एक्स्प्लोर
Shirdi : निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याची आज चाचणी, मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री करणार पाहणी
अहमदनगर जिल्ह्यासह नाशिक जिल्ह्यातील 182 गावांसाठी वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या मुख्य भिंतीचे काम 2011 साली पूर्ण झालं.. तर धरणाच्या डाव्या कालव्याचे कामदेखील पूर्ण झाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज कालव्यात पाणी सोडून पहिली चाचणी करण्यात येणार आहे. या डाव्या कालव्याची लांबी 85 किलोमीटर आहे.. नगर जिल्ह्यातील संगमनेर, कोपरगाव आणि राहाता तालुक्यातील 107 गावे आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील 6 अशी एकत्रित 113 गावांना याचा फायदा होणार आहे. तसंच उजव्या कालव्याचं कामही अंतिम टप्यात आलंय.
आणखी पाहा























