एक्स्प्लोर

IIT Mumbai : आयआयटी मुंबई की आयआयटी बॉम्बे? भाजप मंत्र्याच्या वक्तव्यानंतर वाद वाढणार अन् राजकारण तापणार

IIT Mumbai Vs IIT Bombay : केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या ताज्या वादानंतर मनसेने आक्रमक भूमिका घेत मुंबई आयआयटीच्या गेटसमोर 'आयआयटी बॉम्बे नाही आयआयटी मुंबई' असे बॅनर लावले.

मुंबई : आयआयटी मुंबई की आयआयटी बॉम्बे? हा प्रश्न यासाठी विचारला जातोय कारण याच मुंबई आणि बॉम्बेचा वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. याचं कारण म्हणजे दोन दिवसांपूर्वी केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह (Jitendra Singh) यांनी मुंबई आयआयटीच्या कार्यक्रमात केलेले एक वक्तव्य. "आयआयटी बॉम्बेचे नाव आयआयटी मुंबई केले नाही यासाठी देवाचे आभार मानतो" असं ते म्हणाले. या वक्तव्याने पुन्हा एकदा बॉम्बे विरुद्ध मुंबई असा वाद चांगलाच पेटल्याचं दिसतंय. या सगळ्याचा समाचार मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सुद्धा घेतला आहे.

मुंबई विरुद्ध बॉम्बे... मुंबईला बॉम्बे म्हणून संबोधणाऱ्याचा विरोध या आधी आक्रमकपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. 2009 साली प्रदर्शित झालेल्या "वेक अप सीड" या चित्रपटात मुंबई ऐवजी बॉम्बे शब्द अनेकदा उच्चारला गेला. यावर मनसेने आक्षेप घेत कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यानंतर या प्रकरणात करण जोहरला माफी मागावी लागली.

या प्रकरणानंतर अनेकदा बॉम्बे विरुद्ध मुंबई असा वाद पाहायला मिळाला तेव्हा मनसेने प्रखरपणे भूमिका मांडली. आता केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्या ताज्या वक्तव्यानंतर हा वाद पुन्हा एकदा वाढलाय.

Jitendra Singh On IIT Mumbai : नेमकं काय म्हणाले जितेंद्र सिंह?

राष्ट्रीय क्वांटम मोहिमेअंतर्गत फॅब्रिकेशन अँड सेंट्रल फॅसिलिटी उद्घाटन करण्यासाठी जितेंद्र सिंह मुंबई आयआयटीमध्ये आले होते. या कार्यक्रमात त्यांनी भाषण केलं. 'आपण देवाचे आभार मानतो की आयआयटी बॉम्बेचे नाव आयआयटी मुंबई केले नाही. म्हणजे ज्या प्रकारे आयआयटी मद्रास हे नाव तसेच राहिले, तसेच आयआयटी बॉम्बे चे सुद्धा राहीले' असं जितेंद्र सिंह म्हणाले.

Raj Thackeray On IIT Mumbai : राज ठाकरेंचे प्रत्युत्तर

या वक्तव्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करत या सगळ्याचा समाचार घेतला. सरकारला मुंबई हे नाव खटकतंय... मुंबई ऐवजी बॉम्बे नाव त्यांना करायच आहे. मुंबई आणि हळूहळू एमएमआर गुजरातला जोडायचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे मराठी माणसांना हे कळायला हवं असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं.

आयआयटी बॉम्बे हे संसदेच्या कायद्याने स्थापित केलेल्या आयआयटींपैकी एक आहे. शिवाय विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत आयआयटी मुंबईचे करार आहेत. त्यामुळे नावात बदल करायचा झाल्यास कायद्यात सुधारणा करावी लागेल अशी माहिती या संदर्भात मिळाली आहे.

IIT Mumbai Vs IIT Bombay : मुंबईतील राजकारण तापलं

केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलं आणि बॉम्बे विरुद्ध मुंबई हा वाद वाढला. मनसेकडून रात्री मुंबई आयआयटीच्या गेटसमोर आयआयटी बॉम्बे नाही आयआयटी मुंबई असे बॅनर लावण्यात आले. यावर भाजपच्या नेत्यांनी सुद्धा राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले.

आयआयटी बॉम्बेच नाव लगेच तातडीने आयआयटी मुंबई करून बदलणे जरी शक्य नसलं तरी मुंबई आणि बॉम्बे संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर ही मागणी आता जोर धरू लागली आहे. त्यामुळे मुंबई आणि बॉम्बेच्या या वादामध्ये मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणसुद्धा तापलेलं पाहायला मिळतंय.

ही बातमी वाचा:

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
Ajit Pawar and Jay Pawar: अजितदादांनी उद्घाटन केलेल्या 'त्या' सिटीस्कॅन मशीननेच शेवटी त्यांचा मृतदेह स्कॅन केला, जय पवारांनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
अजितदादांनी उद्घाटन केलेल्या 'त्या' सिटीस्कॅन मशीननेच त्यांचा मृतदेह स्कॅन केला, जय पवारांनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
तुमच्यामुळेच मी राजकारणात पाऊल टाकलं, अमोल कोल्हे भावूक; दिलीप सोपलांना एका वाक्यातच व्यक्त केलं सारं
तुमच्यामुळेच मी राजकारणात पाऊल टाकलं, अमोल कोल्हे भावूक; दिलीप सोपलांना एका वाक्यातच व्यक्त केलं सारं
Ambernath Crime News: दोघांच्या शरीरसंंबंधात लहान मुलाचा अडसर, अंबरनाथमध्ये आईच्या प्रियकराने चिमुरड्याला निर्दयीपणे संपवलं, अन्...
दोघांच्या शरीरसंंबंधात लहान मुलाचा अडसर, अंबरनाथमध्ये आईच्या प्रियकराने चिमुरड्याला निर्दयीपणे संपवलं, अन्...

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
Jay Pawar and Ajit Pawar:
"पत्नी ऋतुजाबद्दल दादांना सांगितलं तेव्हा...", जय पवारांनी सांगितली लग्नाची गोष्ट, अजित दादांची पहिली रिएक्शन
Uddhav Thackeray: काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसच्या गटनेतेपदाचा वाद अखेर निकाली, आयुक्तांचे आदेश
विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसच्या गटनेतेपदाचा वाद अखेर निकाली, आयुक्तांचे आदेश
Gold Silver Rate : सोने चांदीच्या दरात मोठी वाढ, सोने 2300 रुपयांनी महागले, जाणून घ्या सोने चांदीचे लेटेस्ट दर
सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी वाढ, चांदी 3000 रुपयांनी महागली, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Embed widget