एक्स्प्लोर

Travis Head : ट्रेविस हेडनं मोहम्मद सिराजला दोन चौकार ठोकले, अर्शदीप सिंगकडून पहिल्याच बॉलवर करेक्ट कार्यक्रम, भारताला मोठं यश, पाहा व्हिडिओ

Travis Head : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या वनडेमध्ये पावसानं व्यत्यय आणला आहे. डकवर्थ लुईस नियमानुसार ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 131 धावा करायच्या आहेत. 

पर्थ : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील पहिल्या वनडेत पावसानं व्यत्यय आणला आहे. यामुळं मॅचच्या षटकांची संख्या 50 वरुन 26 करण्यात आली आहे. भारतानं पहिल्यांदा फलंदाजी करताना 9 बाद 136 धावा केल्या. मात्र, डकवर्थ लुईस नियमानुसार ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 131 धावांची गरज आहे. ऑस्ट्रेलियाकडून मिशेल मार्श आणि ट्रेविस हेड (Travis Head) यांनी डावाची सुरुवात केली. ट्रेविस हेडनं पहिल्याच ओव्हरमध्ये मोहम्मद सिराजला दोन चौकार मारले. यानंतर पुढच्या ओव्हरमध्ये अर्शदीप सिंगनं (Arshdeep Singh) ट्रेविस हेडची विकेट घेतली. 

अर्शदीप सिंगकडून ट्रेविस हेडचा करेक्ट कार्यक्रम

ट्रेविस हेडनं  भारताविरुद्ध नेहमीच आक्रमक फलंदाजी केलेली आहे.मोहम्मद सिराज आणि ट्रेविस हेड यांच्यातील जुगलबंदी यापूर्वी अनेकदा पाहायला मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्याच ओव्हरमध्ये ट्रेविस हेडनं मोहम्मद सिराजला दोन चौकार मारले. यानंतर अर्शदीप सिंगच्या ओव्हरमध्ये ट्रेविस हेडला मैदान सोडून जावं लागलं. अर्शदीप सिंगला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात ट्रेविस हेड झेलबाद झाला. हर्षित राणानं कॅच घेत ट्रेविस हेडला मैदानाबाहेर पाठवण्यात महत्त्वाची कामगिरी केली. यामुळं शुभमन गिलचं मोठं टेन्शन दूर झालं.

भारताच्या 9 बाद 136 धावा

रोहित शर्मा आणि विराट कोहली 224 दिवसानंतर टीम इंडियाच्या जर्सीत पाहायला मिळाले. मात्र, दोघेही चांगली कामगिरी करु शकले नाहीत. रोहित शर्मा 8 धावांवर बाद झाला. तर, विराट कोहली एकही धाव करु शकला नाही.  श्रेयस अय्यरनं 11 धावा केल्या. तर, अक्षर पटेल यानं 31 धावा केल्या. कॅप्टन शुभमन गिल 10 धावा करु शकला. यानंतर केएल राहुलनं 38 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदर 10 आणि नितीशकुमार रेड्डीनं 19 धावा केल्यानं भारत 136 धावांपर्यंत पोहोचू शकला. भारतानं 136 धावा केल्या असल्या तरी डकवर्थ लुईस नियमानुसार ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 131 धावा करायच्या आहेत. 

रोहित शर्मा आणि विराट कोहली फेल

भारत आणि ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेसंदर्भात मोठी उत्सुकता निर्माण झालेली होती. विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी टी 20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता ते दोघे केवळ वनडे सामने खेळणार आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली पहिल्यांदा मैदानावर उतरले. मात्र,  ते दोघेही मोठी धावसंख्या करु शकले नाहीत. रोहित शर्मानं 8 धावा केल्या. तर, विराट कोहलीनं शुन्यावर बाद झाला. आता उर्वरित दोन मॅचमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली कशा प्रकारे फलंदाजी करतात ते पाहावं लागणार आहे.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karmala : करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
Ladki Bahin Yojana :  पती किंवा वडिलांचं निधन झालेल्या लाडक्या बहिणींसाठी वेबसाईटमध्ये बदल होणार, 18 नोव्हेंबरपूर्वी एक काम करावं लागणार
पती-वडील नसलेल्या लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी वेबसाईटमध्ये बदल, मात्र एक काम करावं लागणार
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Srinagar Blast : श्रीनगरमध्ये स्फोटामुळे खळबळ,अपघाती स्फोट टाळता आला नसता?
Special Report Army Mono Rail चीनच्या सीमेवर,भारताची मोनो;16 हजार फुटांवर लष्करांच्या मदतीला मोनोरेल
Mahapalikecha Mahasangram Pune गुन्हेगारीवर आळा कधी? वाहतूक कोंडी कधी सुटणार?;पालिका निवडणूक चुरशीची
Mahapalikecha Mahasangram Jalna जालन्यात व्यापाऱ्यांच्या पक्षांकडून अपेक्षा काय? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Mira Bhayandar : कोण मारणार मिरा-भाईंदरमध्ये बाजी? स्थानिकांना काय वाटतं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karmala : करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
Ladki Bahin Yojana :  पती किंवा वडिलांचं निधन झालेल्या लाडक्या बहिणींसाठी वेबसाईटमध्ये बदल होणार, 18 नोव्हेंबरपूर्वी एक काम करावं लागणार
पती-वडील नसलेल्या लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी वेबसाईटमध्ये बदल, मात्र एक काम करावं लागणार
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
Dhule: हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
Embed widget