Vikhe Patil Ahmednagar : विखे पाटलांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा ; शेतकऱ्याचं अख्खं कुटुंब रडलं
Vikhe Patil Ahmednagar : विखे पाटलांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा ; शेतकऱ्याचं अख्खं कुटुंब रडलं राज्यामध्ये आठवडाभरापासून वादळ वारे, अवकाळी पाऊस आणि गारपिटीने थैमान घातलंय... हजारो हेक्टरवरील शेती पिकं अक्षरशः उध्वस्त झालीये...अहमदनगरच्या पारनेर तालुक्यात तर वादळी वाऱ्यासह आलेल्या गारपिटीने शेतकऱ्यांची उभी पिकं जमीनदोस्त झालीये... ज्या भागात परतीचा मान्सून कमी झाल्याने दुष्काळाची स्थिती निर्माण होते त्या भागात या अवकाळीने होत्याचं नव्हतं केलं...आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी दाटलंय...जेवढा मोठा बागायतदार तेवढं मोठं नुकसान अशीच काहीशी परिस्थिती झालीये पारनेरच्या वडुले गावच्या पठारे कुटुंबाची.























