एक्स्प्लोर

टी-20 तिरंगी मालिकेसाठी टीम इंडिया कोलंबोत दाखल

टी-20 सामन्यांच्या तिरंगी मालिकेला कोलंबोत सुरुवात होत आहे. या मालिकेतल्या सलामीच्या सामन्यात भारताचा मुकाबला श्रीलंकेशी होत आहे. टीम इंडिया या मालिकेसाठी कोलंबोत दाखल झाली आहे.

कोलंबो/मुंबई : रोहित शर्माच्या टीम इंडियासह श्रीलंका आणि बांगलादेशचा समावेश असलेल्या टी-20 सामन्यांच्या तिरंगी मालिकेला कोलंबोत मंगळवारपासून सुरुवात होत आहे. या मालिकेतल्या सलामीच्या सामन्यात भारताचा मुकाबला श्रीलंकेशी होत आहे. टीम इंडिया या मालिकेसाठी कोलंबोत दाखल झाली आहे. आयपीएलच्या अकराव्या युद्धाचे नगारे वाजू लागले आहेत. आयपीएलच्या या युद्धाला तोंड फुटण्याआधी भारतीय क्रिकेटरसिकांना संधी मिळणार आहे ती टी-20 सामन्यांच्या तिरंगी मालिकेचा आनंद लुटण्याची. रोहित शर्माच्या टीम इंडियासह यजमान श्रीलंका आणि बांगलादेश संघांचा या तिरंगी मालिकेत समावेश आहे. या तिरंगी मालिकेतल्या सर्व सामन्यांचं आयोजन कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवरच करण्यात आलंय. त्यातल्या सलामीच्या सामन्यात भारताची गाठ ही श्रीलंकेशी पडणार आहे. अनुभवी खेळाडूंना विश्रांती, रोहित शर्माकडे सूत्रं टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातल्या वन डे आणि टी-20 सामन्यांच्या मालिकेत घवघवीत यश मिळवलं. त्या दौऱ्याचा ताण हलका करण्यासाठी बीसीसीआयने कर्णधार विराट कोहली आणि यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीसह कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमरा आणि हार्दिक पंड्या या प्रमुख शिलेदारांना विश्रांती दिली आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत श्रीलंकेतल्या तिरंगी मालिकेसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदाची सूत्रं रोहित शर्माच्या हाती सोपवण्यात आली आहेत. रोहित शर्माने आजवर कर्णधार या नात्याने चार टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत जबाबदारी सांभाळली आहे. त्या चारही सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय साजरा केला होता. मुंबई इंडियन्सचा कर्णधार या नात्यानेही रोहितच्या गाठीशी आयपीएलच्या रणांगणातला सर्वोच्च अनुभव आणि यश आहे. त्यामुळे कर्णधार या नात्याने टीम इंडियाला श्रीलंकेत विराट कोहलीची अनुपस्थिती भासणार नाही, अशी आशा आहे. विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांची एक कर्णधार या नात्याने अनुपस्थिती जाणवू न देण्याची मोठी जबाबदारी रोहितसह शिखर धवन, सुरेश रैना आणि मनीष पांडेवर राहिल. यष्टिरक्षक म्हणून निवड झालेल्या दिनेश कार्तिक आणि रिषभ पंतचाही भारतीय फलंदाजीला मोठा आधार लाभेल. रिषभ पंतने यंदा मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत अवघ्या 32 चेंडूंमध्ये शतक ठोकण्याचा पराक्रम गाजवला होता. श्रीलंकेतल्या मालिकेतही भारतीय संघाला त्याच्याकडून अशाच तडफदार खेळींची अपेक्षा राहील. युवा खेळाडूंवर गोलंदाजीची धुरा दक्षिण आफ्रिका दौरा गाजवणाऱ्या प्रमुख गोलंदाजांऐवजी भारतीय संघात शार्दूल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज या वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. शार्दूलने दक्षिण आफ्रिकेतल्या अखेरच्या टी-20 सामन्यांमध्ये मिळालेल्या संधीचं सोनं केलं होतं. पण डावखुऱ्या जयदेव उनाडकटवर आयपीएलच्या लिलावात आलेली साडेअकरा कोटींची बोली सार्थ ठरवण्याची अजूनही जबाबदारी आहे. चायनामन कुलदीप यादवच्या अनुपस्थितीत यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यावर भारताच्या फिरकी आक्रमणाची भिस्त राहिल. आयसीसीच्या टी-20 सामन्यांच्या क्रमवारीत टीम इंडिया सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. या क्रमवारीत श्रीलंका आठव्या तर बांगलादेश दहाव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे श्रीलंकेतल्या तिरंगी मालिकेच्या रणांगणात भारतीय संघाचं पारडं जड मानलं जात आहे. त्यात टीम इंडियाने गेल्या वर्षभरात टी-20 सामन्यांच्या पाच मालिकांवर आपलं वर्चस्व गाजवलं आहे. युवा खेळाडूंचा भरणा असलेली रोहित शर्माची टीम इंडिया श्रीलंकेतही तीच विजयी परंपरा कायम राखेल, असा जाणकारांना विश्वास आहे. भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), केएल राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), दीपक हुड्डा, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, विजय शंकर, शार्दूल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, ऋषभ पंत (विकेटकीपर)

महत्त्वाच्या बातम्या

Shreyas Iyer : टीम इंडियाचं विजयाच्या ट्रॅकवर कमबॅक, झिम्बाब्वेवर 7 विकेटनं विजय, श्रेयस अय्यरनं पहिल्या विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
भारताचा झिम्बाब्वेवर 7 विकेटनं विजय, श्रेयस अय्यरनं पहिल्या विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
Sachin Tendulkar : 'अपयश आले तरी चालते पण गैरमार्ग स्वीकारणं योग्य नाही', सचिन तेंडुलकरची वडिलांची शिकवण सांगत विद्यार्थी आंदोलनावर पोस्ट
'अपयश आले तरी चालते पण गैरमार्ग स्वीकारणं योग्य नाही', सचिन तेंडुलकरची वडिलांची शिकवण सांगणारी पोस्ट
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Vaibhav Sooryavanshi : अभिषेक शर्मा पुन्हा फ्लॉप, वैभव सूर्यवंशीनं हरारेचं मैदान गाजवलं, बेबी बॉसचं झिम्बाब्वे विरुद्ध वादळी अर्धशतक 
अभिषेक शर्मा पुन्हा फ्लॉप, वैभव सूर्यवंशीनं हरारेचं मैदान गाजवलं,झिम्बाब्वेमध्ये बेबी बॉसची वादळी फलंदाजी

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget