एक्स्प्लोर

WTC Final 2023 : फलंदाज, गोलंदाज की आयपीएल, भारताच्या पराभवाची 5 कारणे

WTC Final 2023 : लंडनच्या ओव्हल मैदानात खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा 209 धावांनी पराभव केला.

WTC Final 2023 : टीम इंडियाला पुन्हा एकदा जागतिक कसोटी विजेतेपदाच्या गदेवर आपलं नाव कोरण्यात अपयश आलं. लंडनच्या ओव्हल मैदानात खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा 209 धावांनी पराभव केला. या पराभवानंतर टीम इंडियाच्या कामगिरीवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. त्याशिवाय टीम इंडियाच्या पराभवाची कारणे, चाचपण्यास सुरुवात केली. भारतीय संघाच्या पराभवाची पाच कारणे, खाली दिली आहेत...

पहिल्या डावात गोलंदाजांची निराशाजनक कामगिरी - 

भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या तासभरात हा निर्णय योग्य होता असे वाटत होते. पण त्यानंतर गोलंदाजांनी प्रभावहिन मारा केला. ट्रेविस हेड आणि स्मिथपुढे टीम इंडियाची गोलंदाजी दुबळी जाणवत होती. 76 धावांत ऑस्ट्रेलियाने तीन पलंदाज गमावले होते, अशा परिस्थितीत गोलंदाजांनी वर्चस्व निर्माण केले नाही. प्रभावहिन मारा केल्यामुळे ऑस्ट्रेलियाने 469 धावांचा डोंगर उभारला. स्मिथ आणि हेड यांनी 251 धावांची भागिदारी करत  ऑस्ट्रेलियाला मजबूत स्थितीत नेले. यावेळी टीम इंडियाच्या गोलंदाजांना विकेट घेण्यात अपयश आले. स्मिथ आणि हेड यांनी भारतीय गोलंदाजीचा समाचार घेतला, हाच सामन्यातील सर्वात मोठा फरक होय. 

फलंदाजांची हराकिरी - 

469 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव 296 धावांवर आटोपला. शार्दुल आणि रहाणे यांच्या शतकी भागिदारीमुळे फॉलोऑन टळला. आघाडीच्या फलंदाजांना लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. गिल, रोहित, पुजारा, विराट आणि भरत यांना मोठी खेळी करता आली नाही. शार्दूल आणि रहाणे यांनी 50 धावांचा पल्ला ओलांडला.. रविंद्र जाडेजा याने जम बसल्यानंतर विकेट फेकली. टीम इंडियाचा डाव 296 धावांवर आटोपला... त्यामुळे भारतीय संघ 173 धावांनी पिछाडीवर राहिला.. मानसिकदृष्ट्या हा मोठा फरक होता. 
 
अश्विन प्लेईंग 11 बाहेर, मोठी चूक होती ?

आर. अश्विन याला प्लेईंग 11 मध्ये न खेळवणे ही रोहित शर्माची मोठी चूक होती, असे अनेक दिग्गजांना वाटले. रोहित शर्माच्या यानिर्णायावर अनेकांनी सवाल उपस्थित केले. आर. अश्विन जगातील आघाडीचा गोलंदाज आहे, असे असताना त्याला बाहेर बसवणे, मोठी चूक होती. ऑस्ट्रेलियाच्या लायन याने सामन्यात 5 विकेट घेतल्या. रविंद्र जाडेजा यानेही प्रभावी मारा केला... यांची आकडेवारी पाहाता, आर. अश्विन यानेही प्रभावी मारा केला असता. त्याशिवाय फलंदाजीतही योगदान दिले असते...  असे म्हटले जातेय. त्यामुळे अश्विनला बाहेर बसवणे चूक होती का?  उमेश यादव याच्या जागी अश्विनला संधी दिली असती तर... असा एक मतप्रवाह तयार झालाय. 

फलंदाजांनी तीच चुक दुसऱ्या डावात केली -
 
टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप विजयासाठी 444 धावांचे आव्हान मिळाले होते... रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियातील फलंदाजांनी विकेट फेकल्या. एकही फलंदाज प्रतिकार करताना दिसला नाही. रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रविंद्र जाडेजा आणि विराट कोहली या अनुभवी पाच फलंदाजांनी आपली विकेट सहज फेकली. पुजारा, रोहित आणि विराट यांनी जम बसल्यानंतर विकेट फेकली, परिणामी भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. 

IPL -

कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अतिंम सामन्यात भारताच्या पराभवाचे आयपीएल हे एक कारण असल्याचे म्हटले जातेय. आयपीएल 29 मे 2023 रोजी संपले.. WTC ला 7 जून 2023 पासून सुरुवात झाली. भारतीय खेळाडू आयपीएलमध्ये व्यस्त होते... त्यामुळे कसोटी चॅम्पियनशीपची तयारी करण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही. मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जाडेजा यांच्यासह अनेक खेळाडूंना आराम करण्यास पुरेस वेळ मिळाला नाही. 

आणखी वाचा :
 

महत्त्वाच्या बातम्या

ENG vs PAK :  इंग्लंडनं पाकिस्तानचा धुव्वा उडवला, पाकचा पहिल्या कसोटीत एक डाव आणि 103 धावांनी पराभव, लीडसवर पाकचा पुन्हा पराभव
इंग्लंडकडून पाकिस्तानचा धुव्वा, पहिल्या कसोटीत 103 धावा आणि डावानं विजय, 8 वर्षानंतर पाकचा पुन्हा तसाच पराभव
WTC Final: टीम इंडियाला 8 पैकी 5 कसोटी सामन्यात विजय मिळवताच WTC फायनलचं दार उघण्याची संधी, एका गोष्टीमुळं घात होण्याची शक्यता
भारताकडे WTC फायनलमध्ये पोहोचण्याची संधी पण एका गोष्टीमुळं घात होण्याची शक्यता, जाणून घ्या
ODI Cricket Record : वनडे क्रिकेटमध्ये 'झिरो'वर आऊट न झालेले दिग्गज खेळाडू; लिस्टमध्ये भारतीय स्टारचाही समावेश!
वनडे क्रिकेटमध्ये 'झिरो'वर आऊट न झालेले दिग्गज खेळाडू; लिस्टमध्ये भारतीय स्टारचाही समावेश!
Team India WTC Scenarios Marathi News: WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget