एक्स्प्लोर

IND vs ENG: 12 वर्षांपासून अजिंक्य, सलग 17 मालिका खिशात, मायदेशातील भारताच्या विजयाचं रहस्य काय?

Team India Home Series : मागील 12 वर्षांत घरच्या मैदानावर भारताचा हा सलग 17 वा कसोटी मालिका विजय होय. तर इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका यासारख्या संघाचा भारताने घरच्या मैदानावर सुपडा साफ केलाय.

Team India Home Series : रांची कसोटी सामन्यात भारताला विजयासाठी 192 धावांचे आव्हान होतं. 38 षटकात पाच विकेट गमावत भारतानं फक्त 120 धावा केल्या होत्या. रोहित शर्मा, यशस्वी जायस्वील, रजत पाटीदार, रवींद्र जाडेजा अन् सरफराज असे आघाडीचे फलंदाज तंबूत परतले होते. शुभमन गिल आणि ध्रुव जुरेल मैदानात होते, भारताला विजयासाठी 72 धावांची गरज होती. इंग्लंडचे फिरकी गोलंदाज भेदक मारा करत होते, त्यामुळे सामना अटीतटीचा होणार, असा अंदाज सर्वांनी वर्तवला. पण कठीण परिस्थितीमध्ये शुभमन गिल (नाबाद 52) आणि ध्रुव जुरेल (नाबाद 39) यांनी संयमी खेळी करत विजय मिळवून दिला. रांची कसोटी विजयासह भारताने मालिका 3-1 ने खिशात घातली. अखेरचा कसोटी सामना सात मार्च रोजी धर्मशाला येथे होणार आहे. पण त्याआधीच भारताने कसोटी मालिकेत बाजी मारली. मागील 12 वर्षांत घरच्या मैदानावर भारताचा हा सलग 17 वा कसोटी मालिका विजय होय. तर इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका यासारख्या संघाचा भारताने घरच्या मैदानावर सुपडा साफ केलाय. भारतीय संघ 2013 मध्ये अॅळिस्टर कूकच्या नेतृत्वातील इंग्लंडसंघाविरोधात घराच्या मैदानावर पराभूत झाला होता. पण त्यानंतर भारतीय संघ आतापर्यंत अजेय आहे. मायदेशात भारतीय संघ इतका यशस्वी का झाला? भारतीय संघाचा पराभव करणं इतकं कठीण का आहे? त्याबाबत थोडक्यात जाणून घेऊयात..

फिरकीचं जाळं - 

भारताला भारतात पराभव करणं अशक्य आहे. ज्या संघाचे फलंदाज फिरकी चांगले खेळू शकतात, तोच संघ भारताला मायदेशात पराभूत करु शकतो. भारतीय खेळपट्टीवर चौथ्या आणि पाचव्या दिवशी फलंदाजी कऱणं आव्हानात्मक राहतं. काऱण, खेळपट्टीवर चेंडू अधिक टर्न होतो. पण गेल्या काही दिवसांत चेंडू तिसऱ्याच दिवशी जास्त टर्न होत असल्याचं दिसतेय. अनेक चेंडू खाली राहत असल्याचेही दिसले. अशा स्थितीमध्ये फलंदाजांचा फुटवर्क महत्वाचा ठरतो. उसळी घेणाऱ्या वेगवान खेळपट्टीवर खेळणाऱ्या विदेशी फलंदाजांनी फिरकी गोलंदाजीवर खेळणं कठीण जातं. मागील 20 वर्षांत हरभजनसिंह, अनिल कुंबळे, आर. अश्विन, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, अमित मिश्रा आणि अक्षर पटेल यासारखे दर्देजार स्पिनर भारतीय संघात खेळले. या गोलंदाजांसमोर खेळं फलंदाजांसाठी कठीण जातं.  भारताच्या विजयाचं हे एक मोठं काऱण आहे.

बेंच स्ट्रेंथ - 

मागील 12 वर्षांत भारतीय संघ मायदेशात अजेय राहिला, त्याचं आणखी एक कारण म्हणजे मजबूत बेंच स्ट्रेंथ होय. वीरेंद्र सहवागची कमी रोहित शर्मानं भरुन काढली. सचिन तेंडुलकरची कमी विराट कोहलीनं भरली. राहुल द्रविडची कमी चेतेश्वर पुजाराने भरली, आता शुभमन गिल संभाळतोय. गोलंदाजीत.. झहीर खानची जागा जसप्रीत बुमराहने घेतली. सिराजही भेदक मारा करतोय. भज्जी-कुंबळेची जाहा अश्विन-जाडेजा यांनी घेतली. देशांतर्गत क्रिकेटचा अनुभव नेहमीच भारतीय संघासाठी फायद्याचा ठरलाय. 

तिसरा 'एक्स' फॅक्टर - 

भारतीय क्रिकेटचे चाहते जगभरात आहेत. भारताचा सामना कुठेही असला तरी स्टेडियम फुल्लं होतात. भारतात सामना असेल तर विचारुच नका.. चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद... हा भारताच्या विजयाचा एक्स फॅक्टर आहे. मागील 12 वर्षांत कसोटी क्रिकेट पाहण्यासाठीही भारतीय चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. टीम इंडियाला सपोर्ट करणारे चाहतेही विजयाचा मोठा फॅक्टर आहेत. घरच्या गोंगाटाच्या गर्दीसमोर खेळल्याने पाहुण्या संघांवर दबाव वाढतो, त्यामुळे त्यांच्या कामगिरीवर परिणाम होतो. इतकेच नाही तर भारताच्या अनेक भागांतील उष्ण आणि दमट हवामानामुळे पाहुण्या खेळाडूंना, विशेषत: थंड हवामान असलेल्या देशांतून येणाऱ्या खेळाडूंना शारीरिकदृष्ट्या त्रास होऊ शकतो. या परिस्थितीचा कसोटी सामन्यादरम्यान त्याच्या सहनशक्ती आणि एकाग्रतेवर परिणाम होतो. 

आणखी वाचा :

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Who Is Subhadeep Ghosh : कधीही खेळला नाही आंतरराष्ट्रीय सामना, आता बनणार टीम इंडियाचा फील्डिंग कोच; कोण आहे शुभदीप घोष?
कधीही खेळला नाही आंतरराष्ट्रीय सामना, आता बनणार टीम इंडियाचा फील्डिंग कोच; कोण आहे शुभदीप घोष?
क्रिकेट इतिहासातील सर्वात विचित्र OUT; टिचकी वाजवली अन् अंपायर फसवला, इंग्लंडमध्ये सामन्यात असा प्रकार घडला की जगभरात VIDEO व्हायरल
क्रिकेट इतिहासातील सर्वात विचित्र OUT; टिचकी वाजवली अन् अंपायर फसवला, इंग्लंडमध्ये सामन्यात असा प्रकार घडला की जगभरात VIDEO व्हायरल
Team India Coach News : रायन टेन डोशेटचा राजीनामा; आता गौतम गंभीर अन् अजित आगरकरांच्या खुर्चीचं काय होणार? BCCI च्या पुढच्या निर्णयाकडे साऱ्या क्रिकेटविश्वाचं लक्ष
रायन टेन डोशेटचा राजीनामा; आता गौतम गंभीर अन् अजित आगरकरांच्या खुर्चीचं काय होणार? BCCI च्या पुढच्या निर्णयाकडे साऱ्या क्रिकेटविश्वाचं लक्ष
Ryan Ten Doeschate News : भारतीय क्रिकेटला हादरवणारी एक्झिट! गौतम गंभीरचा सर्वात विश्वासू साथीदाराने अचानक दिला राजीनामा, थेट आयपीएलच्या बड्या टीमचा हात धरला
भारतीय क्रिकेटला हादरवणारी एक्झिट! गौतम गंभीरचा सर्वात विश्वासू साथीदाराने अचानक दिला राजीनामा, थेट आयपीएलच्या बड्या टीमचा हात धरला

व्हिडीओ

Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
Embed widget