एक्स्प्लोर

IND vs PAK : भारत पाकिस्तान टी 20 मध्ये 1 वर्षानंतर आमने सामने येणार, टी 20 वर्ल्डकपमध्ये कोण जिंकलेलं?

IND vs Pak Asia Cup 2025 : आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान 14 सप्टेंबरला आमने सामने येणार आहेत. आशिया कपमध्ये दोन्ही संघ तीनवेळा आमने येऊ शकतात.

नवी दिल्ली : आशिया कप  2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार आहेत. पुढील वर्षी भारतात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपची पूर्व तयारी म्हणून आशिया कप स्पर्धा टी 20 प्रकारात होणार आहे. भारत आणि पाकिस्तान आशिया कप स्पर्धेत 14 सप्टेंबरला आमने सामने येतील. आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान तीन वेळा आमने सामने येण्याची शक्यता आहे. भारत  आणि पाकिस्तान गेल्या वर्षी टी 20 वर्ल्ड कपमध्ये आमने सामने आले होते. 

भारत आणि पाकिस्तान आशिया कपमध्ये अ गटात आहेत. भारत आणि पाकशिवाय ओमान आणि यूएई हे देखील अ गटात आहेत. यामुळं भारत आणि पाकिस्तान सुपर फोरमध्ये पोहोचल्यास दोन्ही संघ पुन्हा आमने सामने येऊ शकतात. हा सामना 21 सप्टेंबरला होऊ शकतो. दोन्ही संघ अंतिम सामन्यात पोहोचल्यास पुन्हा आमने सामने येऊ शकतात. आशिया कपचा अंतिम सामना 28 सप्टेंबरला होणार आहे. 

टी 20 वर्ल्ड कपमध्ये काय घडलेलं? पाकिस्तानच्या हातून विजय खेचून आणलेला

टी 20 फॉरमॅटमध्ये भारत आणि पाकिस्तान टी 20 वर्ल्ड कपमध्ये आमने सामने आले होते. भारतानं पहिल्यांदा फलंदाजी करताना 119 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्ताननं 12 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून 72 धावा केल्या होत्या. म्हणजेच शेवटच्या 48 बॉलमध्ये पाकिस्तानला 48 धावा केल्या होत्या. मोहम्मद रिजवान आणि फखर जमान यासारखे स्टार फलंदाज मैदानावर होते. मात्र, भारतानं 6 धावांनी ती मॅच जिंकली होती. 

पाकिस्तानसाठी रिजवाननं  44 बॉलमध्ये 31 धावा केल्या. तर, बाबर आझमनं 10 बॉलमध्ये 13 धावा केल्या. उस्मान खान 15 बॉलमध्ये 13 ,फखर जमाननं 8 बॉलमध्ये 13 आणि शादाब खान यानं 7 बॉलमध्ये चार धावा केल्या. इमाद वसीम यानं 23 बॉलमध्ये 15 धावा केल्या. 

14  व्या ओव्हरनंतर पाकिस्तानच्या संघाला एक धाव घेण्यासाठी संघर्ष करावा लागला. भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजांना बांधून ठेवलं. यामुळं पाकिस्तानचा संघ 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 113 धावा करु शकला. 

भारताकडून जसप्रीत बुमराहनं 4 ओव्हरमध्ये 14  धावा देत 3 विकेट घेतल्या. तर, सिराजनं 4 ओव्हरमध्ये 19  धावा दिल्या. तर,हार्दिक पांड्यानं 4 ओव्हरमध्ये 24 धावा देत 2 विकेट घेतल्या होत्या.

आशिया कपसाठी भारतीय संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा, रिंकू सिंग.

आशिया कप 2025 – संपूर्ण वेळापत्रक (ग्रुप स्टेज) (Asia Cup 2025 Full Schedule)

9 सप्टेंबर – अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग
10 सप्टेंबर – भारत विरुद्ध यूएई
11 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग
12 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध ओमान
13 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध श्रीलंका
14 सप्टेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान 
15 सप्टेंबर – यूएई विरुद्ध ओमान
15 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध हाँगकाँग
16 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान
17 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध यूएई
18 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान
19 सप्टेंबर – भारत विरुद्ध ओमान

सुपर-4 आणि अंतिम सामना

20 सप्टेंबर – बी1 विरुद्ध बी2
21 सप्टेंबर – ए1 विरुद्ध ए2  
23 सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी1
24 सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी2
25 सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी2
26 सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी1
28 सप्टेंबर – अंतिम सामना 

 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bogus Voters List : रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
Imran Khan : इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवा! भेटीवर बंदी अन् बहिणींवर पोलिसांचा लाठीचार्ज, पाकिस्तानात खळबळ
इम्रान खान कुठे आहेत? तुरुंगातच मृत्यू झाल्याच्या अफवा, पाकिस्तानमध्ये खळबळ, कुटुंबीयांना भेट घेण्यापासून अडवलं
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Bhusawal:भुसावळ-नगरपरिषदेचा महासंग्राम, नराध्यक्षांकडून नागरिकांना अपेक्षा
Mahapalikecha Mahasangram Alibag : निवडणुकीबाबत काय वाटतं अलिबागकरांना? शेकाप पुन्हा सत्ता राखणार?
Mahapalikecha Mahasangram Dharashiv : धाराशीव शहरातील रिक्षा चालकांना निवडणुकीबाबत काय वाटतं?
Anjali Damania PC : 24 तासांत अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही तर...
Ekanth Shinde Nagpur : लाडकी बहीण कधी बंद होणार नाही, एकनाथ शिंदे यांचा पुन्हा एकदा शब्द

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bogus Voters List : रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
Imran Khan : इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवा! भेटीवर बंदी अन् बहिणींवर पोलिसांचा लाठीचार्ज, पाकिस्तानात खळबळ
इम्रान खान कुठे आहेत? तुरुंगातच मृत्यू झाल्याच्या अफवा, पाकिस्तानमध्ये खळबळ, कुटुंबीयांना भेट घेण्यापासून अडवलं
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
अनेकजण आमच्या संपर्कात, गेलेले लोक परत येतील, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य 
अनेकजण आमच्या संपर्कात, गेलेले लोक परत येतील, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य 
मुंबईतील इमारतीत आग, घर जळून खाक; अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी
मुंबईतील इमारतीत आग, घर जळून खाक; अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी
Meerut Crime News: मेरठमधील सौरभ हत्याकांडातील आरोपी पत्नी मुस्कान झाली आई, मुलीला दिला जन्म, सासरच्यांनी केली डीएनए चाचणीची मागणी
मेरठमधील सौरभ हत्याकांडातील आरोपी पत्नी मुस्कान झाली आई, मुलीला दिला जन्म, सासरच्यांनी केली डीएनए चाचणीची मागणी
IIT Mumbai : आयआयटी मुंबई की आयआयटी बॉम्बे? भाजप मंत्र्याच्या वक्तव्यानंतर वाद वाढणार अन् राजकारण तापणार
आयआयटी मुंबई की आयआयटी बॉम्बे? भाजप मंत्र्याच्या वक्तव्यानंतर वाद वाढणार अन् राजकारण तापणार
Embed widget