एक्स्प्लोर
Aurangabad : घराबाहेर पडलेल्या तीन मुलांचा शेत तलावात बुडून मृत्यू, दौलताबादच्या शरणापूरमधील घटना
औरंगाबाद खेळण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तीन मुलांचा शेत तलावात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दौलताबाद भागातील शरणापूर परिसरातील सामोरं आला आहे. प्रतीक भिसे, तिरुपती उदळकर आणि शिवराज पवार अशी मुलांची नाव आहेत, तीनही मुलं वाळूज येथील सारा संगम सोसायटीच्या बजाज नगर येथील आहेत .रविवारी सायकल घेऊन दुपारी एक वाजेपासून घराबाहेर पडली होती. मात्र रात्रीपर्यंत घरी तीनही मुलं परत न आल्याने त्याची शोधाशोध सुरू होती.तशी तक्रारही वाळुज एम आय डी सी पोलीस ठाण्यात पालकांनी दिली होती. दरम्यान आज तीनही मुलांचा मृतदेह शरणापूर येथील शेत तळ्यात सापडले आहे. मृतदेह घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे ..
आणखी पाहा



















