एक्स्प्लोर
Infra Crisis: 'रस्ताच नाही, गाडी कशी चालवायची?', Ahilyanagar-Sambhaji Nagar Highway वर नागरिक संतप्त
अहिल्यानगर (Ahilyanagar) ते छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) महामार्गाच्या भीषण दुरावस्थेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषतः नेवासा (Nevasa) ते अहिल्यानगर दरम्यानच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. 'सोळा किलोमीटर अंतराला एक तास लागतो,' अशी संतप्त प्रतिक्रिया एका प्रवाशाने दिली आहे. अहिल्यानगर-मनमाड महामार्गावरील अवजड वाहतूक या रस्त्याकडे वळवल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेचा थेट परिणाम चाकण MIDC आणि छत्रपती संभाजीनगर MIDC या दोन प्रमुख औद्योगिक वसाहतींमधील वाहतुकीवर होत आहे. मालाचे नुकसान होत असल्याने उद्योगांना फटका बसत आहे. दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला असला तरी पावसाळ्यामुळे कामात अडथळा येत असल्याचे सांगितले जात आहे. संतप्त नागरिकांनी सरकारकडे लवकरात लवकर रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र
Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha
Sanjay Shirsat On Mahayuti And Ravindra Chavan:...तर स्वतंत्र लढू; शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला इशारा
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion





















