एक्स्प्लोर

IPL 2020 : सीएसकेला धक्का; स्टार खेळाडूकडून बायो बबलचं उल्लंघन

कोरोनामुळे यंदाच्या मोसमात बायो बबलची व्यवस्था करण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खेळाडूंवर अत्यंत कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

IPL 2020 : इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सीझनचं आयोजन कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे भारताबाहेर दुबईत करण्यात आलं आहे. आयपीएलच्या 13व्या सीझनच्या आयोजनासाठी आयपीएलमध्ये सहभागी होणारे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ या सर्वांना बायो बबलमध्ये ठेवण्यात आलं आहे. आयपीएलच्या आयोजनासाठी बायो बबलचे नियम अत्यंत कठोर करण्यात आले आहेत. तसेच बायो बबलचे नियम तोडणाऱ्यांसाठी कठोर शिक्षा देण्यात येणार आहे. आता बायो बबलचा फटका सीएसकेचा वेगवान गोलंदाज एम. आसिफला बसला आहे. एम. आसिफ आयपीएलचा बायो बबलचे नियम मोडणारा पहिला खेळाडू ठरला आहे.

चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज एम. आसिफने काही दिवसांपूर्वी बायो बबलच्या नियमांचं उल्लंघन केलं. आसिफकडून आपल्या हॉटेलच्या रूमची चावी हरवली होती. त्यानंतर आसिफ दुसरी चावी घेण्यासाठी हॉटेलच्या रिसेप्शनवर गेला. परंतु, बायो बबल प्रोटोकॉलमध्ये रिसेप्शन एरियाचा समावेश होत नाही. त्यामुळे आसिफला बायो बबल तोडण्यासाठी 6 दिवसांसाठी क्वॉरंटाईन राहावं लागणार आहे.

पॉइंट टेबलमध्ये धोनीच्या संघाला मोठा झटका; ऑरेंज आणि पर्पल कॅप कुणाकडे?

आसिफची ही पहिलीच चूक होती त्यामुळे फक्त क्वारंटाईन ठेवण्यात आलं आहे. जर आसिफने या सीझनमध्ये पुन्हा एकदा चूक केली तर मात्रा त्याला आपल्या चुकीची शिक्षा म्हणून आयपीएलच्या 13व्या सीझनमधून बाहेर काढलं जाऊ शकतं. सीएसकेच्या मॅनेजमेंटने दिलेल्या माहितीनुसार, आसिफचा क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण झालेला आहे आणि त्याने संघासोबत पुन्हा प्रॅक्टिस करण्यास सुरुवात केली आहे.

कठोर शिक्षेची तरतूद

आयपीएलच्या 13व्या सीझनमध्ये बायो बबल तोडणाऱ्या खेळाडूला मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. पहिल्यांदा बायो बबल मोडल्यामुळे एका खेळाडूला 6 दिवसांसाठी क्वॉरंटाईनमध्ये पाठवण्यात आलं आहे. दुसऱ्यांदा जर ही चूक झाली तर त्या खेळाडूला एका सामन्यासाठी बाहेर बसावं लागू शकतं. तिसऱ्यांदा जर पुन्हा त्याच खेळाडूने अशी चूक केली, तर मात्र त्या खेळाडूला आयपीएलच्या 13व्या सीझनमधून बाहेर काढलं जाऊ शकतं. एवढचं नाहीतर बायो बबल मोडणारा खेळाडू ज्या संघातील असेल त्यांना त्याची रिप्लेसमेंटही मिळणार नाही.

बायो बबल म्हणजे काय?

आयपीएल 2020 स्पर्धेदरम्यान खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून बायो बबलची व्यवस्था करण्यात आली आहे. बायो बबलसाठी कडक नियमावली सक्तीने लागू करण्यात आली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना बायो बबल (जैव सुरक्षित) वातावरणामध्ये राहावे लागणार आहे. अशा परिस्थितीत खेळाडूंचा संपूर्ण स्पर्धेदरम्यान बाहेरील जगाशी संपर्क राहणार नाही. यामध्ये कुठल्याही प्रकारची कुचराई खेळाडूंनी करून चालणार नाही, जर खेळाडूंनी कोणत्याही कारणास्तव बायो बबलचे नियम मोडले, तर मात्र त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून यंदाच्या आयपीएलमध्ये खेळाडूंचे जग हे हॉटेल, सरावाचे मैदान आणि आयपीएल लढती एवढ्यापुरतेच मर्यादित राहणार आहे. तसेच आयपीएलचे सामनेही रिकाम्या स्टेडियममध्ये घेण्यात येत आहेत.

दरम्यान, आयपीएल 2020 पूर्वी वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या कसोटी मालिकेमध्ये खेळाडूंसाठी बायो बबल व्यवस्था लागू करण्यात आली होती. मार्च महिन्यात संपूर्ण जागभरात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनला सुरुवात झाली. त्यानंतर इंग्लंडमध्ये वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेच्या माध्यमातून पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले गेले होते. त्यावेळी बायो सिक्योर फॉर्म्युला लागू करण्यात आला होता. यालाच बायो बबल व्यवस्था म्हणतात.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vaibhav Sooryavanshi India Debut : रोहित-विराटसोबत वैभव सूर्यवंशी टीम इंडियामध्ये कधी खेळताना दिसणार?; BCCI ने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, काय म्हणाली?
रोहित-विराटसोबत वैभव सूर्यवंशी टीम इंडियामध्ये कधी खेळताना दिसणार?; BCCI ने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, काय म्हणाली?
Virat Kohli-Shubman Gill : शुभमन गिलचा IPL फायनलमधील वादग्रस्त कॅच, विराट कोहलीही रागाने लाले लाल; शेवटी थर्ड अंपायरने केली मध्यस्थी
शुभमन गिलचा IPL फायनलमधील वादग्रस्त कॅच, विराट कोहलीही रागाने लाले लाल; शेवटी थर्ड अंपायरने केली मध्यस्थी
Rajat Patidar Profile : वडिलांचा विरोध, गुडघ्याची सर्जरी अन् ऑक्शनमध्ये अपमान...; आता त्याच रजत पाटीदारने लिहिला आयपीएलचा सर्वात मोठा इतिहास
वडिलांचा विरोध, गुडघ्याची सर्जरी अन् ऑक्शनमध्ये अपमान...; आता त्याच रजत पाटीदारने लिहिला आयपीएलचा सर्वात मोठा इतिहास
RCB vs GT IPL 2026 Ashish Nehra: आरसीबीने पहिल्या 15 चेंडूत धडाधड धावा ठोकल्या; आशिष नेहरा मैदानात काय करत बसला?, बंगळुरुच्या विजयापेक्षा सगळीकडे त्याचीच चर्चा!
आरसीबीने पहिल्या 15 चेंडूत धडाधड धावा ठोकल्या; आशिष नेहरा मैदानात काय करत बसला?, बंगळुरुच्या विजयापेक्षा सगळीकडे त्याचीच चर्चा!

व्हिडीओ

Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha
Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Pune Vidhan Parishad : काकडेंच्या एन्ट्रीने टिंगरेंना धक्का? NCP तील नाराजीनाट्य | Special Report
Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
K Annamalai: तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईं पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईं पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Gokul Kolhapur: 'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
Iran War Live: तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
Embed widget