एक्स्प्लोर
Maha Politics: 'कोणी हात पसरलाय का?', MNS नेते Avinash Abhyankar यांचा आघाडीच्या चर्चांवर थेट सवाल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नेते अविनाश अभ्यंकर (Avinash Abhyankar) यांनी सध्या सुरू असलेल्या राजकीय आघाडीच्या चर्चांवरून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 'कोणी हात पसरलाय आमच्या पक्षाकडून आमच्या नेत्यांकडून आमच्या सर्वोच्च नेतृत्वाकडून हे सगळं काही तुम्हाला ऐकायला मिळालंय का?', असा थेट सवाल करत अभ्यंकर यांनी मनसे आघाडीसाठी प्रयत्नशील असल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. आमच्या पक्षाची भूमिका आणि पुढील वाटचाल काय असेल, याचा निर्णय केवळ आमचे सर्वोच्च नेते राज ठाकरे (Raj Thackeray) हेच घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्याच्या राजकारणात नकारात्मकता पसरवली जात असून, राज ठाकरे या नकारात्मकतेच्या विरोधातच काम करतील, असे अभ्यंकर म्हणाले. त्यामुळे मनसेने कोणाकडे आघाडीसाठी विचारणा केली नसून, इतर कोणी काही बोलत असेल, तर त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे म्हणत त्यांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले.
महाराष्ट्र
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

एबीपी माझा वेब टीम
Opinion




















