एक्स्प्लोर

R Ashwin Test Records: भारताचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज अनिल कुंबळेचा 'हा' रेकॉर्ड तोडण्यासाठी अश्विन सज्ज, 22 विकेट्सची गरज

R Ashwin : भारतीय भूमीत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड आजही माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे याच्याच नावावर असून आर अश्विन या रेकॉर्डच्या दिशेने वेगात पोहचताना दिसत आहे. 

Ashwin Record : भारतीय फिरकी गोलंदाज आर अश्विन (R Ashwin) लवकरच आपल्या नावावर आणखी एक मोठा विक्रम करू शकतो. तो भारतीय मैदानावर सर्वाधिक कसोटी बळी घेणारा गोलंदाज बनू शकतो. सध्या हा विक्रम भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळेच्या (Anil Kumble) नावावर आहे. आर अश्विनने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 (BGT 2023) अंतर्गत इंदूरमध्ये खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी तीन विकेट घेतल्या. या तीन विकेट्ससह, जिथे आर अश्विनने त्याच्या एकूण कसोटी बळींची संख्या 466 वर पोहोचवली, तसंच घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये त्याने घेतलेल्या विकेट्सची संख्या 329 वर गेली आहे. म्हणजेच आर अश्विनने आपल्या सर्वाधिक विकेट्स फक्त भारतीय मैदानावर घेतल्या आहेत. त्याचा भारतीय भूमीवरचा हा भक्कम विक्रम आता मोठी कामगिरी ठरणार आहे.

कारण भारतात अनिल कुंबळेने 63 कसोटी सामन्यांच्या 115 डावात 350 विकेट्स घेतल्या आहेत. भारतीय मैदानावर तो बऱ्याच काळापासून सर्वाधिक कसोटी बळी घेणारा गोलंदाज म्हणून विराजमान आहे. आता अश्विन हा विक्रम मोडण्यापासून फक्त 22 विकेट्स दूर आहे. पुढील 7 ते 8 सामन्यांमध्ये अश्विन हा मोठा विक्रम आपल्या नावावर करू शकतो.

कपिल देव यांना टाकलं मागे

अश्विननं घेतलेल्य तीन विकेट्समुळे त्याने अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांना मागे टाकलं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात इंदूरमध्ये खेळल्या जात असलेल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात अश्विनने तीन बळी घेतले. आधी पीटर हँड्सकॉम्बची विकेट घेत त्याने कपिल देव यांच्या 687 आंतरराष्ट्रीय विकेट्सच्या विक्रमाशी बरोबरी केली. त्यानंतर अश्विनने अॅलेक्स कॅरीला पॅव्हेलियनमध्ये पाठवताना कपिल देव यांचा रेकॉर्डही मोडला. त्यानंतर अश्विनने नॅथन लायनला बोल्ड करून त्याच्या आंतरराष्ट्रीय विकेटची संख्या 689 वर नेली. इंदूर कसोटीच्या दुसऱ्या दिवशी अश्विनच्या या अप्रतिम गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलिया चा संघ फारशी आघाडी घेऊ शकला नाही. ऑस्ट्रेलियन संघ 197 धावांवर सर्वबाद झाला. त्याआधी भारतीय संघाने पहिल्या डावात केवळ 109 धावा केल्या होत्या. पण भारताचा दुसरा डावही 163 धावांवर आटोपल्याने ऑस्ट्रेलियाला केवळ 76 धावांची गरज आहे. दरम्यान अश्विनच्या नावावर आता कसोटी क्रिकेटमध्ये 466, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 151 आणि आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये 72 विकेट्स आहेत. तसेच तो कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी दुसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे.

हे देखील वाचा-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मराठा समाजाला तीन वर्षात 25 हजार कोटी दिले अन् ओबीसींना 25 वर्षांत  अडीच हजार कोटी; अजित पवार फक्त एकाच समाजाचे मंत्री आहेत का? प्रकाश शेंडगेंचा सवाल
मराठा समाजाला तीन वर्षात 25 हजार कोटी दिले अन् ओबीसींना 25 वर्षांत अडीच हजार कोटी; अजित पवार फक्त एकाच समाजाचे मंत्री आहेत का? प्रकाश शेंडगेंचा सवाल
नांदेड जिल्हा परिषद CEO ना अश्लील अन् धमकीचा मेसेज; प्रशासन अधिकाऱ्याचे तात्काळ निलंबन
नांदेड जिल्हा परिषद CEO ना अश्लील अन् धमकीचा मेसेज; प्रशासन अधिकाऱ्याचे तात्काळ निलंबन
Raju Shetti: कोल्हापूर ते पुणे राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झाल्याने टोल आकारणी तातडीने बंद करा; कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये राजू शेट्टींची याचिका
कोल्हापूर ते पुणे राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झाल्याने टोल आकारणी तातडीने बंद करा; कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये राजू शेट्टींची याचिका
धक्कादायक! चिमुकलीच्या घशात चॉकलेट अडकलं; बीडमध्ये 7 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू
धक्कादायक! चिमुकलीच्या घशात चॉकलेट अडकलं; बीडमध्ये 7 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
Thackeray Brothers Alliance | मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचे विरोधकांना आव्हान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मराठा समाजाला तीन वर्षात 25 हजार कोटी दिले अन् ओबीसींना 25 वर्षांत  अडीच हजार कोटी; अजित पवार फक्त एकाच समाजाचे मंत्री आहेत का? प्रकाश शेंडगेंचा सवाल
मराठा समाजाला तीन वर्षात 25 हजार कोटी दिले अन् ओबीसींना 25 वर्षांत अडीच हजार कोटी; अजित पवार फक्त एकाच समाजाचे मंत्री आहेत का? प्रकाश शेंडगेंचा सवाल
नांदेड जिल्हा परिषद CEO ना अश्लील अन् धमकीचा मेसेज; प्रशासन अधिकाऱ्याचे तात्काळ निलंबन
नांदेड जिल्हा परिषद CEO ना अश्लील अन् धमकीचा मेसेज; प्रशासन अधिकाऱ्याचे तात्काळ निलंबन
Raju Shetti: कोल्हापूर ते पुणे राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झाल्याने टोल आकारणी तातडीने बंद करा; कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये राजू शेट्टींची याचिका
कोल्हापूर ते पुणे राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झाल्याने टोल आकारणी तातडीने बंद करा; कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये राजू शेट्टींची याचिका
धक्कादायक! चिमुकलीच्या घशात चॉकलेट अडकलं; बीडमध्ये 7 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू
धक्कादायक! चिमुकलीच्या घशात चॉकलेट अडकलं; बीडमध्ये 7 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू
Maratha Reservation : कुणबी, मराठा प्रमाणपत्रासाठी आता गावपातळीवर समिती, कार्यपद्धती काय? समितीत कोणाचा समावेश? जाणून घ्या एका क्लिकवर
कुणबी, मराठा प्रमाणपत्रासाठी आता गावपातळीवर समिती, कार्यपद्धती काय? समितीत कोणाचा समावेश? जाणून घ्या एका क्लिकवर
Maratha Reservation: खुल्या वर्गातील लोकांना आरक्षण दिलं तर त्याचं औचित्यच संपेल,आरक्षणाने समस्या सुटणार नाहीत: प्रवीण गायकवाड
खुल्या वर्गातील लोकांना आरक्षण दिलं तर त्याचं औचित्यच संपेल,आरक्षणाने समस्या सुटणार नाहीत: प्रवीण गायकवाड
Beed Hyderabad Gazette: हैदराबाद गॅझेटमधील बीड जिल्हा नेमका कसा होता, नाव काय होतं, मोहम्मद बिन तुघलकाशी काय कनेक्शन?
हैदराबाद गॅझेटमधील बीड जिल्हा नेमका कसा होता, नाव काय होतं, मोहम्मद बिन तुघलकाशी काय कनेक्शन?
Ambabai Mandir: शारदीय नवरात्रोत्सवात पहिल्यांदाच अंबाबाई मंदिरात AI चा वापर केला जाणार; गर्दीवर नियंत्रण अन् दर्शन रांग सुलभ करण्यासाठी वापर होणार
शारदीय नवरात्रोत्सवात पहिल्यांदाच अंबाबाई मंदिरात AI चा वापर केला जाणार; गर्दीवर नियंत्रण अन् दर्शन रांग सुलभ करण्यासाठी वापर होणार
Embed widget