एक्स्प्लोर

दोघांच्या वादात तिसऱ्याचा लाभ! सामना मुंबई-महाराष्ट्राचा, पण आंध्र प्रदेशला होणार फायदा

Ranji Trophy : दोन्ही संघाचा पहिला डाव समान धावसंख्येवर आटोपला आहे. त्यामुळे सामना रंगतदार अवस्थेत पोहचलाय.

Mumbai vs Maharashtra Ranji Trophy : रणजी क्रिकेट स्पर्धेत (Ranji Trophy) मुंबई आणि महाराष्ट्र (Mumbai Vs Maharashtra) यांच्यातील सामना रंगतदार अवस्थेत पोहचलाय. दोन्ही संघाचा डाव समान धावसंख्येवर आटोपलाय. त्यातच फक्त एका दिवसाचा खेळ बाकी आहे. जर सामना अनिर्णित राहिला तर याचा फायदा आंध्र प्रदेश संघाला होणार आहे. दोघांच्या वादात तिसऱ्याचा लाभ, या म्हणीप्रमाणे मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील लढतीचा फायदा आंध्र प्रदेशला होणार आहे. पण अखेरच्या दिवशी महाराष्ट्र आणि मुंबई यांच्यातील सामन्याचा निकाल लागला तर विजेता संघ पुढील फेरीत प्रवेश करणार आहे.

पाहूयात नेमकं गणित काय आहे? How can Andhra qualify ahead of Mumbai and Maharashtra?

महाराष्ट्र आणि मुंबई या दोन्ही संघाची पहिल्या डावात समान धावसंख्या झाली आहे. पहिल्या डावात दोन्ही संघानी 384 धावाच केल्या आहेत. सध्या पॉईंट टेबलमध्ये मुंबईचा संघ 23 गुणांवर आहे तर महाराष्ट्राचा संघ 25 गुणावर आहे. या दोन्ही संघातील सामना अनिर्णित राहिला तर दोन्ही संघाला प्रत्येकी एक एक गुण मिळणार आहे. त्यामुळे मुंबईला 24 तर महाराष्ट्र 26 अंकावर जाणार आहे. मुंबईचे आव्हान संपुष्टात येईल. तर आंध्र प्रदेश, सौराष्ट्र (जर तामिळनाडूविरुद्ध हरली तर) आणि महाराष्ट्र या संघांचे गुण समान होतील. पण एलिट ग्रुप बी मध्ये आंध्र प्रदेश आणि सौराष्ट्र या संघांनी एक सामना बोनस गुणांसह जिंकला आहे. त्यामुळे त्या निकषावर तिन्ही संघांचे गुण समान असले तरी महाराष्ट्राचं आव्हान संपुष्टात येईल. आंध्र प्रदेश आणि सौराष्ट्र हे संघ पुढील फेरीत पोहचतील. पण अखेरच्या चौथ्या दिवशी महाराष्ट्र आणि मुंबई यांच्यातील सामन्याचा निकाल लागला तर विजेता संघ पुढील फेरीत प्रवेश करणार आहे.

सामन्यात सध्याची स्थिती काय?

केदार जाधव याचं दमदार शतक तसेच  सौरभ नवले (58) आणि अक्षय पालकर (66) यांच्या अर्धशतकाच्या बळावर महाराष्ट्राने पहिल्या डावात 384 धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरदाखल मुंबईची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली होती. 200 धावांच्या आत मुंबईचा आघाडीचे पाच फलंदाज बाद झाले होते. पण प्रसाद पवार याचं दमदार शतक आणि तनुष कोटीन याच्या 93 धावांच्या बळावर मुंबईने 384 धावांपर्यंत मजल मारली... तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा महाराष्ट्राने दोन गड्याच्या मोबदल्यात 52 धावा केल्या आहेत. शुक्रवारी म्हणजेच अखेरच्या दिवशी दोन्ही संघाला विजयासाठी मैदानात उतरावे लागणार आहे. पण हा सामना अनिर्णित राहिला तर दोन्ही संघाचं आव्हान संपुष्टात येईल.. आंध्र प्रदेश संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरणार आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget