एक्स्प्लोर

Virat Kohli On Shikhar Dhawan Retirement  : "भारताचा सर्वात विश्वासार्ह..." धवनच्या निवृत्तीवर कोहलीची जबरदस्त प्रतिक्रिया; काही मिनिटांत व्हायरल

भारतीय फलंदाज शिखर धवनच्या निवृत्तीवर विराट कोहलीने अतिशय जबरदस्त प्रतिक्रिया दिली आहे.  

Virat Kohli On Shikhar Dhawan Retirement :  शनिवारी (24 ऑगस्ट) सकाळी भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला, कारण अनेक वर्षांपासून टीम इंडियासाठी डावाची सुरुवात करणाऱ्या शिखर धवनने निवृत्तीची घोषणा केली. धवनला काही काळापासून भारतीय संघात संधी मिळाली नव्हती आणि आता त्याने आपली कारकीर्द संपुष्टात आणली आहे. 

गब्बरच्या निवृत्तीबद्दल चाहत्यांसह टीम इंडियामध्ये त्याच्यासोबत खेळलेले खेळाडू तसेच अनेक माजी क्रिकेटपटूंनीही त्याला त्याच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, धवनचा चांगला मित्र असलेल्या भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने आता प्रतिक्रिया दिली आहे. ज्यामध्ये कोहलीने शिखरचे खूप कौतुक केले आहे.

रविवारी विराट कोहलीने शिखर धवनच्या निवृत्तीबद्दल एक खास ट्विट केले. कोहलीने आपल्या ट्विटमध्ये शिखरचे भरभरून कौतुक केले. किंग कोहलीने लिहिले की, "शिखर, तुझ्या निर्भय पदार्पणापासून ते भारतातील सर्वात विश्वासार्ह सलामीवीर बनण्यापर्यंत, तू आम्हाला जपण्यासाठी असंख्य आठवणी दिल्या. खेळाबद्दलची तुझी आवड, तुझी खिलाडूवृत्ती आणि तुझे ट्रेडमार्क स्मित गमावले जाईल परंतु तुझा वारसा कायम आहे. आठवणींसाठी, अविस्मरणीय कामगिरीबद्दल आणि नेहमी मनापासून नेतृत्व केल्याबद्दल धन्यवाद. मैदानाबाहेर गब्बर, तुझ्या पुढील डावात तुला शुभेच्छा!”
 
शिखर धवन आणि विराट कोहली दिल्लीचे आहेत आणि दोघांनी एकत्र खूप डोमेस्टिक क्रिकेट खेळले आहे. याशिवाय मैदानाबाहेरही त्यांची मैत्री चांगलीच आहे. आयपीएलमध्येही हे दोघे अनेकदा मस्ती करताना दिसले आहेत.

शिखर धवनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

शिखर धवन 2010 ते 2022 पर्यंत टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला होता. ऑक्टोबर 2010 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडेमध्ये त्याने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तो भारतासाठी तिन्ही फॉरमॅट खेळला. धवनने एकूण 34 कसोटी, 167 एकदिवसीय आणि 68 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. 

कसोटीत त्याने 40.61 च्या सरासरीने 2315 धावा केल्या. याशिवाय त्याने एकदिवसीय सामन्यात 44.11 च्या सरासरीने 6793 धावा केल्या आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 27.92 च्या सरासरीने आणि 126.36 च्या स्ट्राईक रेटने 1759 धावा केल्या. धवनने कसोटी क्रिकेटमध्ये 7 शतके आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 17 शतके झळकावली आहेत.

विराट कोहली बांगलादेश मालिकेतून परतणार

टीम इंडिया सध्या ब्रेकवर आहे आणि यादरम्यान काही खेळाडू दुलीप ट्रॉफीमध्ये दिसणार आहेत. पण कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह अनेक खेळाडू केवळ 19 सप्टेंबरपासून होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसणार आहेत. 
विराटने शेवटची एकदिवसीय मालिका श्रीलंकेत खेळली होती, जी खूप खराब राहिली आणि त्याने आपल्या बॅटने एकही अर्धशतक झळकावले नाही. अशा स्थितीत कोहलीला बांगलादेशविरुद्ध भरपूर धावा करायला आवडेल.

हे ही वाचा :

WTC Points Table 2023-25 : इंग्लंडच्या विजयानंतर WTC पॉइंट टेबलमध्ये मोठी उलथापालथ! टीम इंडियासह या संघाची डोकेदुखी वाढली

Abhinav Manohar: 6,6,6,6... महाराजा ट्रॉफीत अभिनव मनोहरनं पाडला षटकारांचा पाऊस, गोलंदाजांना धू धू धुतलं...  

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Kolhapur Pregnant Candidate Congress : 9 महिन्यांची गरोदर महिला कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात
Nilesh Rane on Thackeray Alliance : ठाकरे बंधुंची एक्सपायरी डेट संपली, निलेश राणेंचा प्रहार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
Nawab Malik: मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
Embed widget