पावसाळी अधिवेशन 202: शेताच्या बांधापासून ते तालिकाध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत भास्कर जाधवांची कारकीर्द
मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की केल्या प्रकरणी भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. गैरवर्तन करणाऱ्या आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. अभिमन्यू पवार, आशिष शेलार, अतुल भातखळकर, जयकुमार रावल, राम सातपुते, गिरीश महाजन, संजय कुटे, नारायण कुचे, पराग आळवणी, हरिश पिंपळे, नारायण कुचे, कीर्तिकुमार भांगडिया यांचं निलंबन करण्यात आलं आहे. या गैरवर्तन करणाऱ्या 12 आमदारांच्या गैरवर्तनाबद्दल त्यांना निलंबित करण्यात यावं असा ठराव अनिल परब यांनी मांडला. या सर्व सदस्यांचे निलंबन एक वर्षांसाठी करण्यात आलं असून त्यांना मुंबई आणि नागपूर विधीमंडळाच्या आवारात एक वर्षे येण्यासाठी बंदी घातली आहे.
All Shows
































