एक्स्प्लोर

Raj Thackeray: 1 खासदार असणारे अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात, राज ठाकरेंनी गणित मांडलं, विधानसभा निकालाची पिसं काढली!

Raj Thackeray speech in Mumbai: राज ठाकरेंनाही EVM वर संशय, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची कुंडली मांडत अनेक प्रश्न उपस्थित केले. राज ठाकरे यांचे घणाघाती भाषण.

मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत संशय व्यक्त करत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ईव्हीएम मशीनबाबत अप्रत्यक्षपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मनसेच्या मुंबईतील मेळाव्यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी यासंदर्भात भाष्य केले. यापूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुतीच्या अतिप्रचंड यशामागे ईव्हीएममधील फेरफार असल्याचा आरोप केला होता. मात्र, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपशी जवळीक असलेल्या राज ठाकरे यांनीही ईव्हीएम मशिनच्या विश्वासर्हतेबद्दल शंका उपस्थित केली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांचा उल्लेख केला.

बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नेते, सातवेळा आमदार झालेत. ही आठवी टर्म होती, त्यांची. सातवेळेला 70 ते 80 हजारांच्या ते मताधिक्याने निवडून यायचे. ते यावेळी 10 हजार मतांनी पराभूत झाले. उद्या अनेक लोक बोलतील राज ठाकरेंचा पराभव झाला, त्यामुळे ते बोलत आहेत. मी काय बोलतो, अख्खा महाराष्ट्र बोलत आहे. सत्तेत असलेल्या अनेकांचा मला फोन आले, त्यांनाही शॉक बसलाय. भाजपला 132 जागा मिळाल्या, गेल्यावेळी 105 जागा होत्या. 2014 ला 122 जागा त्यांनी जिंकल्या होत्या. पण अजित पवार 42 जागा, चार-पाच जागा येतील की नाही, असं वाटत असताना त्यांना 42 जागा मिळाल्या. जे इतके वर्षे महाराष्ट्रात राजकारण करत आले त्यांना 10 जागा मिळतात, ही न समजण्यापलीकडची गोष्ट आहे. लोकसभेला काँग्रेसचे सर्वाधिक 13 खासदार निवडून आले. एका खासदाराच्या खाली सहा आमदार येतात निवडून. त्यांचे 15 आमदार निवडून आले. शरद पवारांचे 8 खासदार निवडून आले होते, त्यांचे 10 आमदार येतात. लोकसभेला ज्या अजित पवार यांचा एक खासदार निवडून येतात त्यांचे 42 आमदार चार महिन्यात निवडून आले. काय झालं, कसं झालं, हा संशोधनाचा विषय आहे. या मतदानावर जाऊ नका, लोकांनी आपल्याला मतदान केलं आहे, ते फक्त आपल्यापर्यंत आलेलं नाही, केलेलं मतदान कुठेतरी गायब झाले. असे राज ठाकरे यांनी म्हटले. अशाप्रकारे निवडणुका लढवायच्या असतील तर त्या न लढवलेल्याच बऱ्या. 

यावेळी राज ठाकरे मनसेचे कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे माजी आमदार राजू पाटील यांचे उदाहरण दिले. राजू पाटील यांच्या विधानसभा मतदारसंघात 1400 लोकवस्ती असलेले गाव आहे. या गावातील लोक राजू पाटील यांनाच मतदान करतात. या 1400 लोकांच्या गावात राजू पाटलांना शून्य मतं मिळाली. अख्ख्या गावातून एक मत नाही पडत, जिथून राजू पाटलांना 1400 मतं पडायची सगळी, तिकडून एक मत नाही पडत. तिकडे मराठवाड्यातील एक पदाधिकारी आहे, तो नगरसेवक होता, त्याला त्याच्या भागातून 5500 मतं पडली होती. आता विधानसभेला तो उभा होता, त्याला या निवडणुकीत 2500 मतं पडली. अनेक असे निर्णय आहेत महाराष्ट्रात ज्यावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचाही विश्वास नाही, असेही राज ठाकरे यांनी म्हटले.

आणखी वाचा

निकालानंतर महाराष्ट्रात इतका सन्नाटा कधीच नव्हता, निवडून आलेल्यांना सुद्धा शंका; राज ठाकरेंचा निवडणूक निकालावर कडाडून प्रहार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Cancer Vaccine For Women : महिलांसाठी कॅन्सर लसीबाबत मोठी अपडेट; केव्हा उपलब्ध होणार? केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी थेट कालावधी सांगितला!
महिलांसाठी कॅन्सर लसीबाबत मोठी अपडेट; केव्हा उपलब्ध होणार? केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी थेट कालावधी सांगितला!
Donald Trump on India : मिले सुर मेरा तुम्हारा! एलाॅन मस्क यांनी भारताची मदत रोखताच ट्रम्प म्हणाले, 'आम्ही त्यांना 182 कोटी का देतोय? भारत हा जगातील...'
मिले सुर मेरा तुम्हारा! एलाॅन मस्क यांनी भारताची मदत रोखताच ट्रम्प म्हणाले, 'आम्ही त्यांना 182 कोटी का देतोय? भारत हा जगातील...'
गुड न्यूज,ठेवीदारांची चिंता कमी होणार, बँकांमधील ठेवींवरील संरक्षण दुप्पट होणार? केंद्र सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत
ठेवीदारांची चिंता कमी होणार, बँकांमधील ठेवींवरील संरक्षण दुप्पट होणार? केंद्र सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत
Tej Pratap Yadav Aishwarya Rai Divorce Case : राबडींदेवींसारखा बंगला, गाडी अन् नोकरचाकर सुद्धा हवेत! तेज प्रसाद यादवांची पत्नी ऐश्वर्याने अंतिम सेटलमेंटसाठी किती कोटींची मागणी केली?
राबडींदेवींसारखा बंगला, गाडी अन् नोकरचाकर सुद्धा हवेत! तेज प्रसाद यादवांची पत्नी ऐश्वर्याने अंतिम सेटलमेंटसाठी किती कोटींची मागणी केली?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Islampur Nana Patekar : इस्लामपुरात 'बिझनेस एक्स्पो'मध्ये नाना पाटेकरांचं भाषणShivjayanti 2025 Solapur | सोलापुरात 21 हजार बटनांच्या सहाय्याने साकारली शिवरायांची प्रतिमाSanjay Raut :आले किती गेले किती उडून गेला भरारा,संपला नाही, संपणार नाही शिवसेनेचा दराराABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7 AM 19 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cancer Vaccine For Women : महिलांसाठी कॅन्सर लसीबाबत मोठी अपडेट; केव्हा उपलब्ध होणार? केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी थेट कालावधी सांगितला!
महिलांसाठी कॅन्सर लसीबाबत मोठी अपडेट; केव्हा उपलब्ध होणार? केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी थेट कालावधी सांगितला!
Donald Trump on India : मिले सुर मेरा तुम्हारा! एलाॅन मस्क यांनी भारताची मदत रोखताच ट्रम्प म्हणाले, 'आम्ही त्यांना 182 कोटी का देतोय? भारत हा जगातील...'
मिले सुर मेरा तुम्हारा! एलाॅन मस्क यांनी भारताची मदत रोखताच ट्रम्प म्हणाले, 'आम्ही त्यांना 182 कोटी का देतोय? भारत हा जगातील...'
गुड न्यूज,ठेवीदारांची चिंता कमी होणार, बँकांमधील ठेवींवरील संरक्षण दुप्पट होणार? केंद्र सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत
ठेवीदारांची चिंता कमी होणार, बँकांमधील ठेवींवरील संरक्षण दुप्पट होणार? केंद्र सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत
Tej Pratap Yadav Aishwarya Rai Divorce Case : राबडींदेवींसारखा बंगला, गाडी अन् नोकरचाकर सुद्धा हवेत! तेज प्रसाद यादवांची पत्नी ऐश्वर्याने अंतिम सेटलमेंटसाठी किती कोटींची मागणी केली?
राबडींदेवींसारखा बंगला, गाडी अन् नोकरचाकर सुद्धा हवेत! तेज प्रसाद यादवांची पत्नी ऐश्वर्याने अंतिम सेटलमेंटसाठी किती कोटींची मागणी केली?
Devendra Fadnavis & Eknath Shinde: उद्धव ठाकरेंना झेड प्लस कवच कायम, पण शिवसेनेच्या 20 आमदारांची सुरक्षा घटवली, शिंदे गटाचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न?
उद्धव ठाकरेंना झेड प्लस कवच कायम, पण शिवसेनेच्या 20 आमदारांची सुरक्षा घटवली, शिंदे गटाचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न?
Champions Trophy: भारत चॅम्पियन होणार की पाकिस्तान पुन्हा बाजी मारणार? कोणता संघ चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावणार?
भारताकडे 2017 च्या पराभवाचा बदला घेण्याची संधी, पाकिस्तानला दणका देणार? चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार सुरु
निवडणूक आयोगाच्या नियुक्तींबाबत नव्या कायद्यावर आज सुनावणी, मोदी सरकारने घटनापीठाचा निर्णय फिरवला; ज्ञानेश कुमारांची 17 फेब्रुवारी रोजीच नियुक्ती
निवडणूक आयोगाच्या नियुक्तींबाबत नव्या कायद्यावर आज सुनावणी, मोदी सरकारने घटनापीठाचा निर्णय फिरवला; ज्ञानेश कुमारांची 17 फेब्रुवारी रोजीच नियुक्ती
मोठी बातमी: जीबीएस सिंड्रोमचा धोका वाढल्याने सरकार राज्यातील यात्रांवर निर्बंध लादणार?
मोठी बातमी: जीबीएस सिंड्रोमचा धोका वाढल्याने सरकार राज्यातील यात्रांवर निर्बंध लादणार?
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.