एक्स्प्लोर

कठीण परिस्थितीत इंग्लंडचा संघ आमच्यापेक्षा जास्त धैर्याने खेळला : विराट

विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेने चौथ्या विकेटसाठी रचलेल्या 101 धावांच्या भागिदारीचा अपवाद वगळता, भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या आक्रमणासमोर पुन्हा लोटांगण घातलं.

साऊदम्पटन : इंग्लंडने भारताचा दुसरा डाव 184 धावांत गुंडाळून साऊदम्प्टनच्या चौथ्या कसोटीत 60 धावांनी विजय साजरा केला. या कसोटीत टीम इंडियाने इंग्लंडला दुसऱ्या डावात 271 धावांत रोखलं. त्यामुळे भारतासमोर विजयासाठी 245 धावांचं आव्हान होतं. पण विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेने चौथ्या विकेटसाठी रचलेल्या 101 धावांच्या भागिदारीचा अपवाद वगळता, भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या आक्रमणासमोर पुन्हा लोटांगण घातलं. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने या पराभवाचं कारण वरच्या फळीतील फलंदाजीचं अपयश असल्याचं सांगितलं आहे. सोबतच इंग्लंडच्या खेळाडूंनी भारताच्या तुलनेत कठीण परिस्थितीत जास्त धैर्य दाखवलं, असंही विराट म्हणाला. सामनावीर मोईन अली (71/4) सहीत इतर खेळाडूंच्या गोलंदाजीने भारतावर विजय सोपा केला. सामन्यानंतर विराट बोलत होता. ''इंग्लंडने आमच्यासमोर आव्हान ठेवण्यासाठी चांगली कामगिरी केली. मात्र ज्या पद्धतीची खेळपट्टी होती, ते आमच्यासाठी आव्हानात्मक होतं. ही विजयाची चांगली संधी आहे असं आम्हाला वाटलं होतं, पण आम्हाला अपेक्षित सुरुवात मिळाली नाही,'' असं विराट म्हणाला. भारतीय संघाने दुसऱ्या डावात उपहारापर्यंतच 42 धावांवर तीन विकेट गमावल्या होत्या. मात्र उपहारानंतर भारताची परिस्थिती तीन बाद 123 अशी होती.  यानंतर सात विकेट केवळ 61 धावांमध्ये गेल्या. यजमान संघाने 69.4 षटकांमध्ये भारतीय संघाला 184 धावांमध्ये बाद केलं. ''इंग्लंडच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आणि आमच्यावर दबाव आणला. याचं श्रेय त्यांच्या चांगल्या गोलंदाजीला जातं. तुम्ही मोठी भागीदारी करुनच सामना जिंकू शकता, पण आम्ही कायम दबावात राहिलो,'' अशी कबुली विराट कोहलीने दिली. ''कठीण परिस्थितीमध्ये इंग्लंडचा संघ भारताच्या तुलनेत जास्त धैर्याने खेळला. खालच्या फळीतील योगदान अत्यंत महत्त्वाचं होतं,'' असं विराट म्हणाला. यजमान इंग्लंडने ही कसोटी जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली. मालिकेतील पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना सात सप्टेंबर रोजी लंडनमध्ये खेळवला जाईल. ''अखेरच्या सामन्यात चौथ्या सामन्यातील सकारात्मक गोष्टींचा विचार करावा लागेल. मला नाही वाटत की आम्ही जास्त चुका केल्या. विजयाचं श्रेय इंग्लंडच्या संघाला जातं, कारण, त्यांनी चांगली कामगिरी केली,'' अशी प्रतिक्रिया विराटने दिली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

टीआरपीचा फटका! अवघ्या 8 महिन्यांत प्रेक्षकांची लाडकी मालिका बंद होणार? अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
टीआरपीचा फटका! अवघ्या 8 महिन्यांत प्रेक्षकांची लाडकी मालिका बंद होणार? अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
मोठी बातमी : शिंदेंच्या उमेदवाराविरुद्ध ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, आमदारपुत्राची बिनविरोध निवड
मोठी बातमी : शिंदेंच्या उमेदवाराविरुद्ध ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, आमदारपुत्राची बिनविरोध निवड
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय करण्यासाठी भाजपचे कृपाशंकर सिंह जिद्दीला पेटले; संजय राऊत म्हणाले, भाजपचं ठरलं, मुंबईचा महापौर उपराच! मराठी माणसा…जागा हो!
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय करण्यासाठी भाजपचे कृपाशंकर सिंह जिद्दीला पेटले; संजय राऊत म्हणाले, भाजपचं ठरलं, मुंबईचा महापौर उपराच! मराठी माणसा…जागा हो!
Nanded Crime News: 'लवकर या, मी वाट बघतोय…'; आई वडिलांसाठी भावनिक पोस्ट लिहिली अन् दोन तासातच 20 वर्षीय युवकाने उचललं टोकाचं पाऊल
'लवकर या, मी वाट बघतोय…'; आई वडिलांसाठी भावनिक पोस्ट लिहिली अन् दोन तासातच 20 वर्षीय युवकाने उचललं टोकाचं पाऊल

व्हिडीओ

Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीआरपीचा फटका! अवघ्या 8 महिन्यांत प्रेक्षकांची लाडकी मालिका बंद होणार? अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
टीआरपीचा फटका! अवघ्या 8 महिन्यांत प्रेक्षकांची लाडकी मालिका बंद होणार? अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
मोठी बातमी : शिंदेंच्या उमेदवाराविरुद्ध ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, आमदारपुत्राची बिनविरोध निवड
मोठी बातमी : शिंदेंच्या उमेदवाराविरुद्ध ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, आमदारपुत्राची बिनविरोध निवड
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय करण्यासाठी भाजपचे कृपाशंकर सिंह जिद्दीला पेटले; संजय राऊत म्हणाले, भाजपचं ठरलं, मुंबईचा महापौर उपराच! मराठी माणसा…जागा हो!
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय करण्यासाठी भाजपचे कृपाशंकर सिंह जिद्दीला पेटले; संजय राऊत म्हणाले, भाजपचं ठरलं, मुंबईचा महापौर उपराच! मराठी माणसा…जागा हो!
Nanded Crime News: 'लवकर या, मी वाट बघतोय…'; आई वडिलांसाठी भावनिक पोस्ट लिहिली अन् दोन तासातच 20 वर्षीय युवकाने उचललं टोकाचं पाऊल
'लवकर या, मी वाट बघतोय…'; आई वडिलांसाठी भावनिक पोस्ट लिहिली अन् दोन तासातच 20 वर्षीय युवकाने उचललं टोकाचं पाऊल
'आमच्या शेंबड्या बाब्याला नेता करा आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांनो तुम्ही पाणी भरा' भाजपचे निष्ठावंत संतरंज्या उचलत असतानाच आता राष्ट्रवादीमधील खदखद समोर आली!
'आमच्या शेंबड्या बाब्याला नेता करा आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांनो तुम्ही पाणी भरा' भाजपचे निष्ठावंत संतरंज्या उचलत असतानाच आता राष्ट्रवादीमधील खदखद समोर आली!
Mumbai Rain Update: नववर्षाचं पहिल्याच दिवशी मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग, थंडीत रेनकोट घालण्याची वेळ, मुंबईकरांची उडाली तारांबळ
नववर्षाचं पहिल्याच दिवशी मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग, थंडीत रेनकोट घालण्याची वेळ, मुंबईकरांची उडाली तारांबळ
Jalgaon Municipal Corporation: युतीच्या घोळात एबी फॉर्मचा शेवटपर्यंत खेळखंडोबा; जळगावात स्वाक्षरी नसल्याने भाजपच्या थेट माजी महापौर ठरल्या अपक्ष उमेदवार, तब्बल 135 उमेदवारांचे अर्ज बाद
युतीच्या घोळात एबी फॉर्मचा शेवटपर्यंत खेळखंडोबा; जळगावात स्वाक्षरी नसल्याने भाजपच्या थेट माजी महापौर ठरल्या अपक्ष उमेदवार, तब्बल 135 उमेदवारांचे अर्ज बाद
BMC Election: बी. काॅम पास शिल्पा केळुसकरांनी जाता जाता भाजपचा 'पोपट' केला! एबी फॉर्म दिला नाही, थेट कलर झेरॉक्स जोडली, निवडणूक आयोगाने सुद्धा चक्क ग्राह्य धरली!
बी. काॅम पास शिल्पा केळुसकरांनी जाता जाता भाजपचा 'पोपट' केला! एबी फॉर्म दिला नाही, थेट कलर झेरॉक्स जोडली, निवडणूक आयोगाने सुद्धा चक्क ग्राह्य धरली!
Embed widget