Special Report On Women CM : महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळणार का? चर्चेत कुणाची नावं?
Supriya Sule and Rashmi Thackeray, मुंबई : संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती होऊन आणि यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगलकलष आणून जवळपास 64 वर्षे उलटली आहेत. मात्र, अद्याप महाराष्ट्राला एकदाही महिला मुख्यमंत्री मिळालेली नाही. विधानसभा निवडणुका 2 महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असताना 'महिला मुख्यमंत्री' हा विषय चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळू शकते का? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे. त्यावर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केलंय. त्या एका वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.
वर्षा गायकवाड काय काय म्हणाल्या?
महाराष्ट्राची मुख्यमंत्री महिला झाली तर मला फारच आनंद होईल. महाराष्ट्र पुरोगामी आणि प्रगत आहे. आता 50 टक्के आरक्षण आपण लागू केलं आहे. यामध्ये महाराष्ट्राचं आघाडीवर आहे. महाविकास आघाडीतील सर्व पक्षांकडे मुख्यमंत्रीपदासाठी महिलांचे चेहरे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये सुप्रिया सुळे (Supriya Sule) आहेत, ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आहेत. आमच्या काँग्रेस पक्षात सुद्धा महिला आहेत. शेवटी याबाबतचा निर्णय निवडून आलेली आमदार मंडळी ठरवत असतात.