एक्स्प्लोर

Team india Captain : रोहित शर्मा होणार टी-20चा कॅप्टन, वन-डेच्या कर्णधारपदवरही चर्चा

Team india Captain : रोहित शर्माकडे भारतीय संघाच्या टी-20 संघाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालेय.

Team india Captain : रोहित शर्माकडे भारतीय संघाच्या टी-20 संघाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालेय. इनसाइड स्पोर्ट्सने बीसीसीआयच्या सुत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार, रोहित शर्माकडे टी-20 सोबत एकदिवसीय संघाचेही नेतृत्व देण्यात येणार आहे.  टी-20 आणि एकदिवसीय सामन्यासाठी वेगवेगळा कर्णधार ठेवण्यास एकमत झालं नाही. सिनिअर सदस्यानुसार, दोन्ही संघाच्या कर्णधारपदावर एकच व्यक्ती असायला हवा. त्यामुळे रोहित शर्माकडे एकदिवसीय संघाचं नेतृत्वही मिळण्याची शक्यता आहे. विराट कोहली कसोटी संघाच्या कर्णधारपदावर कायम राहणार आहे. निवड समिती पुढील आठवड्यात याबाबतची घोषणा करणार आहे. न्यूझीलंडच्या भारत दौऱ्यावर मर्यादीत षटकाच्या भारताच्या कर्णधारपदाची जबाबदारी रोहित शर्माकडे दिली जाणार आहे.

रिपोर्ट्सनुसार, BCCI अधिकाऱ्यांनी तिन्ही फॉर्मेटसाठी वेगवेगळे कर्णधारपद करणार असल्याच्या वृत्ताचं खंडन केलं आहे. टी-20 आणि एकदिवसीय संघासाठी एक कर्णधार असावा, असं मत निवड समितीचं आहे. त्यातच विराट कोहली टी-20 विश्वचषकानंतर कर्णधारपद सोडणार आहे. वर्कलोडचं कारण देत विराट कोहलीनं टी-20 संघाचं कर्णधारपद सोडलं आहे. विराट कोहलीनं सोशल मीडियावरही याबाबतचं स्पष्टीकरण दिलं आहे. तो म्हणाला की 'गेल्या काही वर्षांपासून तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळत आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्णधारपदही सांभाळत आहे. वर्कलोड जास्त होत आहे. वन-डे आणि कसोटी कर्णधारपदावर लक्ष देण्यासाठी टी-20 संघाचं कर्णधारपद सोडत आहे. टी-20 मध्ये फक्त एक फलंदाज म्हणून खेळत राहिल.'  

वर्ल्डकपनंतर न्यूझीलंडचा भारत दौरा - 

टी-20 वर्ल्डकपनंतर न्यूझीलंड भारताच्या दौऱ्यावर येत आहे. यामध्ये तीन टी20 आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. 17 नोव्हेंबर रोजी जयपूरमध्ये पहिला टी-20 सामना होणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी रांची येथे दुसरा, 21 नोव्हेंबर रोजी कोलकातामध्ये तिसरा सामना होणार आहे. त्यानंतर 25 ते 29 नोव्हेंबरपर्यंत कानपूरमध्ये पहिला कसोटी सामना होणार आहे. तर 3 ते 7 डिसेंबरदरम्यान दुसरा कसोटी सामना होणार आहे. 

2023 पर्यंत दोन वर्ल्डकप

2023 पर्यंत दोन विश्वचषक होणार आहेत. 2022 मध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रोलियात टी-20 वर्ल्डकप होणार आहे. 2023 मध्ये एकदिवसीय सामन्याचा विश्वचषक सामना होणार आहे. दोन मोठ्या स्पर्धेपूर्वी रोहित शर्माला संघ बांधणीसाठी वेळ मिळेल. ऑस्ट्रेलियातील मोठी मैदानं पाहाता रोहित शर्मा आपला चांगला संघ तयार करेल. त्यासोबतच रोहित शर्माला मोठ्या स्पर्धा जिंकण्याचा अनुभव आहे, त्याचाही भारतीय संघाला फायदा होणार आहे.   

कर्णधार म्हणून रोहित शर्माचं रेकॉर्ड जबरदस्त –

कर्णधार म्हणून रोहित शर्माचं रेकॉर्ड जबरदस्त आहे. 19 सामन्यात रोहित शर्मानं भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. त्यापैकी भारतीय संघानं 15 विजय मिळवले आहे. तसेच आयपीएलमध्ये आपल्या संघाला रोहित शर्मानं 59.68 टक्के सामने जिंकून दिलेत. पाच वेळा चषकावर नाव कोरणारा, रोहित शर्मा आयपीएलमधील एकमेव कर्णधार आहे.

राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक –

माजी खेळाडू राहुल द्रविड भारताचा मुख्य प्रशिक्षक होणार आहे. द्रविडबद्दलची लवकरच घोषणा केली जाणार आहे. टी-20 विश्वचषकानंतर रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. त्यांनतर राहुल द्रविडकडे मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.  

महत्त्वाच्या बातम्या

Shreyas Iyer : अपयशाची भीती बाळगू नका, टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडला कॅप्टन श्रेयस अय्यरचा सल्ला, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम सज्ज  
अपयशाची भीती बाळगू नका, दोन मालिकेतील अपयशानंतर टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडला कॅप्टन श्रेयस अय्यरचा सल्ला
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी झिम्बाब्वे विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी सज्ज, इंग्लंडमधील अपयशावर 'बेबी बॉस' म्हणाला...
क्रिकेटमध्ये चढ उतार येतात, वैभव सूर्यवंशीची इंग्लंडमधील अपयशावर पहिली प्रतिक्रिया... झिम्बाब्वे दौऱ्यासाठी सज्ज
Ravi Shastri Picks Team India Squad For ODI World Cup 2027: भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
IND vs ZIM : लढाई एकतर्फी होणार नाही, सलग दोन देशांविरुद्ध पराभवाचं तोंड पाहणाऱ्या टीम इंडियाला झिम्बाब्वेच्या कर्णधाराचं आव्हान, सिकंदर रझा म्हणाला...
लढाई एकतर्फी होणार नाही, टीम इंडियाला झिम्बाब्वेच्या कर्णधाराचं आव्हान, सिकंदर रझा नेमंक काय म्हणाला?

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget