एक्स्प्लोर
Bacchu Kadu Protest: 'सरकार जोपर्यंत ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत Nagpur सोडणार नाही', बच्चू कडूंचा इशारा
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वात 'महाएल्गार' मोर्चा आज नागपूरच्या बुटीबोरी येथे पोहोचणार आहे, ज्यामुळे वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. 'आंदोलक केवळ चर्चेच्या आश्वासनावर आंदोलन मागे घेणार नाहीत आणि जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत नागपूर सोडणार नाहीत', असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. या मोर्चामुळे वर्धा-नागपूर रोडवरील वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी जामठा चौकातून वाहतूक एनसीआयकडे वळवण्यात आली आहे. आंदोलकांची मोठी संख्या लक्षात घेता, नागपूर शहर आणि ग्रामीण पोलीस कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवून आहेत. दिवाळीपूर्वी बुटीबोरीतील कामगारांच्या आंदोलनामुळे झालेल्या वाहतूक कोंडीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोलीस विशेष खबरदारी घेत आहेत.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
पुणे
Advertisement
Advertisement

















