एक्स्प्लोर

Asia Cup Trophy : आशिया कप ट्रॉफीचा तिढा सुटणार, बीसीसीआय सचिव आणि मोहसीन नक्वींची बैठक, देवजीत सैकिया म्हणाले...

Asia Cup : आशिया कप ट्रॉफीचा वाद आता मिटण्याची चिन्हं आहेत. कारण बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वींची भेट घेतली आहे.

दुबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी दुबईत आयसीसीच्या बैठकीनंतर पाकिस्तान क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांची भेट घेतली. त्या भेटीनंतर त्यांनी पीटीआयसोबत बोलताना म्हटलं की भारत आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आशिया कप ट्रॉफीसंदर्भातील वाद दूर करण्यात यशस्वी ठरले आहेत. येत्या काही दिवसांमध्ये यावर योग्य मार्ग काढण्यासाठी काम केलं जाईल. 

Asia Cup Trophy Issue : नक्वी अन् सैकियांची बैठक, आशिया कप ट्रॉफीचा तिढा सूटणार

मोहसीन नक्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष असून ते आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष देखील आहेत. याशिवाय मोहसीन नक्वी पाकिस्तानचे गृहमंत्री देखील आहेत. भारतीय क्रिकेट संघानं पाकिस्तानच्या भारत विरोधी भूमिकेमुळं मोहसीन नक्वींच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. याशिवाय पाकिस्तान क्रिकेट संघाच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन देखील भारतीय खेळाडूंनी करणं टाळलं होतं. आशिया कपमध्ये भारतानं पाकिस्तानला तीन वेळा पराभूत केलं होतं. आशिया कप ट्रॉफीच्या फायलनमध्ये भारतानं 5 विकेटनं विजय मिळवला होता. 

सैकिया यांनी शनिवारी पीटीआयसोबत बोलताना म्हटलं की ते आयसीसीच्या औपचारिक आणि अनौपचारिक बैठकीमध्ये सभागी होती. पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी देखील उपस्थित होते. अधिकृत बैठकीच्या अजेंड्यावर आशिया कप ट्रॉफीचा विषय नव्हता. मात्र, आय़सीसीनं त्यांच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यासोबत, इतर अधिकाऱ्याच्या उपस्थितीत पीसीबीच्या अध्यक्षांसह वेगळी बैठक घडवून आणली. 

सैकिया म्हणाले, चर्चेची प्रक्रिया सुरु होणं चागंलं आहे. दोन्ही पक्षांनी आयसीसीच्या बैठकीत सामंजस्यानं भाग घेतला. सैकियांनी पुढं म्हटलं की लवकरच योग्य मार्ग काढला जाईल. आशिया कपची ट्रॉफी सध्या दुबईतील आशियाई क्रिकेट परिषदेच्या मुख्यालयात असून नक्वींनी कर्मचाऱ्यांना आदेश दिले आहेत की त्यांच्या परवानगीशिवाय ट्रॉफी कुठं घेऊन जाऊ नये. 

मोहसीन नक्वी म्हणाले  की भारताला ट्रॉफी त्यांच्याकडून स्वीकारावी लागेल. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया म्हणाले, दोन्ही बोर्ड हा वाद लवकरात लवकर सोडवण्यासाठी काही तरी करतील. आता अडचणी दूर झाल्या आहेत. विविध पर्यायांवर काम केलं जात आहे.सैकिया म्हणाले, दुसऱ्या पक्षाकडे देखील पर्याय असतील आम्ही हा मुद्दा सोडवण्यासाठी सामंजस्यानं मार्ग काढण्यासाठी पर्याय देऊ. 

भारतीय क्रिकेट संघानं आशिया कपची ट्रॉफी जिंकल्यानंतर मोहसीन नक्वींच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळं भारतीय क्रिकेटपटूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन टाळलं होतं. भारत आणि पाकिस्तान तीन वेळा आमने सामने आले होते. त्यामध्ये देखील वाद  झाले होते. पाकिस्तानच्या हॅरिस राऊफवर दोन सामन्यांची बंदी घालण्याचा निर्णय आयसीसीनं घेतला. तर, सूर्यकुमार यादवला मॅच फीच्या 30 टक्के दंड करण्यात आला. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ENG vs PAK :  इंग्लंडनं पाकिस्तानचा धुव्वा उडवला, पाकचा पहिल्या कसोटीत एक डाव आणि 103 धावांनी पराभव, लीडसवर पाकचा पुन्हा पराभव
इंग्लंडकडून पाकिस्तानचा धुव्वा, पहिल्या कसोटीत 103 धावा आणि डावानं विजय, 8 वर्षानंतर पाकचा पुन्हा तसाच पराभव
WTC Final: टीम इंडियाला 8 पैकी 5 कसोटी सामन्यात विजय मिळवताच WTC फायनलचं दार उघण्याची संधी, एका गोष्टीमुळं घात होण्याची शक्यता
भारताकडे WTC फायनलमध्ये पोहोचण्याची संधी पण एका गोष्टीमुळं घात होण्याची शक्यता, जाणून घ्या
ODI Cricket Record : वनडे क्रिकेटमध्ये 'झिरो'वर आऊट न झालेले दिग्गज खेळाडू; लिस्टमध्ये भारतीय स्टारचाही समावेश!
वनडे क्रिकेटमध्ये 'झिरो'वर आऊट न झालेले दिग्गज खेळाडू; लिस्टमध्ये भारतीय स्टारचाही समावेश!
Team India WTC Scenarios Marathi News: WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget