एक्स्प्लोर
एकरकमी परतफेड योजनेवर शेतकरी नाखूश | 712 | बीड | एबीपी माझा
राज्य सरकारनं कर्जमाफी जाहीर केल्यानंतर त्यातच ओटीएस ही नवी योजनाही जाहीर केली होती. ओटीएस ही एकरकमी परतफेड योजना आहे. या योजनेमुळे शेतकरी नाखूश झाल्याचं दिसून येतंय. या योजनेमध्ये दीड लाखांच्या वर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचं दीड लाखांचं कर्ज माफ केलं जाणार होतं. त्यावरची रक्कम शेतकऱ्यांना भरायची होती. त्यानुसार दीड लाखांच्या वरची रक्कम अदा केल्यानंतरही शेतकऱ्यांना दीड लाखांची कर्जमाफी मिळाली नसल्याचं दिसून येतंय. ३१ डिसेंबरला ही योजना बंद होणारेय. तेव्हा कर्जमाफीची रक्कम पूर्णपणे शेतकऱ्याच्या खात्यात आल्याशिवाय ही योजना बंद करु नये अशी मागणी केली जातेय. सरकारच्या या भोंगळ कारभारामुळे ओटीएसमध्ये सहभागी असलेल्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जातेय.
ट्रेडिंग न्यूज
Sheetal Mhatre on Matoshree : मातोश्रीवरील मॅडमच्या आग्रहाने अशोक खरातला पाणी जोडणी
Ashok kharat on Shivani Ka Mandir : 'शिवनिका' मंदिर पाडून टाकण्याचा सल्ला
Ashok Kharat School : शालेय जीवनात अशोक खरातची 'कोंबडीचोर' म्हणून ओळख
Kokan Hapus Mango : वातावरणाच्या लहरीपणाचा फळांच्या राजाला फटका, उत्पादन घटलं Special Report
Ashok Kharat Case : भोंदू खरातची विहीर, जादूटोण्याचा उपसा Special Report
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे

















