एक्स्प्लोर

पंतप्रधान मोदींचा आज मुंबई दौरा, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सत्राचं उद्घाटन, 40 वर्षांनी भारताकडे यजमानपद

भारत 40 वर्षांनंतर IOC सत्राचे यजमानपद भूषवणार आहे, PM मोदी 14 ऑक्टोबर रोजी मुंबईत अधिवेशनाचे उद्घाटन करतील.

PM Modi Mumbai Visit Today : मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज संध्याकाळी मुंबई (Mumbai News) दौऱ्यावर येतायत. संध्याकाळी 5 वाजता मोदींचं मुंबई विमानतळावर आगमन होईल. तिथून ते बीकेसीमधील जिओ वर्ल्डच्या कार्यक्रमाला जातील आणि हा कार्यक्रम आटोपल्यावर नरेंद्र मोदी पुन्हा नवी दिल्लीला रवाना होतील. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचं (International Olympic Committee) अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनाच्या उद्घाटनाला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत. 

मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये 141 व्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) च्या अधिवेशनाचं उद्घाटन करणार आहेत. आजपासून सुरू होणाऱ्या या अधिवेशनात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) च्या सदस्यांची प्रमुख बैठक पार पडणार आहे. ऑलिम्पिक खेळांच्या भविष्याबाबत महत्त्वाचे निर्णय आयओसी अधिवेशनामध्ये घेतले जातात. 

आशियाई स्पर्धांनंतर IOC सत्राबाबत उत्सुकता 

भारत दुसऱ्यांदा आणि सुमारे 40 वर्षांच्या कालावधीनंतर IOC सत्राचं आयोजन करत आहे. IOC चे 86 वं अधिवेशन यापूर्वी 1983 मध्ये नवी दिल्ली येथे पार पडलं होतं. हँगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर भारतीय क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांमध्ये आयओसीच्या सत्राबद्दल उत्सुकता असणं स्वाभाविक आहे.

क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश 

यंदाचं 141 वं IOC चं अधिवेशन भारतात आयोजित केलं जात आहे. जागतिक सहकार्याला चालना देण्यासाठी, क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आणि मैत्री, आदर आणि उत्कृष्टतेच्या ऑलिम्पिक आदर्शांना पुढे नेण्यासाठी राष्ट्राच्या समर्पणाचं प्रतीक आहे. या सत्रात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक आणि IOC चे इतर सदस्य, भारतीय ऑलिम्पिक संघटनेसह विविध क्रीडा महासंघांचे प्रमुख भारतीय क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्ती आणि इतर काही प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. 

आयओसी अॅथलीट्स कमिशनचे सदस्य आणि भारताचा आघाडीचा नेमबाज अभिनव बिंद्रा यासंदर्भात म्हणाला की, आयओसी सत्र भारतातील तरुणांना ऑलिम्पिक चळवळ अधिक जवळून समजून घेण्यास मदत करू शकतं. ऑलिम्पिक चळवळ खरोखरंच भारतातील तरुणांना चॅम्पियन बनण्यासाठी प्रेरित करू शकते. तरुण समाजाला नवी दिशा देण्यासाठीही सकारात्मक भूमिका बजावू शकतात. मुंबईतील आयओसी अधिवेशनात ऑलिम्पिकशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातील, ज्यात भविष्यातील ऑलिम्पिक खेळ, खेळांचा समावेश आणि वगळण्याशी संबंधित निर्णयांचा समावेश आहे.

दरम्यान, भारतात होणारं IOC चं 141 वं सत्र जागतिक सहकार्याला चालना देण्यासाठी, खेळातील उत्कृष्टता साजरी करण्यासाठी आणि मैत्री, आदर आणि ऑलिम्पिकच्या आदर्शांना पुढे नेण्यासाठी देशाच्या समर्पणाचं प्रतीक आहे. हे सत्र खेळाशी संबंधित सर्व भागधारकांमध्ये संवाद आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्याची संधी देईल.

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmendra : धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
कोण राज ठाकरे, यहा भैय्या का राज चलता है, परप्रांतीयाचा दारू पिवून धुडगूस, अविनाश जाधवांनाही अश्लिल शिवीगाळ
कोण राज ठाकरे, यहा भैय्या का राज चलता है, परप्रांतीयाचा दारू पिवून धुडगूस, अविनाश जाधवांनाही अश्लिल शिवीगाळ
Dharmendra Passed Away: धर्मेंद्र यांचं 89 व्या वर्षी निधन, हेमा मालिनींसह इशा देओल पांढऱ्या कपड्यात पोहोचल्या स्मशानभूमीत
धर्मेंद्र यांचं 89 व्या वर्षी निधन, हेमा मालिनींसह इशा देओल पांढऱ्या कपड्यात पोहोचल्या स्मशानभूमीत
Narendra Maharaj on Hindu: हिंदूंनो किमान दोन मुलं जन्माला घाला, तरच हिंदू धर्म टिकेल, अन्यथा भारतातील बहुसंख्या हिंदू संपेल: नरेंद्र महाराज
हिंदूंनो किमान दोन मुलं जन्माला घाला, तरच हिंदू धर्म टिकेल, अन्यथा भारतातील बहुसंख्या हिंदू संपेल: नरेंद्र महाराज
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Narendra Maharaj Nanij : तुम्ही दोन आणि तुमचे दोन असले पाहिजेत, तरच हिंदू जगेल आणि टिकेल
Ayodhya Ram Mandir Dhwajarohan : राम मंदिरावर ध्वजारोहण होणार, अयोध्येत जय्यत तयारी, फुलांची सजावट
Gauri Garje Father Crying : श्रीमंतांच्या नादी लागू नका, गौरी गर्जेच्या वडिलांचा स्मशानभूमीत आक्रोश
Palghar News : पालघरच्या परनाळी परिसरात दोन गटात तुंबळ हाणामारी, तीन ते चार जखमी
Dharmendra Passes Away:धर्मेंद्र यांच्या पार्थिवार विले पार्लेच्या स्मशानभूमीत पार पडले अंत्यसंस्कार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmendra : धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
कोण राज ठाकरे, यहा भैय्या का राज चलता है, परप्रांतीयाचा दारू पिवून धुडगूस, अविनाश जाधवांनाही अश्लिल शिवीगाळ
कोण राज ठाकरे, यहा भैय्या का राज चलता है, परप्रांतीयाचा दारू पिवून धुडगूस, अविनाश जाधवांनाही अश्लिल शिवीगाळ
Dharmendra Passed Away: धर्मेंद्र यांचं 89 व्या वर्षी निधन, हेमा मालिनींसह इशा देओल पांढऱ्या कपड्यात पोहोचल्या स्मशानभूमीत
धर्मेंद्र यांचं 89 व्या वर्षी निधन, हेमा मालिनींसह इशा देओल पांढऱ्या कपड्यात पोहोचल्या स्मशानभूमीत
Narendra Maharaj on Hindu: हिंदूंनो किमान दोन मुलं जन्माला घाला, तरच हिंदू धर्म टिकेल, अन्यथा भारतातील बहुसंख्या हिंदू संपेल: नरेंद्र महाराज
हिंदूंनो किमान दोन मुलं जन्माला घाला, तरच हिंदू धर्म टिकेल, अन्यथा भारतातील बहुसंख्या हिंदू संपेल: नरेंद्र महाराज
हेमाचं लग्न जितेंद्रशी ठरताच धर्मेंद जितेंद्रची गर्लफ्रेंड घेऊन हेमाच्या घरात अन् पहिल्या बायकोचा विरोध होताच थेट इस्लाम कबुल केला! खराखुरा फिल्मी ड्रामा नेमका घडला तरी कसा?
हेमाचं लग्न जितेंद्रशी ठरताच धर्मेंद जितेंद्रची गर्लफ्रेंड घेऊन हेमाच्या घरात अन् पहिल्या बायकोचा विरोध होताच थेट इस्लाम कबुल केला! खराखुरा फिल्मी ड्रामा नेमका घडला तरी कसा?
संतापजनक! बीडमध्ये 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, आईवर ग्रामस्थांचा दबाव; अखेर गुन्हा दाखल
संतापजनक! बीडमध्ये 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, आईवर ग्रामस्थांचा दबाव; अखेर गुन्हा दाखल
Indian Economy : भारताची अर्थव्यवस्था 2025-26 मध्ये 6.5 टक्क्यांच्या दरानं वाढणार, कर कपातीमुळं मागणी वाढणार, एस अँड पीची  भविष्यवाणी
भारताची अर्थव्यवस्था 2025-26 मध्ये 6.5 टक्क्यांच्या दरानं वाढणार, एस अँड पीचा अंदाज, सरकारचे तीन निर्णय गेमचेंजर ठरणार
Multibagger Share : 66 रुपयांचा शेअर पाच वर्षात पोहोचला 2301 रुपयांवर,'या' मल्टी बॅगर शेअरनं 1 लाखांचे केले 35 लाख,गुंतवणूकदार मालामाल
66 रुपयांचा शेअर पाच वर्षात पोहोचला 2301 रुपयांवर,'या' मल्टी बॅगर शेअरनं 1 लाखांचे केले 35 लाख
Embed widget