एक्स्प्लोर

INDW vs AUSW, Semi Final : भारताच्या पराभवास जबाबदार कोण? काय आहेत कारणे

INDW vs AUSW, Semi Final : भारतीय महिला संघाचं विश्वचषक विजयाचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं आहे. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पाच धावांनी पराभव केला.

INDW vs AUSW, Semi Final : भारतीय महिला संघाचं विश्वचषक विजयाचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं आहे. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पाच धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 172 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरदाखल भारतीय संघ 167 धावांपर्यंत मजल मारु शकला. यानंतर भारतीय चाहते पराभवाची कारणं शोधत आहेत. पाहूयात.. कोणत्या कारणामुळे भारताचा पराभव झाला.. 

भारताच्या पराभवाचं प्रमुख कारण आघाडीची फळी अपयशी ठरणे हे होय. सलामी फलंदाज शेफाली वर्मा (9), स्मृती मंधाना (2) आणि यास्तिका भाटिया (4) या आघाडीच्या तीन फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. 173 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाला निराशाजनक सुरुवात मिळाली. परिणामी भारताला पराभवाचा सामना करावा लागला. 

खराब फिल्डिंग हेही भारताच्या पराभवाचं कारण आहे. एकीकडे ऑस्ट्रेलियाच्या फिल्डर्सनी जिवाचं रान करत धावा रोखल्या.. तर दुसरीकडे भारताच्या फिल्डर्सनी सोपे झेल सोडले.. गरज नसताना एकेरी दुहेरी धावा दिल्या. ऋचा घोष आणि शेफाली वर्मा यांनी झेल सोडले. याचा फटका टीम इंडियाला बसला. ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंग हिला सुरुवातीलाच जिवनदान दिले. त्याशिवाय बेथ मूनीचाही झेल सोडला. या दोन्ही फलंदाजांनी नंतर धावांचा पाऊस पडला. 

भारताची खराब गोलंदाजी -

उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी खराब कामगिरी केली. स्नेह राणा, राधा यादव, शिखा पांडे, रेनुका सिंह आणि दिप्ती शर्मा एकाही गोलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. एकाही गोलंदाला धावा रोखण्यात यश आले नाही. शिखा पांडेनं सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर राधझा यादव आणि दिप्ती शर्मा यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली. रेणुका सिंह सर्वात महागाडी गोलंदाज ठरली. रेणुकाने चार षटकात दहा पेक्षा जास्त सरासरीने धावा लुटल्या.  

जेमिमा-हमरनप्रीत लढल्या -
तीन विकेट झटपट पडल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत आणि जेमिमा यांनी भारताचा डाव सावरला. जेमिमाने अवघ्या 24 चेंडूत 43 धावांची खेळी केली. तर हरमनप्रीतने कर्णधाराला साजेशी खेळी करताना अर्धशतक झळकावले. हरमनप्रीतने 34 चेंडूत 52 धावांची खेळी केली. हरमनप्रीतने आपल्या खेळीदरम्यान एक षटकार आणि सहा चौकार लगावले. हरमनप्रीत कौर आणि जेमिमा या दोघींनी चौथ्या विकेटसाठी 41 चेंडूत 69 धावांची भागिदारी केली. या दोन्ही फलंदाजांनी विजयासाठी पूर्णपणे प्रयत्न केले, पण इतर फलंदाजांकडून साथ मिळाली नाही. परिणामी भारताचा पाच विकेटनं पराभव झाला.  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Weather Alert: हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?

व्हिडीओ

Special Report Solapur Elections : राजकारण कोणत्या थराला? निवडणूक रणधुमाळीत भीषण हत्याकांड
Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे
Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde Full Speech Mumbai : पहिला वार राज-उद्धव ठाकरेंवर; एकनाथ शिंदेंचं घणाघाती भाषण
Devendra Fadnavis : मुंबईचा महापौर महायुतीचा, हिंदू, मराठीच; फडणवीसांचा एल्गार, ठाकरे बंधूंवर प्रहार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Weather Alert: हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
Embed widget