख्यमंत्री उद्या पुन्हा राखी बंदनाच्या कार्यक्रमाला जाऊ शकतात कारण त्यांच्या मते बहिणी या फक्त मत देण्यासाठी आहेत. बहिणीची किंमत ही फक्त मत आहेत तर माझ्या मते बहिणीची किंमत ही मत नाही तर नात आहे. आम्ही नात जपणारी माणसं आहोत. तुम्हाला जर का वाटत असेल की तुम्ही या बहिणींची मतं विकत घेऊ शकता तेवढ्या माझ्या बहिणी विकाऊ नाहीयत हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. हिंसा होऊ नये.
आता आता बंद हा बंद असतो. माझ्या मते मी नागरिकांना विनंती करतोय की स्वतःहून या बंदमध्ये सहभागी व्हा. जशी उच्च न्यायालयाने आणि कलकत्त्याच्या घटनेची सर्वोच्च... हमें जो भी उसको हम नराधमही कहते हैं, ऐसे विकृत जो नराधम है, उनके खिलाफ पूरे महाराष्ट्र की जनता एक हुई है, अब हम इसको बर्दाश्त नहीं करेंगे, इसके लिए कल का बंद है और कल का बंद, मैंने जैसे कहा कि त्योहार के दिन है, गणपति बापा आने वाले हैं, दही हंडी है, तो कल हम दो बजे तक बंद रखना चाहते हैं और मैं आवाहन करना चाहता हूं, आवाहन मतलब बनती करना चाहता हूं, सारे लोग, मैं जनता को अपील कर रहा हूं, आप किसी भी मजहब के हो, आपकी भाषा कोई भी हो सकती है, पार्टियां कुछ भी कोई हो सकती है, लेकिन आप सब मिलकर अपने बच्चियां, अपनी बहने, माताएं, उनके लिए कल का वन जो है उसमें सहभाग ले और वो चाहे दुकान हो या कुछ भी हो, आपका व्यवहार दो बजने तक आप बंद रखें, लेकिन जीवनावश्यक सेवा जो रहती है, जैसे फायर ब्रिगेड है, एंबुलेंस है, न्यूजपेपर है, वो तो खुली रहेगी, आणि त्याच्या पलीकडे जाऊन केवळ आपल्या माता भगिनींच रक्षण हे झालं पाहिजे, सरकार ते करू शकत नसेल तर आम्ही करायला सक्षम आहोत हे दाखवण्यासाठी .