एक्स्प्लोर

India Vs Pakistan: विश्वचषकात भारताला एकदाही हरवू शकला नाही पाकिस्तान, 'या' सामन्यांची आजही चर्चा

India Vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचा सामान म्हणजे चाहत्यांसाठी युद्ध असते. हा सामना जर विश्वचषकातील असेल तर त्याला महासंग्रामाचे रुप धारण होते

India Vs Pakistan: टी-20 विश्वचषकाला (T20 World Cup 2021) सुरुवात झाली असून भारत आणि पाकिस्तान या महामुकाबल्याचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. येत्या रविवारी (24 ऑक्टोबर) भारतीय संघ पाकिस्तानशी भिडणार आहे. मात्र, त्याआधी या सामन्याची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा आणि उत्सुकता दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचा सामान म्हणजे चाहत्यांसाठी युद्ध असते. हा सामना जर विश्वचषकातील असेल तर त्याला महासंग्रामाचे रुप धारण होते. दरम्यान, विश्वचषकात भारत पाकिस्तानविरुद्ध  एकदाही पराभूत झालेला नाही.

विश्वचषकात भारताने पाकिस्तानाविरुद्ध एकही सामना गमावलेला नाही. भारतीय संघाचे कर्णधारपद सध्या विराट कोहलीकडे आहे. हा विक्रम कायम ठेवण्याचा विराट कोहलीचा प्रयत्न असेल. त्यामुळे या सामन्यात नेमके काय होते? याकडे सर्वांचे डोळे लागलेले असतील. 

पाकिस्तानात कोहलीपेक्षा 'या' भारतीय खेळाडूला जास्त पसंती, शोएब अख्तरचा खुलासा

एकदिवसीय विश्वचषक 1992 ग्रुप स्टेज मॅच, सिडनी

भारत आणि पाकिस्तान पहिल्यांदा 1992 मध्ये एकमेकांच्या समोर आले होते. या सामन्यात प्रथम नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली होती. त्यावेळी भारतीय संघाने सात विकेट्स गमावून 216 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला पाकिस्तानच्या संघाने भारताच्या गोलंदाजीपुढे गुडघे टेकले. या सामन्यात भारताने पाकिस्तानला 173 धावांवर ऑलआऊट करून 43 धावांनी विजय मिळवला होता. मोहम्मद अजहरुद्दीनच्या नेतृत्वात हा सामना खेळण्यात आला होता. 

टी-20 विश्वचषक 2007  ग्रुप स्टेज मॅच, डरबन

पहिल्या टी-20 विश्वचषकात ग्रुपस्टेजमध्ये आमने-सामने आले होते. त्यावेळी हा सामना टाय झाला होता. या सामन्यात सुपर ओव्हर पाहायला मिळाली. ज्यात भारतीय संघाने 3-0 बॉल आऊट करून हा सामना जिंकला होता. या सामन्यात भारताकडून रॉबिन उथप्पा (50), महेंद्रसिंह धोनी (33) आणि इरफान पठाण (20) यांच्या खेळीच्या जोरावर संघाने सन्मानजनक स्कोर केला होता. 

एकदिवसीय विश्वचषक 1996 क्वार्टर फायनल मॅच, बंगळरू

भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1996मध्ये क्वार्टर फायनल सामना खेळण्यात आला होता. हा सामना अतिशय रोमांचक होता. हाय व्होल्टेज सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. या सामन्यात नवज्योत सिद्धूने सर्वाधिक 93 धावा केल्या. तर, अजय जाडेजाने 45 धावा केल्या. भारताने 8 गडी गमावून 287 धावा केल्या. पाकिस्तानकडून मुश्ताक अहमदने 56 धावांत 2 बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघाला 248 धावा करू शकला. 

टी-20 विश्वचषक 2007 फायनल- 

पहिल्या टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारतीय संघ पाकिस्तानशी भिडला होता. हा सामना भारतीय क्रिकेट चाहते कधीच विसरू शकणार नाहीत. या सामन्यात केवळ 5 धावांनी विजय मिळवून भारतीय संघाने विश्वचषकावर नाव कोरले होते. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानसमोर 157 धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला पाकिस्तानचा संघ 152 वर ऑलआऊट झाला. या सामन्यात मिस्बाह-उल-हकने सामना फिरवण्याचा प्रयत्न केला. परंतु, अखेरच्या षटकात जोगिंदर शर्माच्या गोलंदाजीवर त्याने श्रीशांतला झेल दिला. 

टी-20 विश्वचषक 2021 च्या सराव सामन्यात भारताकडून चांगली कामगिरी पाहायला मिळते. भारताने पहिल्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध सात विकेट्सने विजय मिळवला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 8 विकेट्सने पराभूत केले. भारताकडून पुढेही अशीच कामगिरी पाहायला मिळेल? अशी अपेक्षा केली जात आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

RCB vs GT IPL Final 2026: आयपीएलची आज हाय-व्होल्टेज फायनल; गुजरात आणि बंगळुरु भिडणार, जेतेपद जिंकल्यास कुणाला किती रुपये मिळणार?, A टू Z माहिती
आयपीएलची आज हाय-व्होल्टेज फायनल; गुजरात आणि बंगळुरु भिडणार, जेतेपद जिंकल्यास कुणाला किती रुपये मिळणार?, A टू Z माहिती
T20 Mumbai League : ‘आमच्या टीममध्येही वैभव सूर्यवंशी!’; जेतेपद राखण्यासाठी ‘मराठा रॉयल्स’ सज्ज, कॅप्टन सिद्धेश लाड काय म्हणाला?
‘आमच्या टीममध्येही वैभव सूर्यवंशी!’; जेतेपद राखण्यासाठी ‘मराठा रॉयल्स’ सज्ज, कॅप्टन सिद्धेश लाड काय म्हणाला?
RCB vs GT IPL 2026 Final : एकही बॉल न खेळता आरसीबी पुन्हा चॅम्पियन होणार?; अहमदाबादमधून हवामानाबाबत मोठी अपडेट
एकही बॉल न खेळता आरसीबी पुन्हा चॅम्पियन होणार?; अहमदाबादमधून हवामानाबाबत मोठी अपडेट
Hardik Pandya : मुंबई इंडियन्सला रामराम ठोकताच हार्दिक पांड्या IPLचा इतिहास-भूगोल बदलणार?; 30 कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्यासाठी 3 संघ शर्यतीत
मुंबई इंडियन्सला रामराम ठोकताच हार्दिक पांड्या IPLचा इतिहास-भूगोल बदलणार?; 30 कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्यासाठी 3 संघ शर्यतीत

व्हिडीओ

Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Success Story: जिद्दीला सलाम! कोल्हापूरच्या पिता-पुत्राची एकाच वेळी मुंबई पोलिसांत दमदार एन्ट्री, आरुळ गावात जल्लोष; PHOTO
जिद्दीला सलाम! कोल्हापूरच्या पिता-पुत्राची एकाच वेळी मुंबई पोलिसांत दमदार एन्ट्री, आरुळ गावात जल्लोष; PHOTO
Vidhan Parishad Election 2026: 11-4-2...विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित; राष्ट्रवादीला यश, 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला 4 जागा
11-4-2...विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित; राष्ट्रवादीला यश, 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला 4 जागा
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत तब्बल 80 लाख महिला ठरल्या अपात्र, ई-केवायसी दुरुस्तीची मुदत संपल्यानंतर आकडेवारी समोर, मे महिन्याचे पैसे कधी मिळणार?
लाडकी बहीण योजनेत तब्बल 80 लाख महिला ठरल्या अपात्र,मे महिन्याचे पैसे कधी मिळणार?
Mumbai Rains: मुंबईत ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी; पालघरसह मुंबईला यलो अलर्ट
मुंबईत ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी; पालघरसह मुंबईला यलो अलर्ट
Thane Metro : ठाण्यातील 12 हजार कोटींच्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोला नागरिकांचा तीव्र विरोध; 'पांढरा हत्ती' ठरण्याची तज्ज्ञांची भीती
ठाण्यातील 12 हजार कोटींच्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोला नागरिकांचा तीव्र विरोध; 'पांढरा हत्ती' ठरण्याची तज्ज्ञांची भीती
दक्षिण दिल्लीत साकेत मेट्रो स्टेशनजवळ पाच मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती
दक्षिण दिल्लीत साकेत मेट्रो स्टेशनजवळ पाच मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती
IPL 2026 Final Prediction : बंगळुरू की गुजरात, अहमदाबादची खेळपट्टी कुणाला साथ देणार? आयपीएल फायनलचा सर्वात मोठा अंदाज समोर
बंगळुरू की गुजरात, अहमदाबादची खेळपट्टी कुणाला साथ देणार? आयपीएल फायनलचा सर्वात मोठा अंदाज समोर
Mamata Banerjee: 'शासक हत्यारे झालेत, भाजपला लाज वाटली पाहिजे..', खासदार पुतण्या अभिषेकवर प्राणघातक हल्ला होताच दीदी भडकल्या; काँग्रेस आणि सपाचाही सडकून प्रहार
'शासक हत्यारे झालेत, भाजपला लाज वाटली पाहिजे..', खासदार पुतण्या अभिषेकवर प्राणघातक हल्ला होताच दीदी भडकल्या; काँग्रेस आणि सपाचाही सडकून प्रहार
Embed widget