एक्स्प्लोर
Zero Hour Atul Bhatkhalkar : दिल्लीतील बॉम्बस्फोट सरकारचं अपयश, पण विरोधकांसारखं राजकारण करणार नाही
देशाची राजधानी दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या (Delhi Blast) पार्श्वभूमीवर आयोजित चर्चासत्रात भारतीय जनता पार्टीचे (BJP) आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी सहभाग घेतला. 'हे अपयश आहे का ते अपयश आहे,' असे म्हणत त्यांनी ही घटना सुरक्षा यंत्रणांचे अपयश असल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित केले. गेल्या ११ वर्षांच्या मोदी सरकारच्या कार्यकाळात देशात एकही बॉम्बस्फोट झाला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. दिल्लीतील ताज्या हल्ल्यामुळे या सुरक्षिततेच्या भावनेला तडा गेला आहे, असे भातखळकर म्हणाले. त्यांनी काँग्रेसवर टीका करत म्हटले की, 'यूपीएच्या काळात दर दोन महिन्यांनी बॉम्बस्फोट व्हायचे.' बाटला हाऊस चकमकीचे राजकारण केल्याचा आरोपही त्यांनी काँग्रेसवर केला. पंतप्रधानांनी या हल्ल्यामागील सूत्रधारांना सोडणार नाही, असे आश्वासन दिले आहे आणि पुलवामा हल्ल्याप्रमाणेच या हल्ल्यालाही चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा विश्वास भातखळकर यांनी व्यक्त केला.
All Shows
झीरो अवर

Zero Hour Full Episode : महापालिका निवडणुकीत बंडखोरीचा फटाक कोणाला बसेल?

Zero Hour Full : तिकीट न मिळाल्यानं कार्यकर्त्यांच्या नाराजीचा महापालिका निकालांवर किती परिणाम?

Zero Hour Full मुंबईत ठाकरेंच्या घोषणेचा मुहूर्त ठरला,ठाकरे एकत्र आले तर महायुतीला किती मोठं आव्हान?

Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Advertisement
Advertisement

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion



























