एक्स्प्लोर
Mira Bhayandar News | व्यापारी संघटनांचा माफीनामा, 'मराठी अस्मिता मोर्चा' रद्द होणार?
मीरा भाईंदर शहरात मराठी आणि हिंदी भाषिक समुदायांमधील वाद संपुष्टात आणण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. तीन जुलै रोजी मनसे पदाधिकाऱ्यांनी एका दुकानदाराला मारहाण केल्याच्या प्रकरणानंतर हा वाद सुरू झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ मीरा भाईंदर व्यापारी संघटनांनी पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. या व्यापारी मोर्चाविरोधात मराठी एकीकरण समितीने सर्वपक्षीय मराठी पदाधिकारी आणि सामाजिक संस्थांच्या वतीने नाराजी व्यक्त करत निवेदन दिले होते. त्यानंतर मनसेने आठ जुलै रोजी 'मराठी अस्मिता मोर्चा' काढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या मोर्चाच्या पूर्वसंध्येला मीरा भाईंदर व्यापारी संघटनांनी पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांना लेखी माफीनामा दिला आहे. या माफीनाम्यानंतर पोलीस उपायुक्तांनी उद्याचा मोर्चा न काढण्याचं आवाहन केलं आहे. "हिंदी आणि मराठी भाषिक समुदायांमधील वाद संपुष्टात आला आहे," असे पोलीस उपायुक्तांनी स्पष्ट केले. या आवाहनामुळे शहरात शांतता प्रस्थापित होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.
महाराष्ट्र
CM Devendra Fadnavis Sabha Nagpur : होमपीचवर मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार, फडणवीस काय बोलणार?
Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















