एक्स्प्लोर

IND vs WI, 1st T20 : भारतीय फिरकीपटूंची कमाल, वेस्ट इंडीजवर 68 धावांनी विजय, मालिकेत 1-0 ची आघाडी

India vs West Indies : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील टी20 मलिकेच्या पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडीजवर दमदार असा 68 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयामुळे मालिकेतही भारताने आघाडी घेतली आहे.

IND vs WI T20 1st Innings Highlights : भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यात भारताने एका मोठ्या विजयाची नोंद केली आहे. तब्बल 68 धावांनी विजय मिळवत भारत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. सामन्यात नाणेफेक जिंकत वेस्ट इंडीजने गोलंदाजी घेतली. ज्यानंतर भारताने कर्णधार रोहितचं अर्धशतक आणि अखेरच्या षटकांत दिनेश कार्तिकच्या फटकेबाजीने भारताचा डाव सावरत 190 धावा केल्या. त्यानंतर 191 धावा करण्यासाठी मैदानात आलेला वेस्ट इंडीजचा संघ 122 धावाच करु शकला. ज्यामुळे वेस्ट इंडीजचा संघ 68 धावांनी पराभूत झाला आहे.  

सामन्यात नाणेफेक जिंकत वेस्ट इंडीजने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाला कमी धावांमध्ये रोखून नंतर निर्धारीत धावसंख्या पूर्ण करण्याची त्यांची रणनीती होती. त्यानुसार त्यांनी दमदार गोलंदाजीही केली. पण भारताचा कर्णधार रोहित शर्मा आज चांगल्या फॉर्ममध्ये होता. त्यामुळे एका बाजूने विकेट्स पडत असतानाही त्याने आपला खेळ कायम ठेवत दमदार असं अर्धशतक ठोकलं. त्याने 44 चेंडूत 64 धावा करत भारताचा डाव सावरला. पण तो बाद झाल्यावर भारताची धावसंख्या कमी होईल असं वाटत होतं. तेव्हाच अनुभवी दिनेश कार्तिकने तुफान फटकेबाजी करत 19 चेंडूत नाबाद 41 धावा कुटल्या आणि भारताची धावसंख्या 190 पर्यंत नेली. ज्यामुळे आता वेस्ट इंडीजला विजयासाठी 20 षटकात 191 धावा करायच्या होत्या. वेस्ट इंडीजकडून अल्झारी जोसेफने दोन तर ओबेद मकॉय, जेसन होल्डर, अकेल हुसेन आणि किमो पॉल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. 

भारताची भेदक गोलंदाजी

191 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या वेस्ट इंडीज संघाची सुरुवातच खराब झाली. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासून त्यांचे एक-एक गडी बाद केले. वेस्ट इंडीजकडून सर्वाधिक धावसंख्या ही शामराह ब्रूक्स याने केली ते देखील केवळ 20 धावा इतकीच होती. इतर कोणताही फलंदाज याहून अधिक धावसंख्या करु शकला नाही. भारताकडून फिरकीपटूंनी विशेष कामगिरी करत वेस्ट इंडीजचा निम्मा संघ तंबूत धाडला. यावेळी रवी बिश्नोई आणि आर. आश्विन यांनी प्रत्येकी दोन तर जाडेजाने एक विकेट घेतली. युवा अर्शदीपनेही दोन गडी बाद केले. तर भुवनेश्वरने एक विकेट घेतली. पण 41 धावांची दमदार खेळी करणारा दिनेश कार्तिक मालिकावीर ठरला.

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole on Sangli Loksabha : सांगली काँग्रेसला लागलेली दृष्ट उतरल्याशिवाय राहणार नाही, पण मशाल पेटवावी लागेल; नाना पटोलेंकडून सबुरीचा सल्ला!
सांगलीला लागलेली दृष्ट उतरल्याशिवाय राहणार नाही, पण मशाल पेटवावी लागेल; पटोलेंचा सबुरीचा सल्ला
रेल्वे स्टेशनजवळील हॉटेलमध्ये आगीचा भडका; 6 ठार, 7 गंभीर, 45 जणांचा वाचवला जीव
रेल्वे स्टेशनजवळील हॉटेलमध्ये आगीचा भडका; 6 ठार, 7 गंभीर, 45 जणांचा वाचवला जीव
ठरलं! नाशिकमधून राजाभाऊ वाजे, दिंडोरीतून भास्कर भगरे 'या' दिवशी भरणार उमेदवारी अर्ज, महाविकास आघाडीचे बडे नेते उपस्थित राहणार
ठरलं! नाशिकमधून राजाभाऊ वाजे, दिंडोरीतून भास्कर भगरे 'या' दिवशी भरणार उमेदवारी अर्ज, महाविकास आघाडीचे बडे नेते उपस्थित राहणार
Playoff Scenario : 7 पराभवानंतरही RCB कडे प्लेऑफमध्ये पोहचण्याची संधी, जाणून घ्या नेमकं समीकरण 
Playoff Scenario : 7 पराभवानंतरही RCB कडे प्लेऑफमध्ये पोहचण्याची संधी, जाणून घ्या नेमकं समीकरण 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Nilesh Lanke Rahuri : शेतकऱ्याला आधार देण्याचं काम  शरद पवारांनी केलं : निलेश लंकेABP Majha Headlines : 3 PM : 25 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole Speech Sangli : सांगली काँग्रेसला लागलेली दृष्ट काढल्याशिवाय मी राहणार नाहीBhagwat Karad On Loksabha Election  : महायुतीचा विजय होईल, मोदी पुन्हा पंतप्रधान होणार: भागवत कराड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole on Sangli Loksabha : सांगली काँग्रेसला लागलेली दृष्ट उतरल्याशिवाय राहणार नाही, पण मशाल पेटवावी लागेल; नाना पटोलेंकडून सबुरीचा सल्ला!
सांगलीला लागलेली दृष्ट उतरल्याशिवाय राहणार नाही, पण मशाल पेटवावी लागेल; पटोलेंचा सबुरीचा सल्ला
रेल्वे स्टेशनजवळील हॉटेलमध्ये आगीचा भडका; 6 ठार, 7 गंभीर, 45 जणांचा वाचवला जीव
रेल्वे स्टेशनजवळील हॉटेलमध्ये आगीचा भडका; 6 ठार, 7 गंभीर, 45 जणांचा वाचवला जीव
ठरलं! नाशिकमधून राजाभाऊ वाजे, दिंडोरीतून भास्कर भगरे 'या' दिवशी भरणार उमेदवारी अर्ज, महाविकास आघाडीचे बडे नेते उपस्थित राहणार
ठरलं! नाशिकमधून राजाभाऊ वाजे, दिंडोरीतून भास्कर भगरे 'या' दिवशी भरणार उमेदवारी अर्ज, महाविकास आघाडीचे बडे नेते उपस्थित राहणार
Playoff Scenario : 7 पराभवानंतरही RCB कडे प्लेऑफमध्ये पोहचण्याची संधी, जाणून घ्या नेमकं समीकरण 
Playoff Scenario : 7 पराभवानंतरही RCB कडे प्लेऑफमध्ये पोहचण्याची संधी, जाणून घ्या नेमकं समीकरण 
Salman Khan House Firing Case :  मोठी बातमी : सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, 40 गोळ्या झाडण्याच्या सूचना, आरोपींची पळून जाण्याची ट्रिकही उघड
मोठी बातमी : सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, 40 गोळ्या झाडण्याच्या सूचना, आरोपींची पळून जाण्याची ट्रिकही उघड
Mahadev Jankar on Sanjay Jadhav : लोकच मला निवडणुकीत पैसे देत आहेत, मी कधीच पैसे वाटत नाही, माझी गाडी अडवणे योग्य नाही, महादेव जानकरांचे संजय जाधवांना प्रत्युत्तर
लोकच मला निवडणुकीत पैसे देत आहेत, मी कधीच पैसे वाटत नाही, माझी गाडी अडवणे योग्य नाही, महादेव जानकरांचे संजय जाधवांना प्रत्युत्तर
संभाजीनगर शहराचा पाणीपुरवठा धोक्यात, महानगरपालिकेनं जलसंपदा विभागाचे थकवले  40 कोटी
संभाजीनगर शहराचा पाणीपुरवठा धोक्यात, महानगरपालिकेनं जलसंपदा विभागाचे थकवले 40 कोटी
अमोल कोल्हेंच्या गौप्यस्फोटावर भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; शिरूर लोकसभेच्या उमेदवारीबाबत हकीकत सांगितली!
अमोल कोल्हेंच्या गौप्यस्फोटावर भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; शिरूर लोकसभेच्या उमेदवारीबाबत हकीकत सांगितली!
Embed widget