एक्स्प्लोर

IND vs BAN 2nd ODI: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून कुठं झाली चूक? 'ही' आहेत पराभवाची 5 कारणे

IND vs BAN 2nd ODI: ढाकाच्या (Dhaka) शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर (Shere Bangla National Stadium) खेळण्यात आलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला बांगलादेशकडून (India vs Bangladesh) पाच धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

IND vs BAN 2nd ODI: ढाकाच्या (Dhaka) शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर (Shere Bangla National Stadium) खेळण्यात आलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला बांगलादेशकडून (India vs Bangladesh) पाच धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह भारतीय संघ तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-0 नं पिछाडीवर गेला. या मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर भारताला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकणं गरजेचं होतं. परंतु, बांगलादेशच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांनी गुडघे टेकले. अखेरच्या काही षटकात फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या दुखापतग्रस्त रोहित शर्मानं सामना फिरवण्याचा प्रयत्न केला. परंतु, भारताला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाकडून नेमकं कुठं चूक झाली? ज्यामुळं भारताला मालिका गमवावी लागली. दरम्यान, भारताच्या पराभवाच्या पाच प्रमुख कारणांवर एक नजर टाकुयात.

1) महेंदी हसन मिराजची आणि महमुदुल्लाह महत्त्वपूर्ण भागिदारी
नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजीसाठी मैदानात आलेल्या बांगलादेशच्या संघानं अवघ्या 69 धावांवर 6 विकेट्स गमावले. त्यावेळी भारत बांगलादेशला 100 धावांच्या आत गुंडाळेल, असं वाटत होतं.पण  महमुदुल्लाह आणि मेहंदी मिराजनं 148 धावांची भागिदारी रचत बांगलादेशच्या संघाची धावसंख्या 250 पार पोहचवण्यात मदत केली. 

2) मेहंदी हसन मिराजची शतकी खेळी
पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर दुसऱ्या सामन्यात मेहंदी हसन मिराज भारतासाठी विलन ठरला.  संघाची दयनीय अवस्था असताना तो फलंदाजीला आला होता. पण त्यानंतर त्यानं संयमी खेळी दाखवत शतक झळाकवलं आणि संघाची धावसंख्या 271 धावांवर पोहचवली. मेहंदी हसन मिराजची विकेट घेण्यात भारतीय गोलंदाज अपयशी ठरले. 

3) भारताच्या फलंदाजीची खराब सुरुवात
बांगलादेशनं दिलेल्या 272 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अतिशय खराब झाली.भारताच्या डावातील दुसऱ्या षटकात विराट कोहली आणि तिसऱ्या षटकात शिखर धवन बाद झाले. या सामन्यात विराट कोहली सलामीला आला, पण त्याला फक्त 5 धावाच करता आल्या.कोहलीनंतर शिखर धवनही सहा धावा करून माघारी परतला. ज्यामुळं बांगलादेशचा संघ भारतीय संघावर दबाब निर्माण करण्यात यशस्वी ठरला. 

4) भारताची फलंदाजी ढासळली
या सामन्यात भारतानं खूप खराब फलंदाजी केली. भारताचे फंलदाज एकामागून एक बाद होत होते. श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी भारताचा डाव सावरला.श्रेयस अय्यरनं (82 धावा) आणि अक्षर पटेल (56 धावा) यांनी अर्धशतकीय खेळी करत भारतीय संघाचा डाव सावरला. श्रेयस आणि अक्षर यांनी पाचव्या विकेटसाठी 107 धावांची भागीदारी रचली. परंतु, 35 व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर श्रेयस अय्यर मेहंदी हसनच्या गोलंदाजीचा शिकार ठरला. त्यानंतर 38 व्या षटकात अक्षर पटेलनंही आपली विकेट गमावली. दोघेही मोक्याच्या क्षणी बाद झाले आणि भारताच्या पराभवाचे हे चौथे कारण ठरले.

5) मुस्ताफिजुर रहमानची 48व्या षटकातील उत्कृष्ट गोलंदाजी
बांगलादेशनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला अखेरच्या 3 षटकात 18 धावांची गरज होती. यावेळी भारताचा कर्णधार रोहित शर्मा भारताला सामना जिंकून देऊ शकतो, असं चित्र निर्माण झालं होतं. पण बांगलादेशच्या संघानं शक्कल लढवली आणि चेंडू मुस्ताफिजुर रहमानच्या हातात सोपवला. या षटकात मोहम्मद सिराज स्ट्राईकवर होता. मुस्ताफिजुरनं हे षटक निर्धाव टाकलं. 

हे देखील वाचा-

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL Playing XI : वॉर्म-अप मॅचमध्येच झाला गेम! कर्णधार गिल 3 नामांकित खेळाडूंना बेंचवरच सडवणार?, प्लेइंग-11 मधून OUT, एक तर डेब्यूची वाट बघतोय
वॉर्म-अप मॅचमध्येच झाला गेम! कर्णधार गिल 3 नामांकित खेळाडूंना बेंचवरच सडवणार?, प्लेइंग-11 मधून OUT, एक तर डेब्यूची वाट बघतोय
Bhuvneshwar Kumar 2027 World Cup : 2022 मध्ये खेळला शेवटचा वनडे सामना; आता भुवनेश्वर कुमार 2027 वर्ल्ड कप खेळणार?, म्हणाला, मला कॉल आला तर...
2022 मध्ये खेळला शेवटचा वनडे सामना; आता भुवनेश्वर कुमार 2027 वर्ल्ड कप खेळणार?, म्हणाला, मला कॉल आला तर...
Yuzvendra Chahal : 7 सामन्यांत 15 विकेट्स… गंभीर पाहताय ना? ज्याला टीम इंडियातून बाहेर केलं, तोच आता वर्ल्ड कपच्या रेसमध्ये
7 सामन्यांत 15 विकेट्स… गंभीर पाहताय ना? ज्याला टीम इंडियातून बाहेर केलं, तोच आता वर्ल्ड कपच्या रेसमध्ये
IND vs SL Playing XI 1st Test : सरफराज खानची एन्ट्री अन् समीकरणं बदलली! 'हे' 4 खेळाडू बसणार बेंचवर, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची खतरनाक Playing 11
सरफराज खानची एन्ट्री अन् समीकरणं बदलली! 'हे' 4 खेळाडू बसणार बेंचवर, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची खतरनाक Playing 11

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Embed widget