एक्स्प्लोर

IND vs ENG, Virat Kohli : कोट्यवधी भारतीयांचा भ्रमनिरास, कोहलीचं विश्वचषक विजयाचं स्वप्न यंदाही अधुरं

India vs England : भारतीय संघाला सेमीफायनलच्या सामन्यात इंग्लंडकडून 10 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं आहे. ज्यामुळे भारताचं टी20 विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलं आहे.

Virat Kohli Emotional : टी20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) सेमीफायनलमध्ये भारताला अतिशय लाजिरवाण्या पराभवाला तोंड द्यावं लागलं आहे. इंग्लंडने भारताचा 10 विकेट्सने पराभव केला. या विजयासह इंग्लंडने अंतिम फेरीत धडक मारली आहे. तर भारताचं विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलं आहे. दरम्यान टीम इंडियाच्या या पराभवाने करोडो चाहत्यांची मनं तुटली आहेत. विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या अनेक खेळाडूंची विश्वचषक विजयाची स्वप्न उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे भारतीय संघाने 2007 नंतर अजून एकहादी टी20 विश्वचषक जेतेपद पटकावलेलं नाही.

भारताला आधी नाणेफेक गमवावी लागली. ज्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात यावं लागलं. भारताचे सलामीवीर फेल झाल्यावर कोहली आणि पांड्या या दोघांनी भारताचा डाव सावरत 168 रन स्कोरबोर्डवर लावले. पण 169 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या इंग्लंडने सुरुवातीपासून स्फोटक फलंदाजी सुरु ठेवली. कर्णधार जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांनी पहिल्या ओव्हरपासून चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत धावसंख्या वाढवत ठेवली. बटलरने 49 चेंडूत नाबाद 80 धावा तर हेल्सने 47 चेंडूत नाबाद 86 धावा केल्या. ज्यामुळे अवघ्या 17 षटकातंच त्यांनी हे आव्हान पार करत सामना खिशात घातला.

कोट्यवधी भारतीयांची मन तुटली

भारताचा हा अत्यंत महत्त्वाच्या सामन्यातील पराभव एखाद्या वाईट स्वप्नापेक्षा कमी नाही. 2007 मध्ये भारताने पहिल्यांदा आणि शेवटच्यांदा T20 विश्वचषक जिंकला होता. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने इतिहास रचला. यावेळी टीम इंडिया आपल्या नेतृत्वाखाली वर्ल्ड चॅम्पियन होईल, अशी आशा सर्वांनाच होती. किंग कोहलीलाही हीच आशा होती. पण हे होऊ शकले नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला, मात्र अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास करू शकला नाही.  2007 नंतर 2014 मध्येही T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचली होती. त्यांना अंतिम फेरीत श्रीलंकेविरुद्ध 6 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. तर इंग्लंडने 2010 मध्ये विजय मिळवला होता, तर 2016 मध्येही फायनल गाठली होती. पण फायनलमध्ये वेस्ट इंडिजकडून 4 विकेट्सने ते पराभूत झाले. यंदा त्यांना पाकिस्तानला मात देऊन विश्वचषक जिंकायची संधी आहे.

हे देखील वाचा-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

K Annamalai: तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईं पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईं पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Gokul Kolhapur: 'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल

व्हिडीओ

Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha
Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Pune Vidhan Parishad : काकडेंच्या एन्ट्रीने टिंगरेंना धक्का? NCP तील नाराजीनाट्य | Special Report
Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
K Annamalai: तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईं पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईं पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Gokul Kolhapur: 'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
Iran War Live: तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
Embed widget