एक्स्प्लोर
Zero Hour KarjMafi : कर्जमाफीच्या निर्णयावरून जरांगे-सरकारमध्ये जुंपली ABP Majha
'एबीपी माझा'वरील चर्चेत, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारच्या कर्जमाफीच्या (Loan Waiver) निर्णयावर केलेल्या टीकेला राज्याचे अर्थ आणि कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) यांनी प्रत्युत्तर दिले. सरकारने परवा घेतलेला कर्जमाफीच्या संदर्भातला निर्णय शेतकऱ्यांची 'शुद्ध फसवणूक' आहे, असे वक्तव्य जरांगे पाटील यांनी केले होते. यावर प्रतिक्रिया देताना जयस्वाल म्हणाले की, जरांगे पाटील हे पूर्वग्रहदूषित असून, ते राजू शेट्टी (Raju Shetti) आणि बच्चू कडू (Bachchu Kadu) यांसारख्या शेतकरी नेत्यांची थट्टा करत आहेत, ज्यांनी सरकारसोबत सकारात्मक चर्चा केली. सरकारने कर्जमाफी नाकारली नसून, यापूर्वीच्या कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत, त्यामुळेच यावर समिती नेमण्याचा निर्णय घेतला असल्याचे जयस्वाल यांनी स्पष्ट केले.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















