एक्स्प्लोर

T20 World Cup 2022 : आगामी विश्वचषकात गेमचेंजर ठरु शकतो 'हा' खेळाडू, एकट्याच्या जीवावर जिंकवू शकतो सामना

Team India for T20 WC : बीसीसीआयनं नुकतीच आगामी टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर केला. यावेळी युवा खेळाडूंची फौज घेऊन रोहित शर्मा मैदानात उतरेल.

Team India for ICC T20 World Cup : ऑस्ट्रेलियाच्या भूमीत 16 ऑक्टोबरपासून टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) सुरु होणार आहे. यासाठी बीसीसीआयनं नुकताचं भारतीय संघ जाहीर केला आहे. संघामध्ये भारताचा स्टार अष्टपैलू आणि सध्या कमाल फॉर्ममध्ये असलेल्या हार्दिक पंड्याचाही (Hardik Pandya) समावेश करण्यात आला आहे. दुखापतीमुळे बराच काळ खराब फॉर्ममध्ये राहिलेल्या हार्दिकनं आयपीएल 2022 मध्ये गुजरात संघाचा कर्णधार होत संघाला जेतेपद मिळवून दिलंच पण सोबतच भारतीय संघातही यशस्वी पुनरागमन केलं आहे. त्यामुळे आगामी टी20 विश्वचषकात तो संघासाठी गेमचेन्जर ठरु शकतो. कारण हार्दीकमध्ये एकट्याच्या जीवावर सामना जिंकवून देण्याची ताकद आहे. त्यात तो कमाल फॉर्मात असल्याने आतातर तो संघासाठी हुकूमी एक्का आहे.

नुकत्याच पार पडलेल्या आशिया कपमध्ये  (Asia Cup 2022) हार्दिक पंड्या संघात होता. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने तुफानी कामगिरी केली होती. सामन्यात 33 धावा करण्यासोबतच हार्दिकने 3 विकेट्सही घेत सामनावीराचा मान मिळवला. यापूर्वी त्याने मँचेस्टरमध्ये इंग्लंडविरुद्धही त्याने अप्रतिम कामगिरी केली होती. यानंतर त्यानं वेस्ट इंडिज दौऱ्यातही चमकदार कामगिरी केली. त्यामुळे सध्यातरी हार्दिक अष्टपैलू खेळाडू म्हणून टीम इंडियामध्ये अगदी फिक्स झाला आहे.

हार्दिकची कारकिर्द

हार्दिकच्या कारकिर्दीचा विचार करता तो कायमच एक महत्त्वाचा खेळाडू ठरला आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 70 T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 884 धावा केल्या आहेत. यादरम्यान हार्दिकने 61 चौकार आणि 48 षटकार मारले आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने 54 विकेट्सही घेतल्या आहेत. पंड्याने इंडियन प्रीमियर लीगमध्येही चांगली कामगिरी केली आहे. वनडे फॉरमॅटचा रेकॉर्ड बघितला तर त्याने 66 मॅचमध्ये 1386 धावा केल्या आहेत. यासह 63 विकेट्स घेतल्या आहेत.

T20 World Cup साठी भारतीय संघ जाहीर

टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाचा विचार करता रवींद्र जाडेजा दुखापतग्रस्त झाल्यामुळे अक्षर पटेलला संधी देण्यात आली आहे. त्याशिवाय बुमराहसह हर्षल पटेलही दुखापतीतून सावरल्यामुळे ते दोघेही संघात परतले आहेत. अर्शदीपलाही एक लेफ्ट हँड पेसर म्हणून संघात जागा दिली आहे. तर नेमकी टीम इंडिया कशी आहे ते पाहूया...

टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ 

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन आश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल.

राखीव खेळाडू

मोहम्मद शमी, दीपक चाहर, रवी बिश्नोई आणि श्रेयस अय्यर

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Ravi Shastri Picks Team India Squad For ODI World Cup 2027: भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
ट्रम्पना अंधारात ठेवत इस्त्रायलने इराणच्या थेट गॅस प्रकल्पाला हात घातला अन् इराणकडून सात देशांचा गॅस टार्गेट; खतांपासून ते वीज निर्मितीपर्यंत भारतासह जगाला 'इस्त्रायली कर्मांची' जबर किंमत मोजावी लागणार
ट्रम्पना अंधारात ठेवत इस्त्रायलने इराणच्या थेट गॅस प्रकल्पाला हात घातला अन् इराणकडून सात देशांचा गॅस टार्गेट; खतांपासून ते वीज निर्मितीपर्यंत भारतासह जगाला 'इस्त्रायली कर्मांची' जबर किंमत मोजावी लागणार
ICC : आयसीसीकडून टी 20 वर्ल्ड कप खेळणाऱ्या संघांना बक्षीस जाहीर, भारताला 25 कोटी मिळणार, पाकिस्तान आणि झिम्बाब्वेला किती रक्कम मिळाली?
ICC कडून टी 20 वर्ल्ड कप खेळणाऱ्या संघांना बक्षीस जाहीर, भारताला 25 कोटी मिळणार, पाकिस्तानला किती?
Suryakumar Yadav Ind Vs NZ Final: 'मी त्याला लहानपणापासून पाहतोय, आजच्या सामन्यात अभिषेक अन् सूर्या...', भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवच्या प्रशिक्षकांचं महत्त्वाचं भाकीत
मी त्याला लहानपणापासून पाहतोय, आजच्या सामन्यात अभिषेक अन् सूर्या...', भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवच्या प्रशिक्षकांचं महत्त्वाचं भाकीत

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget