एक्स्प्लोर

IND vs ENG, Virat Kohli : कोट्यवधी भारतीयांचा भ्रमनिरास, कोहलीचं विश्वचषक विजयाचं स्वप्न यंदाही अधुरं

India vs England : भारतीय संघाला सेमीफायनलच्या सामन्यात इंग्लंडकडून 10 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं आहे. ज्यामुळे भारताचं टी20 विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलं आहे.

Virat Kohli Emotional : टी20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) सेमीफायनलमध्ये भारताला अतिशय लाजिरवाण्या पराभवाला तोंड द्यावं लागलं आहे. इंग्लंडने भारताचा 10 विकेट्सने पराभव केला. या विजयासह इंग्लंडने अंतिम फेरीत धडक मारली आहे. तर भारताचं विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलं आहे. दरम्यान टीम इंडियाच्या या पराभवाने करोडो चाहत्यांची मनं तुटली आहेत. विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या अनेक खेळाडूंची विश्वचषक विजयाची स्वप्न उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे भारतीय संघाने 2007 नंतर अजून एकहादी टी20 विश्वचषक जेतेपद पटकावलेलं नाही.

भारताला आधी नाणेफेक गमवावी लागली. ज्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात यावं लागलं. भारताचे सलामीवीर फेल झाल्यावर कोहली आणि पांड्या या दोघांनी भारताचा डाव सावरत 168 रन स्कोरबोर्डवर लावले. पण 169 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या इंग्लंडने सुरुवातीपासून स्फोटक फलंदाजी सुरु ठेवली. कर्णधार जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांनी पहिल्या ओव्हरपासून चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत धावसंख्या वाढवत ठेवली. बटलरने 49 चेंडूत नाबाद 80 धावा तर हेल्सने 47 चेंडूत नाबाद 86 धावा केल्या. ज्यामुळे अवघ्या 17 षटकातंच त्यांनी हे आव्हान पार करत सामना खिशात घातला.

कोट्यवधी भारतीयांची मन तुटली

भारताचा हा अत्यंत महत्त्वाच्या सामन्यातील पराभव एखाद्या वाईट स्वप्नापेक्षा कमी नाही. 2007 मध्ये भारताने पहिल्यांदा आणि शेवटच्यांदा T20 विश्वचषक जिंकला होता. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने इतिहास रचला. यावेळी टीम इंडिया आपल्या नेतृत्वाखाली वर्ल्ड चॅम्पियन होईल, अशी आशा सर्वांनाच होती. किंग कोहलीलाही हीच आशा होती. पण हे होऊ शकले नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला, मात्र अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास करू शकला नाही.  2007 नंतर 2014 मध्येही T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचली होती. त्यांना अंतिम फेरीत श्रीलंकेविरुद्ध 6 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. तर इंग्लंडने 2010 मध्ये विजय मिळवला होता, तर 2016 मध्येही फायनल गाठली होती. पण फायनलमध्ये वेस्ट इंडिजकडून 4 विकेट्सने ते पराभूत झाले. यंदा त्यांना पाकिस्तानला मात देऊन विश्वचषक जिंकायची संधी आहे.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीतSpecial Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतोNashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
Embed widget