एक्स्प्लोर
Uttarkashi Cloudburst | उत्तराखंडमध्ये 100 जण अजूनही बेपत्ता, 13 महाराष्ट्राचे; बचावकार्य सुरू
उत्तराखण्डमध्ये गेलेल्या अठरा जणांच्या गटापैकी तेरा जणांशी संपर्क तुटला आहे. काल दुपारपासून फोन लागत नसल्याने नातेवाईक चिंतेत आहेत. या तेरा जणांपैकी संभाजीनगरचे तेरा जण आहेत, तर उर्वरित अहिल्यानगर आणि ठाण्यातून आहेत. उत्तराखण्डच्या उत्तरकाशी जिल्ह्यात काल भयावह पूर आला होता. या दुर्घटनेत मृतांचा आकडा पाचवर पोहोचला आहे. कालपासून बचाव यंत्रणांनी शंभर तीस जणांना वाचवले आहे. मात्र, शंभरहून अधिक जण अजूनही बेपत्ता आहेत. हरसिल लष्करी तळावर तैनात असलेले दहा जवानही कालपासून बेपत्ता आहेत. लष्कर, एनडीआरएफ (NDRF) आणि एसडीआरएफ (SDRF) कडून बचाव कार्य सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्ते खचल्याने बचाव कार्यात अडचणी येत आहेत. उत्तरकाशीतील धरालीमध्ये, जिथे काल भूस्खलन झाले होते, तिथून परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे.
भारत
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
आणखी पाहा





















