एक्स्प्लोर

IND vs ZIM : सिकंदर रझाच्या झिम्बॉब्वेनं इतिहास रचला, विश्वविजेत्या भारतीय संघाला पराभवाचा धक्का, वॉशिंग्टन सुंदरची झुंज अपयशी

Team India : भारत आणि झिम्बॉब्वे यांच्यातील पाच टी20 सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात झाली. शुभमन गिलच्या नेतृत्त्वात यंग ब्रिगेड झिम्बॉब्वेच्या दौऱ्यावर आहे.

IND vs ZIM हरारे : भारत आणि झिम्बॉब्वे यांच्यातील पहिला टी 20 सामना रोमहर्षक झाला. झिम्बॉब्वेनं विश्वविजेत्या भारताला (Zimbabwe Beat Team India) 13 धावांनी पराभूत केलं. पाच सामन्यांच्या मालिकेला आज सुरुवात झाली. झिम्बॉब्वेनं भारतापुढं विजयसाठी 116 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर भारतीय संघ हरारे स्पोर्टर्स क्लबमध्ये पहिली मॅच खेळत होता. मुझरबनी आणि चटारानं शेवटच्या दोन ओव्हरमध्ये केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताला 13 धावांनी पराभूत केलं. वॉशिंग्टनं सुंदरनं 27 धावांची खेळी करत झुंज देण्याचा प्रयत्न केला पण तो अपयशी ठरला. झिम्बॉब्वे विरुद्ध शुभमन गिल आणि वॉशिंग्टनं सुंदर शिवाय इतर फलंदाज चांगली खेळी करण्यात अपयश आलं. भारतीय संघ 102 धावांवर बाद झाला.

भारताची फलंदाजी गडगडली

झिम्बॉब्वेनं भारतापुढं विजयासाठी 116 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या धावसंख्येंचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाला अभिषेक शर्माच्या रुपात पहिला धक्का बसला. अभिषेक शर्मा शुन्यावर बाद झाला. यानंतर अनुभवी खेळाडू ऋतुराज गायकवाड देखील लवकर बाद झाला. ऋतुराज गायकवाडनं केवळ 7 धावा केल्या. आज पदार्पण करणाऱ्या रियान परागला मोठी खेळी करण्यात अपयश आलं. परागला चटारानं  2 धावांवर असताना बाद केलं. यानंतर फलंदाजीला आलेल्या अनुभवी खेळाडू रिंकू सिंगनं मोठी निराशा केली. तो शुन्यावर बाद झाला. ध्रुव जुरेल आणि शुभमन गिल डाव सावरतील असं वाटत असतानाच ध्रुव जुरेल 6 धावा करुन बाद झाला. यानंतर कॅप्टन शुभमन गिल 31 धावांवर बाद झाला. शुभमन गिलला झिम्बॉब्वेचा कॅप्टन सिकंदर रझानं बाद केलं. सिकंदर रझानं भारताच्या तीन विकेट घेतल्या. शुभमन गिल बाद झाला तेव्हा भारताच्या 47 धावांवर सहावी विकेट गेली होती. यानंतर वॉशिंग्टन सुंदर, रवि बिश्नोई आणि आवेश खाननं  भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

झिम्बॉब्वेच्या सिकंदर रझा, तेंदाई चटारा, ब्रायन बेनेट्ट, वेलिंग्टन मस्कदझा, ब्लेसिंग मुझरबनी, ल्यूक जोंगवे यांनी भारताच्या फलंदाजांना रोखलं. सिकंदर रझानं तीन तर, चटारानं 2 विकेट घेतल्या.


झिम्बॉब्वेच्या 115 धावा

भारताचा कॅप्टन शुभमन गिलनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून रवि बिश्नोई आणि वॉशिंग्टन सुंदरनं दमदार गोलंदाजी केली. या दोघांनी सहा विकेट घेतल्या. तर, वेस्ली मधेवेरे, ब्रायन बेनेट्ट, मैडेंडे आणि डायोन मायर्स यांनी चांगली फलंदाजी केली.  झिम्बॉब्वेचा विकेटकीपर मैडेंडेनं 29 धावा केल्यानं त्यांनी 115 धावांपर्यंत मजल मारली. शेवटच्या पाच ओव्हरमध्ये 30 धावा केल्यानं झिम्बॉब्वेला समाधानकारक धावसंख्या गाठता आली. झिम्बॉब्वेनं भारताविरोधात 20 ओव्हरमध्ये 9 विकेटवर 115 धावा केल्या.  रवि बिश्नोई आणि वॉशिंग्टन सुंदरनं झिम्बॉब्वेला धक्के दिले. रवि बिश्नोईनं चार विकेट घेतल्या तर वॉशिंग्टन सुंदरनं दोन विकेट घेतल्या.  

संबंधित बातम्या :

अभिषेक शर्मा अन् रिंकू सिंग शुन्यावर बाद, टीम इंडियाला झिम्बॉब्वेचे धक्के, भारत पराभवाच्या छायेत

IND vs ZIM : रवि बिश्नोई अन् वॉशिंग्टन सुंदरपुढं झिम्बॉब्वेचा डाव गडगडला, भारतापुढं किती धावांचं आव्हान?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या एक फुल दोन हाफ सरकारचं वस्त्रहरण करा: अमोल कोल्हे
15 वर्ष आमदार, 7 वर्ष केबिनेट मंत्री एवढा माणूस शिणला, त्याला आराम करायला देणं तुमचं कर्तव्य, अमोल कोल्हेंची केसरकरांवर टीका
भाजपला देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वावर आता विश्वास वाटत नाही, मोदींना स्वत: महाराष्ट्रात लक्ष घालावं लागतंय: सुषमा अंधारे
भाजपला देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वावर आता विश्वास वाटत नाही, मोदींना स्वत: महाराष्ट्रात लक्ष घालावं लागतंय: सुषमा अंधारे
Rahul Gandhi: कोल्हापूरात काँग्रेस कार्यकर्त्याच्या लहानशा कौलारु घरात राहुल गांधींचा पाहुणचार, स्वत:च स्वयंपाक केला, जेवणाला कांद्याची पात अन् वांग्याची भाजी
काँग्रेस कार्यकर्त्याच्या घरात राहुल गांधींचा मुक्काम, स्वत:च स्वयंपाक केला, जेवणाला कांद्याची पात अन् वांग्याची भाजी
माढा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा, शिवाजी सावंतांना विजयाची खात्री, 8 ऑक्टोबरला मुख्यमंत्री घेणार निर्णय
माढा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा, शिवाजी सावंतांना विजयाची खात्री, 8 ऑक्टोबरला मुख्यमंत्री घेणार निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech : कंत्राटदार मित्रांचे खिसे भरायला पंतप्रधान राज्यात, ठाकरेंची टीकाPM Narendra Modi Speech Poharadevi Washim  : इंग्रजांनी बंजारा समाजाला गुन्हेगार ठरवलंRahul Gandhi Full Speech : महागाई, बेरोजगारीवरुन भाजपवर निशाणा, राहुल गांधींचं कोल्हापुरात भाषणABP Majha Headlines : 2 PM : 5 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या एक फुल दोन हाफ सरकारचं वस्त्रहरण करा: अमोल कोल्हे
15 वर्ष आमदार, 7 वर्ष केबिनेट मंत्री एवढा माणूस शिणला, त्याला आराम करायला देणं तुमचं कर्तव्य, अमोल कोल्हेंची केसरकरांवर टीका
भाजपला देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वावर आता विश्वास वाटत नाही, मोदींना स्वत: महाराष्ट्रात लक्ष घालावं लागतंय: सुषमा अंधारे
भाजपला देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वावर आता विश्वास वाटत नाही, मोदींना स्वत: महाराष्ट्रात लक्ष घालावं लागतंय: सुषमा अंधारे
Rahul Gandhi: कोल्हापूरात काँग्रेस कार्यकर्त्याच्या लहानशा कौलारु घरात राहुल गांधींचा पाहुणचार, स्वत:च स्वयंपाक केला, जेवणाला कांद्याची पात अन् वांग्याची भाजी
काँग्रेस कार्यकर्त्याच्या घरात राहुल गांधींचा मुक्काम, स्वत:च स्वयंपाक केला, जेवणाला कांद्याची पात अन् वांग्याची भाजी
माढा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा, शिवाजी सावंतांना विजयाची खात्री, 8 ऑक्टोबरला मुख्यमंत्री घेणार निर्णय
माढा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा, शिवाजी सावंतांना विजयाची खात्री, 8 ऑक्टोबरला मुख्यमंत्री घेणार निर्णय
Sitaram Dalvi passed away: शिवसेनेचा जुना शिलेदार हरपला, माजी आमदार सीताराम दळवी यांचं मुंबईत निधन
शिवसेनेचा जुना शिलेदार हरपला, माजी आमदार सीताराम दळवी यांचं मुंबईत निधन
Nashik News : हृदयद्रावक... डॉक्टर मुलाचा काविळने तर जावयाचा डेंग्यूने एकाच दिवशी अंत, नाशिकच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
हृदयद्रावक... डॉक्टर मुलाचा काविळने तर जावयाचा डेंग्यूने एकाच दिवशी अंत, नाशिकच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Chaitanya Maharaj Wadekar: चैतन्य महाराज वाडेकर अटक प्रकरणात महत्त्वाची अपडेट, बुवांनी स्वत:च स्पष्टीकरण दिलं, म्हणाले...
चैतन्य महाराज वाडेकर अटक प्रकरणात महत्त्वाची अपडेट, बुवांनी स्वत:च स्पष्टीकरण दिलं, म्हणाले...
Rahul Gandhi in Kolhapur: शिवरायांचा राज्याभिषेक रोखणारी विचारधारा, नियत खोटी असल्याने राजकोट किल्ल्यावरचा पुतळा पडला: राहुल गांधी
शिवरायांचा राज्याभिषेक रोखणारी विचारधारा, नियत खोटी असल्याने राजकोट किल्ल्यावरचा पुतळा पडला: राहुल गांधी
Embed widget