Devendra Fadnavis : 12 नव्हे 106आमदारांचे निलंबन केले तरी चालेल,पण ओबीसी मुद्यावर बोलत राहू : फडणवीस
मुंबई : विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात जोरदार राडा पाहायला मिळाला. अधिवेशनात तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की प्रकरणी भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे. या निलंबनाच्या कारवाईनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी सरकारवर टीका केली आहे. ओबीसीच्या मुद्यावर आम्ही सरकारले उघडे पाडले. त्यामुळं खोटे आरोप लावून आमदारांना निलंबित केले. 12 नव्हे 106 आमदारांचे निलंबन केले तरी चालेल पण ओबीसी मुद्यावर बोलत राहू, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. भास्कर जाधव काय बोलले ते सांगणार नाही. सर्व शांत झालेले असताना ही मॅन्यूफॅक्चर्ड कारवाई केलीय, असं फडणवीस म्हणाले.





















