एक्स्प्लोर

Kuldeep Yadav : अर्ध्यातच टी-20 मालिका सोडून कुलदीप यादव परतला भारतात; ऑस्ट्रेलिया नेमकं काय घडलं? BCCI ने ट्वीट करत कारण सांगितलं

India vs Australia T20 Squad Update : कुलदीप यादवला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून अचानक टीम इंडियातून रिलीज, बीसीसीआयचा मोठा निर्णय, जाणून घ्या कारण

Kuldeep Yadav released from India’s T20I Squad : सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे, जिथे 5 सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. 2 नोव्हेंबरला होबार्ट येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 5 विकेटने विजय मिळवला. या मालिकेत डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादव संघात असला तरी त्याला तिसऱ्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. आता बीसीसीआयने त्याला मालिकेच्या मध्यातच टीम इंडियाच्या स्क्वॉडमधून रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तो आता भारतात परतणार आहे.

बीसीसीआयचा मोठा निर्णय! काय आहे कारण?

भारतीय संघाला 14 नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेच्या तयारीसाठी बीसीसीआयने कुलदीप यादवला लवकर भारतात परत बोलावले आहे. बोर्डाकडून जारी केलेल्या निवेदनात सांगितले आहे की, कुलदीप भारतात परतल्यानंतर दक्षिण आफ्रिकाविरुद्ध चालू असलेल्या अनऑफिशियल कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात भारत ‘अ’ संघाकडून खेळणार आहे. हा सामना 6 नोव्हेंबरला बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्सच्या मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यात खेळल्यामुळे कुलदीपला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी आपली तयारी अधिक मजबूत करण्याची संधी मिळेल.

के.एल. राहुल अन् मोहम्मद सिराजही खेळणार

भारत आणि दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघांमध्ये 2 अनऑफिशियल कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेत ऋषभ पंत भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. पहिला सामना भारताने 3 विकेटने जिंकला. आता दुसऱ्या सामन्यात कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि के.एल. राहुल हेही प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसणार आहेत.

दक्षिण आफ्रिका अ विरुद्धच्या दुसऱ्या अनधिकृत कसोटीसाठी टीम इंडियाचा संघ : ऋषभ पंत (कर्णधार, यष्टिरक्षक), केएल राहुल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), साई सुदर्शन (उपकर्णधार), देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, हर्ष दुबे, तनुष कोटियन, मानव सुथार, खलील अहमद, गुरनूर ब्रार, अभिमन्यू ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, कुलदीप यादव.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि पाचव्या T20 साठी टीम इंडियाचा संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), टिळक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर.

हे ही वाचा -

Smriti Mandhana : एक शतक अन् दोन अर्धशतक! वर्ल्ड कपमध्ये सांगलीच्या स्मृती मानधनाचा डंका, 9 सामन्यांत ठोकल्या इतक्या धावा, तोडला मिताली राजचा विक्रम

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL 1st Test DAY-1 : KL राहुल रिटायर्ड हर्ट झाला, गिल लवकर गेला… पण पडिक्कल नडला! शतकाचा तडाखा देत श्रीलंकेची झोप उडवली, गॉलमध्ये पहिल्या दिवशी नेमकं काय घडलं?
KL राहुल रिटायर्ड हर्ट झाला, गिल लवकर गेला… पण पडिक्कल नडला! शतकाचा तडाखा देत श्रीलंकेची झोप उडवली, गॉलमध्ये पहिल्या दिवशी नेमकं काय घडलं?
Devdutt Padikkal Century : संधी मिळाली... देवदत्त पडिक्कल तुटून पडला! तिसऱ्याच सामन्यात ठोकलं पहिलं शतक, 695 दिवसांनी कोहलीच्या जागी टीम इंडियाला मिळाला शतकवीर
संधी मिळाली... देवदत्त पडिक्कल तुटून पडला! तिसऱ्याच सामन्यात ठोकलं पहिलं शतक, 695 दिवसांनी कोहलीच्या जागी टीम इंडियाला मिळाला शतकवीर
KL Rahul Retires Hurt : केएल राहुल अचानक रिटायर्ड हर्ट; शतकाच्या दिशेनं वाटचाल करत असताना सोडलं मैदान, सगळेच चक्रावले, नेमकं घडलं तरी काय?
केएल राहुल अचानक रिटायर्ड हर्ट; शतकाच्या दिशेनं वाटचाल करत असताना सोडलं मैदान, सगळेच चक्रावले, नेमकं घडलं तरी काय?
Ind vs Sl 1st Test : गॉल कसोटीत काळजाचा ठोका चुकवणारा क्षण! KL राहुलचा 'तो' खतरनाक शॉट अन् श्रीलंकन खेळाडू जखमी, सोडावे लागले मैदान, नेमकं काय घडलं? Video
गॉल कसोटीत काळजाचा ठोका चुकवणारा क्षण! KL राहुलचा 'तो' खतरनाक शॉट अन् श्रीलंकन खेळाडू जखमी, सोडावे लागले मैदान, नेमकं काय घडलं? Video

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget