![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
IND vs AUS, 3rd test : फिरकीपटूंच्या जाळ्यात अडकले भारतीय फलंदाज, अवघ्या 109 धावांवर सर्वबाद!
IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना इंदूरच्या होळकर क्रिकेट मैदानात खेळवला जात असून भारताचा पहिला डाव अवघ्या 109 धावांवर आटोपला आहे.
![IND vs AUS, 3rd test : फिरकीपटूंच्या जाळ्यात अडकले भारतीय फलंदाज, अवघ्या 109 धावांवर सर्वबाद! Team India allout on 109 runs against Australia in 3rd Test on spin friendly pitch troubles india in Indore test IND vs AUS, 3rd test : फिरकीपटूंच्या जाळ्यात अडकले भारतीय फलंदाज, अवघ्या 109 धावांवर सर्वबाद!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/01/b84c901b603dc207804ae819288383581677655927471300_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IND vs AUS 3rd Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सुरु तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा पहिला डाव अवघ्या 109 धावांवर आटोपला आहे. भारतीय फलंदाज ऑस्ट्रेलियन फिरकीपटूंच्या जाळ्यात अडकल्याचं दिसून आलं आहे. कारण या पहिल्या डावात सर्वच्या सर्व विकेट्स या ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटूंनी घेतल्या आहेत. यामध्ये मॅथ्यू कुहनेमनने सर्वाधिक 5 तर नॅथन लायनने 3 आणि मर्फीने एक विकेट घेतली आहे. भारताचा एक गडी धावचीत झाला आहे. भारताकडून विराटने 22 तर शुभमनने 21 या सर्वाधिक धावा केल्या आहेत.
इंदूरच्या होळकर स्टेडियमवर भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण फिरकी गोलंदाजीसाठी अधिक फायदेशीर असणाऱ्या या पिचवर भारतीय फलंदाज काहीच खास कामगिरी करु शकले नाहीत. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने सुरुवातीला वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि कॅमरुन ग्रीन यांच्याकडे चेंडू सोपवला. पण भारतीय फलंदाजांनी वेगवान गोलंदाजांविरुद्ध धावा काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे लगेचच कर्णधार स्मिथने आपल्या फिरकीपटूंकडे चेंडू सोपवताच भारतीय संघ ढासळताना दिसला. एकही विकेट न गमावता 27 धावा केल्यानंतर भारतीय संघाने पुढील 18 धावांत 5 विकेट गमावल्या. ज्यानंतर पुढे कशातरी 100 पार धावा भारताने केल्या आणि 33.2 षटकांत 109 धावांवर भारताचा डाव आटोपला.
मॅथ्यू कुहनेमनचं जबरदस्त प्रदर्शन
दिल्ली कसोटीतून रेड-बॉल क्रिकेटमध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या मॅथ्यू कुहनेमनने दुसऱ्या कसोटीत भारताच्या पहिल्या डावात फारच अप्रतिम कामगिरी केली आहे. कुहनेमनला पदार्पणाच्या कसोटीत केवळ दोन विकेट मिळाल्या होत्या. पण आपल्या दुसऱ्या कसोटीत कुहनेमनने पहिल्या चार षटकांतच टीम इंडियाला 3 धक्के देत एका डावात 5 विकेट्स घेण्याचा मान मिळवला. कुहनेमनने प्रथम कर्णधार रोहित शर्माला (12 धावा) यष्टिमागे झेलबाद केलं. त्यानंतर त्याच्या पुढच्याच षटकात सलामीवीर शुभमन गिलला (21 धावा) पॅव्हेलियनमध्ये पाठवले. श्रेयस अय्यरला (0) बोल्ड करुन अखेर अश्विन आणि उमेश यादव या अखेरच्या फळीतील महत्त्वाच्या विकेट्सहील त्याने घेतल्या. याशिवाय अनुभवी नॅथन लायनने चेतेश्वर पुजारा (1 धाव) आणि रवींद्र जाडेजा (4 धावा) आणि केएस भरत (17 धावा) या विकेट्स घेतल्या. तर मर्फीने विराटची (22 धावा) मोठी विकेट घेतली.
WTC Final मध्ये एन्ट्रीसाठी विजय महत्त्वाचा
या मालिकेत एकूण 4 कसोटी सामने खेळवले जाणार होते, ज्यातील पहिला आणि दुसरा सामना भारताने जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता तिसरी कसोटी जिंकून भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित करु शकतो.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)