एक्स्प्लोर

WTC Final 2023 : टीम इंडियाच्या पराभवास IPL जबाबदार? सिराज-शमी सारख्या खेळाडूंना आरामच नाही

WTC फायनलमध्ये सलग दुसऱ्यांदा जाऊन टीम इंडियाच्या पदरी निराशाच पडली.

India vs Australia, WTC Final 2023 : जागतिक कसोटी विजेतेपदाच्या गदेवर आपलं नाव कोरण्यात भारतीय संघाला पुन्हा एकदा अपयश आलं. लंडनच्या ओव्हल मैदानात खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा 209 धावांनी दारुण पराभव केला. WTC फायनलमध्ये सलग दुसऱ्यांदा जाऊन टीम इंडियाच्या पदरी निराशाच पडली. भारतीय संघाच्या पराभवाचं प्रमुख कारण, तयारी सांगितले जातेय. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलसाठी टीम इंडियाने पूर्ण तयारी केली होती का? आयपीएलमध्ये जास्त वेळ दिल्यामुळे हा पराभव ओढावलाय का? आयपीएलमुळे अनुभवी खेळाडूंना आराम मिळाला का ? यासारखे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा समारोप 29 मे रोजी झाला.. त्यानंतर काही खेळाडू लंडनमध्ये दाखल झाले. रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी, शुभमन गिल हे खेळाडू लंडनमध्ये फक्त आठवडाभर आधी दाखल झाले. त्याशिवाय इतर खेळाडूही दहा दिवस आधी इंग्लंडमध्ये दाखल झाले होते. मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी या आघाडीच्या दोन गोलंदाजांना आयपीएलमुळे आराम मिळाला नाही. या दोघांनी आयपीएलमध्ये जास्त गोलंदाजी केली होती. शमी याने 17 सामन्यात 65 षटके गोलंदाजी केली तर सिराजने 14 सामन्यात 50 षटके गोलंदाजी केली. रविंद्र जाडेजा याने 57 षटके गोलंदाजी केली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलआधी खेळाडूंना आराम मिळाला नाही.. त्याशिवाय तयारीला वेळही तितकासा मिळाल्याचे दिसत नाही. टी20 मध्ये आणि कसोटीमध्ये गोलंदाजीचा टप्पा वेगळा असतो, अशात टी20 नंतर कसोटी खेळताना गोलंदाजांना पूर्ण तयारी करावी लागते. शार्दूल ठाकूर आणि उमेश यादव यांनाही तितका आराम मिळाला नाही. सिराज आणि शमी यांच्यासह इतर खेळाडूंना महत्वाच्या सामन्यापूर्वी तयारीला आणि आराम करायला पुरेसा वेळ मिळाला नाही. याचा परिणाम त्यांच्या गोलंदाजीवरही दिसत होता. मोहम्मद शमी याने संपूर्ण सामन्यात फक्त 45 षटके गोलंदाजी केली.. तर सिराजने 48 षटकांचा मारा केला. 

सिराजचा प्रभावी मारा - 

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत मोहम्मद शमी याने आपल्या गोलंदाजीने प्रभावित केले. पण आराम मिळाला असता तर सिराज आणखी प्रभावी ठरला असता. सिरजाने पहिल्या डावात महत्वाचे चार बळी घेतले होते. शमी याबाबत पिछाडीवर दिसला... शमीला संपूर्ण सामन्यात फक्त चार विकेट घेता आल्या. त्याशिवाय उमेश यादव याचाही मारा प्रभावहीन जाणवला. 

भारताचा 209 धावांनी पराभव -

टीम इंडियाला पुन्हा एकदा जागतिक कसोटी विजेतेपदाच्या गदेवर आपलं नाव कोरण्यात अपयश आलं. लंडनच्या ओव्हल मैदानात खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा 209 धावांनी पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाला विजयासाठी 444 धावांचं आव्हान दिलं होतं. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेनं चौथ्या विकेटसाठी रचलेल्या 86 धावांच्या भागिदारीनं भारताच्या आव्हानात धुगधुगी कायम राखली होती. पण स्कॉट बोलँडनं विराट कोहली आणि रवींद्र जाडेजाला लागोपाठच्या चेंडूंवर माघारी धाडून टीम इंडियाची पाच बाद 179 अशी बिकट अवस्था केली. मग मिचेल स्टार्कनं अजिंक्य रहाणेला माघारी धाडलं. त्या तीन धक्क्यांमधून न सावरलेला भारताचा डाव 234 धावांवर आटोपला. आणि ऑस्ट्रेलियानं जागतिक कसोटी विजेतेपदाच्या गदेवर आपलं नाव कोरलं.
 
आणखी वाचा :
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Afg ODI Series: रोहित-हार्दिक OUT...?; अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेआधी टीम इंडियाला धक्का, BCCI दिला अल्टीमेटम
रोहित-हार्दिक OUT...?; अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेआधी टीम इंडियाला धक्का, BCCI दिला अल्टीमेटम
IND vs AFG Test Series: पडिक्कल OUT, केएल, ऋषभ, कुलदीप IN...; अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
पडिक्कल OUT, केएल, ऋषभ, कुलदीप IN...; अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Sairaj Bahutule Team India New Spin Coach: टीम इंडियात मराठमोळ्या कोचची एन्ट्री; गौतम गंभीरसोबत करणार काम, BCCI ची घोषणा
टीम इंडियात मराठमोळ्या कोचची एन्ट्री; गौतम गंभीरसोबत करणार काम, BCCI ची घोषणा
IND vs AFG One-off Test : अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीआधी टीम इंडियात सर्वात मोठा ट्विस्ट! 60 विकेट्स घेणारा आकिब नबीची एन्ट्री, पण...
अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीआधी टीम इंडियात सर्वात मोठा ट्विस्ट! 60 विकेट्स घेणारा आकिब नबीची एन्ट्री, पण...

व्हिडीओ

Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?
Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report
Vidhan Parishad Election Special Report : विधान परिषदेच्या रिंगणात बंडखोरांमुळे रंगत : ABP Majha
Ladki Bahin Yojana Special Report:81 लाख महिला अपात्र;विरोधकांची अदिती तटकरेंच्या राजीनाम्याची मागणी
Girish Mahajan Jalgaon : राऊत, वडेट्टीवार बोल बच्चन नेते, त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime news: कोल्हापूर हादरलं! महाविद्यालयीन तरुणीवर प्रियकरासह चौघांचा अत्याचार, अश्लील व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग
कोल्हापूर हादरलं! महाविद्यालयीन तरुणीसोबत प्रियकरासह चार जणांचं नको ते कृत्य, अश्लील व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग
अनिकेत तटकरेंचा मार्ग होणार सोपा, कोकणातील शिवसेनेचं बंड होणार थंड, जुईली दळवी घेणार माघार, सुत्रांची माहिती
अनिकेत तटकरेंचा मार्ग होणार सोपा, कोकणातील शिवसेनेचं बंड होणार थंड, जुईली दळवी घेणार माघार, सुत्रांची माहिती
Farmers Loan Waiver Maharashtra: शेतकरी कर्जमाफीसाठी कोणकोणते पदाधिकारी अपात्र, 25 हजारापेक्षा जास्त पगार असणाऱ्यांनाही लाभ नाही, वाचा निकषांची ए टू झेड माहिती
शेतकरी कर्जमाफीसाठी कोणकोण अपात्र ठरणार? 25 हजारापेक्षा जास्त पगार असणाऱ्यांनाही लाभ नाही, वाचा निकषांची ए टू झेड माहिती
Solapur : सोलापुरात उमेदवाराचा भयंकर कारनामा; 10 पैकी 5 सूचकांच्या बोगस सह्या, विधान परिषदेचा अर्ज बाद; फौजदारी गुन्हा दाखल होणार?
सोलापुरात उमेदवाराचा भयंकर कारनामा; 10 पैकी 5 सूचकांच्या बोगस सह्या, विधान परिषदेचा अर्ज बाद; फौजदारी गुन्हा दाखल होणार?
Surat Bardoli Bus Accident : जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात
जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात
काँग्रेसमुळे भाजपची डोकेदुखी संपली; विधानपरिषदेसाठी बंडखोर विप्लव बाजोरियांचा उमेदवारी अर्ज बाद
काँग्रेसमुळे भाजपची डोकेदुखी संपली; विधानपरिषदेसाठी बंडखोर विप्लव बाजोरियांचा उमेदवारी अर्ज बाद
महामंडळाच्या दोन बसची गुजरातमध्ये धडक; 7 जणांचा मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारी घटना, भयानक फोटो
महामंडळाच्या दोन बसची गुजरातमध्ये धडक; 7 जणांचा मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारी घटना, भयानक फोटो
Maharashtra Live blog updates: मुंबईच्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी, पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरुवात
Maharashtra Live blog updates: मुंबईच्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी, पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरुवात
Embed widget