एक्स्प्लोर

बांगलादेशच्या नांग्या ठेचा आणि विजयाची गुढी उभारा!

मैदानात आणि मैदानाबाहेरही अखिलाडूपणाचा कहर म्हणजे बांगलादेश... असं चित्र वारंवार दिसून आलं आहे. त्यामुळं अंतिम सामन्यात बांगलादेशवरचा विजय पुरेसा ठरणार नाही, तर या मैदानात त्या बांगलादेशच्या नांग्याच ठेचायला हव्यात.

मुंबई : कोलंबोतल्या तिरंगी मालिकेत रोहित शर्माच्या टीम इंडियाचा अंतिम सामना उद्या (रविवार) शकिब अल हसनच्या बांगलादेशशी होईल. या सामन्यात विजयाची गुढी उभारुन, विजेतेपदावर नाव कोरण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न राहिल. पण बांगलादेशी खेळाडू आणि त्यांच्या पाठिराख्यांचा वाढता अखिलाडूपणा लक्षात घेतला, तर भारतीय क्रिकेटरसिक केवळ विजेतेपदावर समाधान मानणार नाहीत. तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात बांगलादेशच्या नांग्या ठेचूनच, कोलंबोच्या रणांगणात विजयाची गुढी उभारा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात आजवर रॉयल बांगला टायगर्स अशीच बांगलादेशच्या फौजेची ओळख होती. पण कोलंबोतल्या तिरंगी मालिकेच्या निमित्तानं बांगलादेशी वाघांना किंग कोब्रासारखा फणा काढताना पुन्हा पुन्हा पाहायला मिळालं. बांगलादेशी खेळाडूंच्या कोब्रा सेलिब्रेशनची सुरुवात खरं तर श्रीलंकेच्या बांगलादेश दौऱ्यात झाली होती. पण कोलंबोतल्या तिरंगी मालिकेत श्रीलंकेला बांगलादेशकडून दुसऱ्यांदा पराभवाचा डंख बसला आणि कोब्रा डान्सनं सेलिब्रेशनचं टोक गाठलं. श्रीलंका आणि बांगलादेश संघांमधल्या त्या अखेरच्या साखळी सामन्यात खेळाचे, वादाचे आणि अखिलाडू वृत्तीचेही अनेक रंग पाहायला मिळाले. पण त्या सामन्यात मिळालेल्या चुरशीच्या विजयानं बांगलादेशी वाघांच्या आत्मविश्वासाला नवी धार चढली आहे. साहजिकच कोलंबोच्या रणांगणात भारत आणि बांगलादेश संघांत होणारा तिरंगी मालिकेचा अंतिम सामना हा वन डे क्रिकेटची असली मजा देणारा ठरेल. कोलंबोतल्या या मालिकेत भारतानं चारपैकी तीन सामन्यांमध्ये विजय मिळवून फायनलचं तिकीट कन्फर्म केलं. बांगलादेशला तर भारताकडून दोन्ही साखळी सामन्यांमध्ये हार स्वीकारावी लागली आहे. पण श्रीलंकेवरच्या दोन्ही विजयांनी त्यांचा आत्मविश्वास ढासळू दिलेला नाही. त्यामुळंच फायनलच्या मैदानात टीम इंडियाला बांगलादेशच्या आव्हानाला कमी लेखता येणार नाही. कोलंबोतल्या तिरंगी मालिकेत बांगलादेशची फलंदाजी ही प्रामुख्यानं मुशफिकूर रहिम आणि तमिम इक्बाल या दोघांवर अवलंबून असलेली दिसली. मुशफिकूरनं चार सामन्यांमध्ये ९५च्या सरासरीनं १९० धावांचा रतीब घातला आहे. त्याची नाबाद ७२ ही सर्वोत्तम खेळी ठरली आहे. तमिम इक्बालनं चार सामन्यांमध्ये ३४.७५च्या सरासरीनं १३९ धावा केल्या आहेत. मुस्तफिजूर रहमान आणि रुबेल हुसेनच्या दुधारी आक्रमणानं तिरंगी मालिकेत बांगलादेशचं आव्हान तोलून धरलं आहे. मुस्तफिजूरनं चार सामन्यांमध्ये १५६ धावा मोजून सहा फलंदाजांना माघारी धाडलं आहे, तर रुबेलनं चार सामन्यांमध्ये १३७ धावांत चार विकेट्स काढल्या आहेत. बीसीसीआयनं कोलंबोतल्या तिरंगी मालिकेसाठी विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यासारख्या अनुभवी शिलेदारांना विश्रांती दिली होती. त्या दोघांच्या अनुपस्थितीत शिखऱ धवन, रोहित शर्मा, मनीष पांडे आणि सुरेश रैना यांनी टीम इंडियाला धावांची रसद पुरवली. शिखर धवननं सातत्य कायम राखून, चार सामन्यांमध्ये ४७च्या सरासरीनं १८८ धावांचा रतीब घातला. त्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. कर्णधार रोहित शर्मा पहिल्या तीन सामन्यांमध्ये अपयशी ठरला. पण बांगलादेशविरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यात, त्यानं कर्णधाराला साजेशी खेळी उभारली आणि टीम इंडियाला फायनलचं तिकीटही मिळवून दिलं. रोहितनं चार सामन्यांमध्ये एका अर्धशतकासह ११७ धावा फटकावल्या आहेत. मनीष पांडेनं चार सामन्यांमध्ये १०६च्या सरासरीनं १०६ धावा केल्या आहेत. तसंच सुरेश रैनानं चार सामन्यांमध्ये २५.७५च्या सरासरीनं १०३ धावा केल्या आहेत. तिरंगी मालिकेतल्या भारताच्या यशात फलंदाजांइतकंच गोलंदाजांचही योगदान तितकंच मोलाचं आहे. सलामीच्या सामन्याचा अपवाद वगळता भारतीय गोलंदाजांनी उर्वरित मालिकेवर वर्चस्व गाजवलं. ऑफ स्पिनर वॉशिंग्टन सुंदरनं चार सामन्यांमध्ये केवळ ९४ धावा मोजून सात फलंदाजांना माघारी धाडलं आहे. शार्दूल ठाकूरनं चार सामन्यांमध्ये १३१ धावा मोजून सहा विकेट्स घेतल्या आहेत. लेग स्पिनर यजुवेंद्र चहलनं चार सामन्यांमध्ये १११ धावांच्या मोबदल्यात पाच विकेट्स घेतल्या आहेत. डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटनंही तीन सामन्यांमध्ये १०६ धावा मोजून पाच विकेट्स घेतल्या आहेत. एकंदरीत काय, तर बांगलादेशी वाघांच्या तुलनेत भारतीय सिंहांनी बजावलेली वैयक्तिक आणि सांघिक कामगिरी अधिक सरस आहे. त्यामुळं तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात विजयाची गुढी उभारुन रोहित शर्मा आणि त्याची टीम इंडिया निदाहास करंडकावर आपलं नाव कोरेल असा विश्वास आहे. पण भारताविरुद्धच्या सामन्याच्या निमित्तानं अलीकडच्या काळात, मैदानात आणि मैदानाबाहेरही अखिलाडूपणाचा कहर म्हणजे बांगलादेश असं चित्र वारंवार दिसून आलं आहे. त्यामुळं तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात बांगलादेशवरचा विजय पुरेसा ठरणार नाही, तर या मैदानात त्या बांगलादेशच्या नांग्याच ठेचायला हव्यात.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Alyssa Healy Aus vs Ind 3rd ODI : फेयरवेल वनडेत एलिसा हिलीचा 'रुद्र अवतार'; 27 चौकार, 2 षटकार अन् टीम इंडियाचा धुव्वा, ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय
फेयरवेल वनडेत एलिसा हिलीचा 'रुद्र अवतार'; 27 चौकार, 2 षटकार अन् टीम इंडियाचा धुव्वा, ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय
Israel Vs Iran War : इस्रायल-अमेरिका विरुद्ध इराण युद्ध पेटले! इंग्लंड-पाकिस्तान सामना रद्द, हॉटेलमध्येच थांबले संघ
इस्रायल-अमेरिका विरुद्ध इराण युद्ध पेटले! इंग्लंड-पाकिस्तान सामना रद्द, हॉटेलमध्येच थांबले संघ
IND vs WI Live Update : एकच तिकीट, दोन दावेदार! ‘क्वार्टर फायनल’मध्ये भारत-वेस्ट इंडिजमध्ये आरपारची लढत, जाणून घ्या अपडेट्स LIVE
एकच तिकीट, दोन दावेदार! ‘क्वार्टर फायनल’मध्ये भारत-वेस्ट इंडिजमध्ये आरपारची लढत, जाणून घ्या अपडेट्स LIVE
Sri Lanka Cricket News : पराभव जिव्हारी! पाकिस्तानाने जखम दिली अन् जयसूर्याने ती थेट मनाला लावून घेतली; हेड कोचचा 'गेम ओव्हर'
पराभव जिव्हारी! पाकिस्तानाने जखम दिली अन् जयसूर्याने ती थेट मनाला लावून घेतली; हेड कोचचा 'गेम ओव्हर'

व्हिडीओ

Tejas Express Delay : तेजस एक्सप्रेस ७ तास उशिराने, शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासीयांचे हाल
Iran red flag : खामेनींच्या मृत्यूचा बदला, इराणच्या कोम शहरातील मशिदीवर लाल झेंडा
Ayatollah Ali Khamenei Death : इराण इस्लामिक क्रांतीचे नेते अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा
Gadchiroli Old Lady Death Special Report बँकेच्या ढिसाळ कारभारानं महिलेचा जीव गेला,कुटुंबीयांचा आरोप
Israel US attack Iran Special Report : अमेरिका-इराण संघर्षाचा जगावर काय परिणाम?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इस्त्रायल अमेरिकेनं सर्वोच्च धर्मगुरु खोमेनींना टार्गेट केलं असताना इराणने पहिल्यांदा 'सेफ हेवन' दुबई, अबुधाबी, कतारला भाजून का काढलं? बुर्ज खलिफा रिकामा करावा लागला, विमानतळ सुद्धा बंद!
इस्त्रायल अमेरिकेनं सर्वोच्च धर्मगुरु खोमेनींना टार्गेट केलं असताना इराणने पहिल्यांदा 'सेफ हेवन' दुबई, अबुधाबी, कतारला भाजून का काढलं? बुर्ज खलिफा रिकामा करावा लागला, विमानतळ सुद्धा बंद!
Israel Vs Iran War: अमेरिका–इस्रायलच्या इराणवरील हल्ल्याचा परिणाम, जागतिक पातळीवर 'या' 10 गोष्टी बदलणार, भारतावर काय परिणाम होणार?
अमेरिका–इस्रायलच्या इराणवरील हल्ल्याचा परिणाम, जागतिक पातळीवर 'या' 10 गोष्टी बदलणार, भारतावर काय परिणाम होणार?
जगातील पहिली दोन हजार महिलांची सैन्याची फलटण उभारणाऱ्य वीर राणी बेळवडी मल्लम्मा उत्सवाला प्रारंभ
जगातील पहिली दोन हजार महिलांची सैन्याची फलटण उभारणाऱ्य वीर राणी बेळवडी मल्लम्मा उत्सवाला प्रारंभ
Gold Silver Price Today: इराण- इस्त्रायल युद्धाचा भडका, सोन्या-चांदीचा भाव कडाडला! सोन्याच्या दरात 11 हजारांची वाढ, तर चांदी तीन लाखांच्या पार
इराण- इस्त्रायल युद्धाचा भडका, सोन्या-चांदीचा भाव कडाडला! सोन्याच्या दरात 11 हजारांची वाढ, तर चांदी तीन लाखांच्या पार
बाॅलिवुड कलाकार, खेळाडू अन् सेलिब्रेटींचं दुसरं घर झालेल्या दुबईमध्ये भारतीयांचा पुरता थरकाप! बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू म्हणाली,
बाॅलिवुड कलाकार, खेळाडू अन् सेलिब्रेटींचं दुसरं घर झालेल्या दुबईमध्ये भारतीयांचा पुरता थरकाप! बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू म्हणाली, "आम्ही दुबईमध्ये राहत होतो तिथं स्फोट झाला"
Ayatollah Ali Khamenei: 'आम्ही आमच्या प्रिय नेत्याच्या हौतात्म्यासह चार शक्यता गृहित धरल्या होत्या' खामेंनीचा मृत्यूनंतरही इराणचा कडवा प्रतिकार; तेल अवीव दुबई ते कुवेतपर्यंत तब्बल 27 ठिकाणांवर हल्ला
'आम्ही आमच्या प्रिय नेत्याच्या हौतात्म्यासह चार शक्यता गृहित धरल्या होत्या' खामेंनीचा मृत्यूनंतरही इराणचा कडवा प्रतिकार; तेल अवीव दुबई ते कुवेतपर्यंत तब्बल 27 ठिकाणांवर हल्ला
Mojtaba Khamenei: वारसदार निवडण्यापूर्वीच अयातुल्लाह खामेनींचा लष्करी कारवाईत अंत झाल्याने इराण गंभीर वळणावर; खामेनींच्या निधनाने उत्तराधिकाराचा पेच अन् मुलासह पाच नावे आघाडीवर
वारसदार निवडण्यापूर्वीच अयातुल्लाह खामेनींचा लष्करी कारवाईत अंत झाल्याने इराण गंभीर वळणावर; खामेनींच्या निधनाने उत्तराधिकाराचा पेच अन् मुलासह पाच नावे आघाडीवर
Ayatollah Ali Khamenei: वयाच्या 11व्या वर्षी मौलवी, अमेरिकेचे तब्बल सात राष्ट्राध्यक्ष आणि इस्त्रायलच्या टार्गेटवर; झुंजले, झुंजवलं, पण अखेर सर्वोच्च धर्मुगुरु कुटुंबासह सापडले
अयातुल्ला अली खामेनी : वयाच्या 11व्या वर्षी मौलवी, अमेरिकेचे तब्बल सात राष्ट्राध्यक्ष आणि इस्त्रायलच्या टार्गेटवर; झुंजले, झुंजवलं, पण अखेर सर्वोच्च धर्मुगुरु कुटुंबासह सापडले
Embed widget