एक्स्प्लोर

T20 World Cup 2022 : भारतासह 'हे' तीन संघ असणार सेमीफायलनमध्ये, माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचं भाकित

T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियामध्ये 16 ऑक्टोबरपासून टी20 विश्वचषकाला सुरुवात होत असून भारत यंदा या स्पर्धेतील सर्वात दमदार संघापैकी एक आहे.

Ravi Shastri on T20 World Cup : आगामी टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) ऑस्ट्रेलियामध्ये सुरु होत असून सध्या सराव सामने सुरु झाले आहेत. भारतही ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध सराव सामने खेळणार असून इतरही संघ एकमेंकाविरुद्ध प्रॅक्टीस मॅच खेळत आहेत. यंदा सर्वच संघ कमाल फॉर्मात असल्याने एक चुरशीची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार असून नेमके कोणते संघ सेमीफायलनपर्यंत पोहोचणार याबद्दल माजी क्रिकेटर आणि माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी आपलं मत नोंदवलं आहे. शास्त्रींच्या मते भारत यंदा दमदार फॉर्ममध्ये असल्याने भारत सेमीफायनलपर्यंत नक्कीच पोहोचणार असून सोबत पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे संघ सेमीसपर्यंत पोहचण्याचे दावेदार आहेत.

टी20 विश्वचषकापूर्वी पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी शास्त्री मुंबई प्रेस क्लब इथे आले असताना त्यांनी विश्वचषकाबाबतच्या विविध गोष्टींवर चर्चा केली. यावेळी स्पर्धेत चांगली कामगिरी करु शकणारे संघ कोणते याबाबत विचारणा केली असता भारताचा संघ यंदा चांगल्या फॉर्मात असल्याने नक्कीच विजेतेपदाचा दावेदार असून सोबत पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे संघ सेमीफायनलपर्यंत पोहोचतील असं ते म्हणाले. तसंच न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका हे संघही कमाल फॉर्ममध्ये असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं. 

'पंत, पांड्या आणि कार्तिकमुळे भारताची ताकद वाढली'

शास्त्री यांनी यंदाच्या विश्वचषकाबद्दल बोलताना भारतीय संघाची यंदाची बॅटिग लाईनअप ही विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात ताकदवर बॅटिंग लाईनअप असल्याची प्रतिक्रिया दिली.यामागील खास कारण म्हणजे, मधल्या फळीतील पंत, पांड्या आणि कार्तिक हे त्रिकुट असल्याचंही शास्त्री म्हणाले. या तिघांच्या संघात एकत्र असण्याने भारताची फलंदाजी आणखी दमदार झाल्याचं ते म्हणाले. भारताकडे शर्मा, कोहली, राहुल तसंच सूर्यासारखे फलंदाज असून मधल्या फळी आणि फिनिशिंगला आता पंत, पांड्या आणि कार्तिक असल्याने भारत चांगली कामगिरी करेल असं ते म्हणाले.

कोणच्या शहरांत रंगणार टी-20 विश्वचषक स्पर्धा

यंदा16 ऑक्टोबरपासून 13 नोव्हेंबर पर्यंत एकूण ऑस्ट्रेलियात आयसीसी टी20 विश्वचषक पार पडणार असून स्पर्धेत एकूण 46 सामने खेळवले जाणार आहेत. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाच्या वेगवेगळ्या सात शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. यामध्ये अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या शहरांचा समावेश असून याठिकाणी सामने खेळवले जाणार आहेत. उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि अॅडलेड येथे खेळवले जातील. तर, अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळला जाईल. 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget